शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नळयोजनांना हवाय कोटीचा निधी

By admin | Updated: January 20, 2015 00:08 IST

जिल्हा परिषद : २९ गावांसाठी हवेत १ कोटी १२ लाख

रत्नागिरी : जिल्ह्यातील २९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजना नादुरुस्त झाल्या आहेत़ त्यासाठी १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये खर्च करावा लागणार आहे़ बंद योजनांमुळे उन्हाळ्यामध्ये या गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे़कोट्यवधी रुपये खर्च करुन जिल्ह्यात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत़ या योजनांमुळे अनेक गावातील हजारो लोकांच्या घरापर्यंत पाणी नेण्यात यश आले होते़ त्याचा फायदा उन्हाळ्याच्या दिवसांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या कालावधीत मोठा होतो़ जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही पाणी साठविण्याचे नियोजन नसल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिवसेना - भाजपाच्या युतीच्या कालावधीत जिल्ह्यात अनेक गावांमध्ये नळपाणी योजना राबवण्यात आल्या होत्या. या योजनामुळे डोंगराळ भागातील गावातील वाड्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले होते़ मात्र, त्या योजनांची वेळीच डागडुजी व दुरुस्ती करण्यात न आल्याने त्याचा फटका आता लोकांना बसत आहे़या योजनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्या नादुरुस्त झाल्या असल्याने आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते़ त्यासाठी नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती होणे आवश्यक आहे़ नादुरुस्त योजनांमुळे २९ गावांतील हजारो लोकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. जिल्ह्यातील २९ गावांना पाणी पुरवठा करण्याऱ्या नळपाणी योजना नादुरुस्त झाल्या आहेत़ या योजनांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये खर्च करावा लागणार आहे़ त्याबाबतचा प्रस्तावही जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे़ तो लवकरच जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे़ (शहर वार्ताहर)