शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

परप्रांतीयांकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:26 IST

रत्नागिरी : परराज्यातील आंबा कोकणचा हापूस सांगून विक्री सुरू आहे. ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे ...

रत्नागिरी : परराज्यातील आंबा कोकणचा हापूस सांगून विक्री सुरू आहे. ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हापूसच्या नावाखाली अन्य आंब्याची विक्री करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

विविध कंपन्यांचे वाफारे बाजारात

खेड : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी लोकांकडून काढा घेणे, गरम वाफा घेण्यात येत आहे. म्हणून जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या वाफाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

वाढत्या उष्म्यामुळे हैराण

रत्नागिरी : सततच्या वातावरणातील बदलामुळे उकाड्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण होत आहेत. त्यामुळे शीतपेयांचा खप वाढला आहे. थंड पदार्थ सेवनामुळे सर्दी व तापसरी बळावण्याची शक्यता आहे.

फूल व्यवसाय धोक्यात

राजापूर : लग्नसराईमुळे फुलांचा खप चांगला होतो. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने तसेच कार्यक्रम, मेळावे यांच्यावरही बंदी असल्याने फुलांची विक्री होत नसल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. अशीच परिस्थती राहिली तर हा व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.

ग्राम कृती समित्यांची स्थापना

देवरुख : ग्रामस्तरावर कृषी क्षेत्राचे नियोजन करण्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी कोकणातील सर्व ग्रामपंचायतींत प्रथमच ग्राम कृषी विकास समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीमध्ये गावातील प्रगतीशील शेतकरी, लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.