शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘मातोश्री’बाहेर घुटमळूनही मंत्रीपदासाठी निराशाच

By admin | Updated: July 19, 2016 23:56 IST

नीलेश राणे : शिवसेनेच्या आमदारांसह केंद्र आणि राज्य सरकारवर टीका, पक्षवाढीसाठी २४पासून जिल्हा दौरा

रत्नागिरी : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्यातील सेनेच्या तीनपैकी एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही. ‘मातोश्री’बाहेर घुटमळूनही काही जणांची घोर निराशा झाली. पक्षाने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यांची पात्रता काय हेच त्यांना दाखवून आहे, या शब्दात माजी खासदार नीलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांची खिल्ली उडवली. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्ष संघटना बांधणीच्या पार्श्वभूमीवर नीलेश राणे रत्नागिरीत आले होते. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील कॉँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी येत्या २४ जुलैपासून जिल्ह्यात तालुकानिहाय पक्ष संघटनेच्या बैठका, मेळावे घेतले जाणार आहेत. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कॉँग्रेसचा महामेळावा घेतला जाणार आहे. २४ जुलै रोजी राजापूर येथून मेळाव्याचा प्रारंभ होणार आहे. जिल्हाध्यक्ष पद लवकरच भरले जाईल, असे ते म्हणाले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग चौपदरीकरण डिसेंबर २०१६मध्ये पूर्ण होईल, असे सांगितले होते. आजची स्थिती पाहिली तर चौपदरीकरणाबाबत नियोजनच नसल्याचे स्पष्ट होत आहे. वळणे तशीच ठेवून चौपदरीकरण केल्याने काय साधणार, असा सवालही त्यांनी केला. भरपाईबाबतही स्पष्टपणे काहीच सांगितले जात नाही. बंदरांचा विकास व वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणार असल्याचे बुडबुडे काहीजण हवेत उडवत आहेत. नवीन कपडे शिवले की, ते दाखवण्यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर रत्नागिरीत येतात. बाकी काहीच काम ते करीत नाहीत. केवळ आश्वासने देतात, अशी टीका त्यांनी केली.जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. सर्वच योजनांमध्ये कोण व किती लाभार्थी आहेत, याची माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन या भ्रष्टाचाराचाही पर्दाफाश करणार असल्याचे राणे म्हणाले. आम्ही राज्यराणी गाडी सुरू केली. त्यानंतर एकही गाडी कोकणला मिळाली नाही. थांबे, स्थानके वाढवणे म्हणजे मोठे काम झाले, असे नाही, असा टोलाही त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना लगावला. (प्रतिनिधी)मेटेंनी मंत्रीपदाची भीक मागू नयेविनायक मेटे हे मंत्रीपदासाठी हातात वाटी घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर उभे आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्यांचा स्वाभिमान गेला कुठे? मराठा समाजाला हे शोभणारे नाही. मेटे यांनी अशा मंत्रीपदाला लाथ मारावी. मंत्रीपदाची भीक मागू नये. त्यांनी मराठ्यांचे नेतृत्व करावे. आम्हीही त्यांच्याबरोबर येऊ, असे राणे म्हणाले.केसरकरांनी आधी एक हवालदार सांभाळावा...गृहराज्यमंत्रीपद मिळालेल्या सेनेच्या दीपक केसरकर यांच्यावर नीलेश राणे यांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली. हाफ चड्डीतील एक हवालदारही सांभाळू न शकणाऱ्या माणसाला गृहराज्यमंत्रीपद दिले गेले आहे. आधी केसरकर यांनी एक हवालदार सांभाळून दाखवावा, एक पोलीस चौकी सांभाळून दाखवावी, असेही ते म्हणाले. सामंत मातोश्रीबाहेर घुटमळत होते... मंत्रीपदाच्या आशेने आमदार उदय सामंत हे मातोश्रीच्या बाहेर घुटमळत होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांची घोर निराशाच झाली, असे राणे म्हणाले. टॉप टेन खासदारांमध्ये विनायक राऊत यांचे नाव एका संस्थेने नमूद केल्याचे निदर्शनास आणताच असे करणाऱ्या या संस्थेचीच माहिती घ्यावी लागेल, असेही राणे म्हणाले.जाधवांबरोबरचे गैरसमज संपले...येत्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी झालीच पाहिजे, अशी आपली इच्छा असल्याचे राणे यांनी सांगताच भास्कर जाधवांबरोबच्या वैराचे काय, असे विचारता भास्कर जाधव यांच्याशी आपले व्यक्तीगत कोणतेही वैर नाही. संदीप सावंत नावाच्या माणसामुळे गैरसमज निर्माण करण्यात आले होते. ते संपले आहेत, असे ते म्हणाले.