शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

निवेंडी भगवतीनगर परिसरात बिबट्याच्या जाेडीचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:30 IST

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळेशेजारील निवेंडी भगवतीनगर परिसरात बिबट्याच्या जोडीचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण ...

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळेशेजारील निवेंडी भगवतीनगर परिसरात बिबट्याच्या जोडीचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

भगवतीनगर गावातसुद्धा बिबट्याची जोडी मुक्तपणे संचार करत असून अंधार होताच ही जोडी लोकांच्या दरवाजात बसलेल्या श्वानांना घेऊन जाते. त्यामुळे शेत, आंब्याच्या बागेत, शिवारात, घरांच्या आसपास फिरत असल्याने शेतीच्या कामासाठी किंवा आंब्याच्या बागेच्या राखणेसाठी जाणे धोक्याचे झाले आहे. संध्याकाळ होताच लहान मुलांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

भगवतीनगरचे पोलीस पाटील नितीन मायंगडे यांनी वनविभाग व पोलिसांना ही माहिती दिली आहे. ही बिबट्याची जोडी फिरत असल्याने आज या ठिकाणी तर उद्या दुसऱ्या ठिकाणी दिसून येत आहे. जर एकाच परिसरात वारंवार दिसत असेल तर कॅमेरा किंवा इतर मार्गाने कसे जेरबंद करता येईल, असे वनविभागाकडून सांगण्यात आल्याचे मायंगडे यांनी सांगितले.

भगवतीनगर परिसरात गेल्या चार ते पाच वर्षांपासून माकडांची भरमसाठ संख्या वाढली आहे. माकडांमुळे नारळ, आंबा, चिकू व इतर फळशेती करणे कठीण झाले असतानाच बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतात जाणे धोक्याचे झाले आहे, असे भगवतीनगर येथील ग्रामस्थ वैभव घाग यांनी सांगितले.