शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

चिपळुणातील उद्यानात मांडलेला खेळ अर्ध्यावरच संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : अनेक वर्षांनंतर येथील उद्यानांना नवरूप आलेले असताना व त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/चिपळूण : अनेक वर्षांनंतर येथील उद्यानांना नवरूप आलेले असताना व त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झालेला असताना महापुराने या उद्यानांतील खेळ अर्ध्यावरच संपवला आहे. या जलप्रलयाने चिपळूणमधील सर्वच बालउद्याने अक्षरश: उद्ध्वस्त केली आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी १ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेले येथील सानेगुरुजी उद्यान पूर्णतः चिखलात रुतले असून, येथील सेल्फी पॉईंट, कारंजे, ज्येष्ठ नागरिक कट्टा, मुलांची खेळणी सर्वांचीच दुर्दशा झाली आहे.

येथील नगर परिषदेने वर्षभर शहरातील उद्याने विकसित करण्यावर अधिक भर दिला होता. त्यासाठी काही सामाजिक संस्था व खासगी कंपन्यांची मदत घेतली होती. त्याआधारे शहरातील काही प्रभागांत बालउद्याने तयार केली होती. शहराच्या मध्यभागी असलेले सानेगुरुजी उद्यान तसेच पाग येथील उद्यान ही दोन्ही उद्याने मोठी आहेत तर अन्य उद्याने छोटी - छोटी आहेत. या सर्व उद्यानांमध्ये नवीन खेळणी, बाकडी, अन्य साहित्य उपलब्ध केले होते. त्यामुळे अनेक वर्षांनंतर शहरातील उद्यानांना एक वेगळे स्वरूप आले होते. मात्र, महापुरात ही उद्याने चिखलमय झाली आहेत.

सानेगुरुजी उद्यानाची २००५च्या महापुरानंतर पुरती वाताहत झाली. डागडुजी, दुरुस्ती करून नगर परिषदेने अनेकवेळा हे उद्यान सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, उद्यानाचे पूर्ण नूतनीकरण करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी नॅरोलॅक पेंट्स या कंपनीकडे सीएसआर फंडातून उद्यानाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला. नॅरोलॅक कंपनीने १ कोटी रुपये खर्च करून सानेगुरुजी उद्यानाचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करून एक सुंदर देखण्या अशा उद्यानाचे लोकार्पण केले. एप्रिल महिन्यात सानेगुरुजी उद्यानाचे लोकार्पण झाले. त्यानंतर काही दिवसातच कोरोनाचा कहर सुरू झाला आणि गर्दीच्या कारणास्तव उद्यान बंद करण्यात आले. ते अद्याप बंदच होते. अशा परिस्थितीत २२ जुलै रोजी आलेल्या महापुराने सानेगुरुजी उद्यान पूर्णतः उद्ध्वस्त केले. या उद्यानाची आजची अवस्था बघता काही महिन्यांपूर्वी दिमाखात लोकार्पण होऊन चिपळूणचे वैभव ठरलेले हेच का ते सानेगुरुजी उद्यान, असा प्रश्न पडावा, असे दृश्य समोर दिसत आहे.

-------------------

उद्यानांच्या डागडुजीची समस्या

चिपळूण शहरातील छोट्या-छोट्या उद्यानांमध्ये झोपाळे, घसरगुंडी व अन्य छोटी-मोठी खेळणे बसवली होती. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात ही व्यवस्था केल्याने त्या प्रभागातील बच्चे कंपनीसह नागरिकही खुश हाेते. परंतु, महापुरामुळे या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. यातील ८० टक्के उद्याने उद्ध्वस्त झाली आहेत. काही उद्यानांची देखभाल सामाजिक संस्था करत होत्या. त्यामुळे आता या संस्था व कंपन्यांचाही हिरमोड झाला आहे.