शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची गांधीगिरी

By admin | Updated: May 27, 2015 01:01 IST

सामान्य जनतेच्या मनात फसवणुकीची भावना निर्माण झाली असल्याचे

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीवेळी अनेक आश्वासने देणाऱ्या मोदी सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला तरी अद्याप एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्याची आठवण करून देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना आज मंगळवारी निवेदन देण्यात आले.२०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती. यात पेट्रोल-डिझेल स्वस्त करणार, महागाई रोखणार, नोकऱ्या देणार, काळा पैसा परत आणणार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, औषधे स्वस्त करणार, दहशतवादाविरूद्ध कठोर कारवाई करणार, चीनला वठणीवर आणणार, अशा अनेक आश्वासनांचा समावेश होता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता पदग्रहण करून एक वर्ष पूर्ण झाले तरी यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. किंबहुना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने पावलेही टाकण्यात आलेली नाहीत. यामुळे सामान्य जनतेच्या मनात फसवणुकीची भावना निर्माण झाली असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मोदी सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे. त्यामुळे आतातरी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. यात रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष नाना मयेकर, जिल्हा मीडियाप्रमुख हारीस शेकासन, सुहेल मुकादम, जिल्हा सचिव प्रसाद उपळेकर, दीपक राऊत यांचा समावेश होता. जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षाच्या भावना निवेदनाद्वारे शासनाकडे पोहोचवण्याची ग्वाही दिली.या निवेदनावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश कीर, जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर, नाथा आढाव, काका तोडणकर, नंदू साळवी, वि. सु. सावंत, पद्माकर पवार, अरूण नेवरेकर, रोहित मयेकर, विनोद गोरे, राजन मोरे, नंदकुमार मोरे, अशोक वाडेकर, शब्बीर खान, साहील भाटकर, विवेक भाटकर, मुकद्दर जमादार, इम्तियाज पटेल, बुरहान वस्ता, आतिफ साखरकर यांच्या स्वाक्षरी आहेत. (प्रतिनिधी)