शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

हरचिरी - कदमवाडी येथील गटाराच्या कामात गाेलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : तालुक्यातील हरचिरी ग्रामपंचायतीतर्फे अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटकांच्या विकास कार्यक्रमांतर्गत हरचिरी - कदमवाडी येथे गटाराचे काम करण्यात ...

रत्नागिरी : तालुक्यातील हरचिरी ग्रामपंचायतीतर्फे अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटकांच्या विकास कार्यक्रमांतर्गत हरचिरी - कदमवाडी येथे गटाराचे काम करण्यात आले आहे. या कामासाठी ४.९९ लाख खर्च करण्यात आल्याचा फलक लावण्यात आला आहे. मात्र, या कामात गाेलमाल झाल्याचा आराेप येथील ग्रामस्थ शंकर नारायण कदम यांनी केला आहे. त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.

हरचिरी ग्रामपंचायतीतर्फे अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटकांच्या वस्तीचा विकास कार्यक्रमांतर्गत हरचिरी - कदमवाडी नं. १ येथे गटाराचे काम करण्यात आले आहे. या कामावर ४.९९ लाख रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. मात्र, या कामाचा दर्जा अत्यंत हीन असून, त्याबाबत केलेले करारपत्रही दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या करारपत्रावर काेणतीही तारीख नसून, साक्षीदारांची नावे घालण्यात आलेली आहेत. पण, त्यावर त्यांच्या सह्या नसल्याचे शंकर कदम यांनी म्हटले आहे. ज्या कामावर लाखाे रुपये खर्च झाले आहेत, ते काम ४० ते ५० हजारापर्यंतच झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या कामाबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केल्यानंतर काम पू्र्ण झाल्याचा लावण्यात आलेला फलकही काढून टाकण्यात आल्याचे या तक्रार अर्जात म्हटले आहे.

या कामाबाबत नाेव्हेंबर २०२०मध्ये तक्रार करण्यात आली हाेती. त्यानंतर २२ फेब्रुवारी २०२१ रोजी गटविकास अधिकारी यांनी चाैकशीसाठी कार्यालयात बाेलावले हाेते. मात्र, या कामाची चाैकशी प्रत्यक्ष जागेवर हाेणे गरजेचे हाेते. तसे न करता ती नंतर करू, असे सांगण्यात आले. त्यानंतर दाेन महिन्यांचा कालावधी उलटला तरी त्यांच्याकडून कामाची पाहणी करण्यात आलेली नसल्याचे शंकर कदम यांनी सांगितले. गटविकास अधिकारी केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आराेपही त्यांनी या तक्रार अर्जात केला आहे.

या वाडीसाठी आलेला निधी याच वाडीत खर्च करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे. गटराच्या कामात उरलेल्या निधीतून वाडीत पथदीप लावावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

.............................

...तर बेमुदत उपाेषण

आपण सामाजिक बांधिलकी म्हणून गेले ८ - ९ महिने शासनाकडे याबाबत दाद मागत आहोत. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या कामाची सखाेल चाैकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शंकर कदम यांनी या तक्रार अर्जात केली आहे. याबाबत याेग्य ती कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपाेषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.