शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बालपणीच्या पावसाचे आल्हाददायी रूप अजूनही स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

मात्र, गेल्या २०-२५ वर्षांत काळानुरूप परिस्थिती पालटली. आधुनिकतेच्या नावाखाली शहरांची महानगरे झाली आणि गावांनाही शहरे होण्याची स्वप्ने पडू लागली. ...

मात्र, गेल्या २०-२५ वर्षांत काळानुरूप परिस्थिती पालटली. आधुनिकतेच्या नावाखाली शहरांची महानगरे झाली आणि गावांनाही शहरे होण्याची स्वप्ने पडू लागली. विकासाच्या नावाखाली अनेक बांधकामे झाली, त्यात इतकी वाढ झाली की आता ग्रामीण भागात ओसाड झालेल्या जमिनी विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी शोध सुरू झाला. त्यातही चढाओढ सुरू झाली आणि आता ग्रामीण भागातील जमिनींवरही अनेक मजल्यांच्या भव्य इमारती उभ्या राहू लागल्या. आता टुमदार घर केवळ स्वप्नातच आता सर्वत्रच अपार्टमेंट जणू काही एकमेकींना लगडून उभ्या राहू लागल्या आहेत.

या बांधकामांमध्ये गटारे, रस्ते सर्वच बुजविली जात आहेत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजनाच नाही, तर या इमारतींमधील नागरिकांचे सांडपाणी कुठून जाणार? हा मुद्दा आहेच. कचऱ्याचे योग्य नियोजन नाही. शहरातील गटारांची वेळेवर स्वच्छता नाही. त्याचे दुष्पपरिणाम पावसाळ्यात दिसतात. मुसळधार पाऊस सुरू झाला की मग कचरा साचलेल्या गटारांमधून पाणी तुंबले जाते आणि शहरात महापूर यावा, तसे अनेक भागांत पाणीच पाणी दिसू लागते. आता तर अगदी समुद्रातही इमारती उभ्या राहत आहेत, अशा बांधकामांनाही मागणी वाढत आहे. आपण मनमानेली करताना निसर्गाच्या अस्तित्वाचा कुठेही विचार न करता आततायीपणा करू लागलो. आज बांधकामे एवढी वाढली आहेत की अगदी रस्त्यांवरही अतिक्रमणे सुरू आहेत.

सध्या रत्नागिरीची हीच स्थिती आहे. शहराच्या व्याप्तीपेक्षा इमारती अधिक अशी स्थिती आहे. जराशी कुठे जागा दिसली की बिल्डर त्या जागेचा करोडो रुपयांचा व्यवहार उरकून अनेक नियमांना फाट्यावर बसवून वर्ष-दीड वर्षांत त्या जागेत इमारत उभी करतो. सध्या नियमांची पायमल्ली करत शहर आणि परिसराच्या अनेक भागांत रस्त्यांलगत बांधकामे बिनदिक्कतपणे उभी राहत आहेत. बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून रस्ते अडवून वाहनांना अडचण करण्यात येते. मात्र, त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. अशा इमारतींना परवानगी कशी मिळते, हा संशोधनाचा विषय ठरावा. शहरांमध्ये येणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने लाखो हे फ्लॅट विकले जातात.

काळानुरूप बदलताना, विकास करताना आपण निसर्गचक्राच्या विरोधात जावून सर्व गोष्टी करायला लागलो. त्यामुळेच आता निसर्गाचे रूप विध्वंसक पाऊस, पूर, चक्रीवादळ याच्या रूपाने दिसू लागले आहे. त्यातून आपण कघी शहाणपण घेणार?