शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील उद्यानात मांडलेला खेळ अर्ध्यावरच संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : अनेक वर्षांनंतर येथील उद्यानांना नवरूप आलेले असताना व त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/चिपळूण : अनेक वर्षांनंतर येथील उद्यानांना नवरूप आलेले असताना व त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झालेला असताना महापुराने या उद्यानांतील खेळ अर्ध्यावरच संपवला आहे. या जलप्रलयाने चिपळूणमधील सर्वच बालउद्याने अक्षरश: उद्ध्वस्त केली आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी १ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेले येथील सानेगुरुजी उद्यान पूर्णतः चिखलात रुतले असून, येथील सेल्फी पॉईंट, कारंजे, ज्येष्ठ नागरिक कट्टा, मुलांची खेळणी सर्वांचीच दुर्दशा झाली आहे.

येथील नगर परिषदेने वर्षभर शहरातील उद्याने विकसित करण्यावर अधिक भर दिला होता. त्यासाठी काही सामाजिक संस्था व खासगी कंपन्यांची मदत घेतली होती. त्याआधारे शहरातील काही प्रभागांत बालउद्याने तयार केली होती. शहराच्या मध्यभागी असलेले सानेगुरुजी उद्यान तसेच पाग येथील उद्यान ही दोन्ही उद्याने मोठी आहेत तर अन्य उद्याने छोटी - छोटी आहेत. या सर्व उद्यानांमध्ये नवीन खेळणी, बाकडी, अन्य साहित्य उपलब्ध केले होते. त्यामुळे अनेक वर्षांनंतर शहरातील उद्यानांना एक वेगळे स्वरूप आले होते. मात्र, महापुरात ही उद्याने चिखलमय झाली आहेत.

सानेगुरुजी उद्यानाची २००५च्या महापुरानंतर पुरती वाताहत झाली. डागडुजी, दुरुस्ती करून नगर परिषदेने अनेकवेळा हे उद्यान सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, उद्यानाचे पूर्ण नूतनीकरण करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी नॅरोलॅक पेंट्स या कंपनीकडे सीएसआर फंडातून उद्यानाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला. नॅरोलॅक कंपनीने १ कोटी रुपये खर्च करून सानेगुरुजी उद्यानाचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करून एक सुंदर देखण्या अशा उद्यानाचे लोकार्पण केले. एप्रिल महिन्यात सानेगुरुजी उद्यानाचे लोकार्पण झाले. त्यानंतर काही दिवसातच कोरोनाचा कहर सुरू झाला आणि गर्दीच्या कारणास्तव उद्यान बंद करण्यात आले. ते अद्याप बंदच होते. अशा परिस्थितीत २२ जुलै रोजी आलेल्या महापुराने सानेगुरुजी उद्यान पूर्णतः उद्ध्वस्त केले. या उद्यानाची आजची अवस्था बघता काही महिन्यांपूर्वी दिमाखात लोकार्पण होऊन चिपळूणचे वैभव ठरलेले हेच का ते सानेगुरुजी उद्यान, असा प्रश्न पडावा, असे दृश्य समोर दिसत आहे.

-------------------

उद्यानांच्या डागडुजीची समस्या

चिपळूण शहरातील छोट्या-छोट्या उद्यानांमध्ये झोपाळे, घसरगुंडी व अन्य छोटी-मोठी खेळणे बसवली होती. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात ही व्यवस्था केल्याने त्या प्रभागातील बच्चे कंपनीसह नागरिकही खुश हाेते. परंतु, महापुरामुळे या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. यातील ८० टक्के उद्याने उद्ध्वस्त झाली आहेत. काही उद्यानांची देखभाल सामाजिक संस्था करत होत्या. त्यामुळे आता या संस्था व कंपन्यांचाही हिरमोड झाला आहे.