शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

कोरोनाशी लढणाऱ्या व्यक्ती आणि रुग्णांच्या नातेवाइकांना दर दिवशी मोफत नाष्टा आणि भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:24 IST

रत्नागिरी : संकटाच्या वेळी धावून जाणे, ही आता रत्नागिरीकरांची ओळख झाली आहे. मग ते संकट पावसाचे, वादळाचे किंवा अगदी ...

रत्नागिरी : संकटाच्या वेळी धावून जाणे, ही आता रत्नागिरीकरांची ओळख झाली आहे. मग ते संकट पावसाचे, वादळाचे किंवा अगदी गेल्या दीड वर्षांपासून अवघ्या जगाला ग्रासणाऱ्या कोरोनाचे असो. अशा सर्व संकटावेळी धावून येतात ते रत्नागिरीतील सर्व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते. रत्नागिरीतील आस्था फाऊंडेशन हा असाच कार्यकर्त्यांची टीम सध्या कोरोना लढ्यात काम करणाऱ्या व्यक्ती आणि कोरोनाग्रस्त नातेवाईकांसाठी मोफत नाष्टाच नव्हे तर जेवण पुरविण्याचे महान कार्य करत आहेत.

कोविडकाळात कोणीही अडचणीत असलेली व्यक्ती उपाशी राहू नये, या नि:स्वार्थी भावनेने आस्था फाऊंडेशनची सुमारे ४० जणांची टीम सुमारे महिनाभर कोविडचे शासकीय सुरक्षा नियम पाळून ‘अविरत मोफत भोजन वाटप सेवा’ ही संकल्पना राबवत आहे. आतापर्यंत हजारो गरजूंना या सेवेचा लाभ मिळाला आहे. पन्नास खिचडीपासून सुरू झालेल्या या उपक्रमातून आता दरदिवशीच अगदी ३०० जणांचा नाष्टा आणि जेवण मोफत पुरविले जात आहे. तेही जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महिला रुग्णालयात जावून. तौक्ते चक्रीवादळासारख्या भयावह काळातसुद्धा आस्था फाऊंडेशनचे कार्यकर्ते आपल्या सेवेत मग्न होते.

रत्नागिरीतील अनेक सामाजिक संस्था ‘हेल्पिंग हँड’ या फोरमखाली एकत्र येऊन कोरोनाग्रस्तांना दिलासा देतानाच त्यांच्या नातेवाईकांच्या सहकार्याला धावून जात आहेत. एवढेच नव्हे तर कोविड रुग्णालये, केअर सेंटर यात काम करणारे परजिल्हातील डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य आरोग्य कर्मचारी यांचीही गैरसोय लक्षात घेत त्यांना या विनामूल्य सेवेचा लाभ देत कृतकृत्य होत आहेत.

या टीममध्ये रत्नागिरीतील विशेष कारागृहाचे तुरुंग अधिकारी अमेय पोतदार, मिलिंद मिरकर, सुयोग सावंत, स्वप्निल गावखडकर, सागर कोळी, लँसी सेराव, मैत्री फेडरेशन नारीशक्ती बचत गटाच्या संपदा रसाळ, जागुष्टे आदी सुमारे ४० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. स्वखर्चातून आतापर्यंत त्यांची ही सेवा सुरू होती. त्यांचे हे कार्य पाहून आता अनेक मदतीचे हात त्यांच्या सहकार्यासाठी पुढे येत आहेत.

ज्यांना या समाजकार्यात सहभागी होऊन वस्तुरूप किंवा आर्थिक हातभार उचलायचा असेल त्यांनी आस्था फाऊंडेशनचे सुयोग सावंत, मिलिंद मिरकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुद्धपाैर्णिमा, संकष्टीला विशेष भोजन

आस्था फाऊंडेशन दर दिवशी २५० ते ३०० जणांना मोफत नाष्टा आणि भोजन देत आहे. दर दिवसाचा खर्च २० हजार रुपयांच्या आसपास आहे. मात्र, खर्चाचा विचार न करता या टीमने बुद्ध पाैर्णिमेच्या दिवशी रत्नागिरीतील दोन्ही कोविड रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक आणि कोरोनाकाळात काम करणारे बाहेरून आलेले डाॅक्टर तसेच अन्य स्टाफ यांना सणासुदीला मिळते तसे गुलाबजामसह अन्य जेवण दिले. शनिवारी संकष्टी चतुर्थी असल्याने उपवासाचा दिवस लक्षात घेऊन आस्था फाऊंडेशनतर्फे मोदक, वरणभात आदींचा समावेश असलेले पूर्ण जेवण दिले जाणार आहे. जेवणाबराेबरच नाष्ट्यातही मिसळपाव, उप्पीट अशी विविधता जपली जात आहे.