शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढणाऱ्या व्यक्ती आणि रुग्णांच्या नातेवाइकांना दर दिवशी मोफत नाष्टा आणि भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:24 IST

रत्नागिरी : संकटाच्या वेळी धावून जाणे, ही आता रत्नागिरीकरांची ओळख झाली आहे. मग ते संकट पावसाचे, वादळाचे किंवा अगदी ...

रत्नागिरी : संकटाच्या वेळी धावून जाणे, ही आता रत्नागिरीकरांची ओळख झाली आहे. मग ते संकट पावसाचे, वादळाचे किंवा अगदी गेल्या दीड वर्षांपासून अवघ्या जगाला ग्रासणाऱ्या कोरोनाचे असो. अशा सर्व संकटावेळी धावून येतात ते रत्नागिरीतील सर्व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते. रत्नागिरीतील आस्था फाऊंडेशन हा असाच कार्यकर्त्यांची टीम सध्या कोरोना लढ्यात काम करणाऱ्या व्यक्ती आणि कोरोनाग्रस्त नातेवाईकांसाठी मोफत नाष्टाच नव्हे तर जेवण पुरविण्याचे महान कार्य करत आहेत.

कोविडकाळात कोणीही अडचणीत असलेली व्यक्ती उपाशी राहू नये, या नि:स्वार्थी भावनेने आस्था फाऊंडेशनची सुमारे ४० जणांची टीम सुमारे महिनाभर कोविडचे शासकीय सुरक्षा नियम पाळून ‘अविरत मोफत भोजन वाटप सेवा’ ही संकल्पना राबवत आहे. आतापर्यंत हजारो गरजूंना या सेवेचा लाभ मिळाला आहे. पन्नास खिचडीपासून सुरू झालेल्या या उपक्रमातून आता दरदिवशीच अगदी ३०० जणांचा नाष्टा आणि जेवण मोफत पुरविले जात आहे. तेही जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महिला रुग्णालयात जावून. तौक्ते चक्रीवादळासारख्या भयावह काळातसुद्धा आस्था फाऊंडेशनचे कार्यकर्ते आपल्या सेवेत मग्न होते.

रत्नागिरीतील अनेक सामाजिक संस्था ‘हेल्पिंग हँड’ या फोरमखाली एकत्र येऊन कोरोनाग्रस्तांना दिलासा देतानाच त्यांच्या नातेवाईकांच्या सहकार्याला धावून जात आहेत. एवढेच नव्हे तर कोविड रुग्णालये, केअर सेंटर यात काम करणारे परजिल्हातील डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य आरोग्य कर्मचारी यांचीही गैरसोय लक्षात घेत त्यांना या विनामूल्य सेवेचा लाभ देत कृतकृत्य होत आहेत.

या टीममध्ये रत्नागिरीतील विशेष कारागृहाचे तुरुंग अधिकारी अमेय पोतदार, मिलिंद मिरकर, सुयोग सावंत, स्वप्निल गावखडकर, सागर कोळी, लँसी सेराव, मैत्री फेडरेशन नारीशक्ती बचत गटाच्या संपदा रसाळ, जागुष्टे आदी सुमारे ४० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. स्वखर्चातून आतापर्यंत त्यांची ही सेवा सुरू होती. त्यांचे हे कार्य पाहून आता अनेक मदतीचे हात त्यांच्या सहकार्यासाठी पुढे येत आहेत.

ज्यांना या समाजकार्यात सहभागी होऊन वस्तुरूप किंवा आर्थिक हातभार उचलायचा असेल त्यांनी आस्था फाऊंडेशनचे सुयोग सावंत, मिलिंद मिरकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुद्धपाैर्णिमा, संकष्टीला विशेष भोजन

आस्था फाऊंडेशन दर दिवशी २५० ते ३०० जणांना मोफत नाष्टा आणि भोजन देत आहे. दर दिवसाचा खर्च २० हजार रुपयांच्या आसपास आहे. मात्र, खर्चाचा विचार न करता या टीमने बुद्ध पाैर्णिमेच्या दिवशी रत्नागिरीतील दोन्ही कोविड रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक आणि कोरोनाकाळात काम करणारे बाहेरून आलेले डाॅक्टर तसेच अन्य स्टाफ यांना सणासुदीला मिळते तसे गुलाबजामसह अन्य जेवण दिले. शनिवारी संकष्टी चतुर्थी असल्याने उपवासाचा दिवस लक्षात घेऊन आस्था फाऊंडेशनतर्फे मोदक, वरणभात आदींचा समावेश असलेले पूर्ण जेवण दिले जाणार आहे. जेवणाबराेबरच नाष्ट्यातही मिसळपाव, उप्पीट अशी विविधता जपली जात आहे.