शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बालपणीच्या पावसाचे आल्हाददायी रूप अजूनही स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

मात्र, गेल्या २०-२५ वर्षांत काळानुरूप परिस्थिती पालटली. आधुनिकतेच्या नावाखाली शहरांची महानगरे झाली आणि गावांनाही शहरे होण्याची स्वप्ने पडू लागली. ...

मात्र, गेल्या २०-२५ वर्षांत काळानुरूप परिस्थिती पालटली. आधुनिकतेच्या नावाखाली शहरांची महानगरे झाली आणि गावांनाही शहरे होण्याची स्वप्ने पडू लागली. विकासाच्या नावाखाली अनेक बांधकामे झाली, त्यात इतकी वाढ झाली की आता ग्रामीण भागात ओसाड झालेल्या जमिनी विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी शोध सुरू झाला. त्यातही चढाओढ सुरू झाली आणि आता ग्रामीण भागातील जमिनींवरही अनेक मजल्यांच्या भव्य इमारती उभ्या राहू लागल्या. आता टुमदार घर केवळ स्वप्नातच आता सर्वत्रच अपार्टमेंट जणू काही एकमेकींना लगडून उभ्या राहू लागल्या आहेत.

या बांधकामांमध्ये गटारे, रस्ते सर्वच बुजविली जात आहेत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजनाच नाही, तर या इमारतींमधील नागरिकांचे सांडपाणी कुठून जाणार? हा मुद्दा आहेच. कचऱ्याचे योग्य नियोजन नाही. शहरातील गटारांची वेळेवर स्वच्छता नाही. त्याचे दुष्पपरिणाम पावसाळ्यात दिसतात. मुसळधार पाऊस सुरू झाला की मग कचरा साचलेल्या गटारांमधून पाणी तुंबले जाते आणि शहरात महापूर यावा, तसे अनेक भागांत पाणीच पाणी दिसू लागते. आता तर अगदी समुद्रातही इमारती उभ्या राहत आहेत, अशा बांधकामांनाही मागणी वाढत आहे. आपण मनमानेली करताना निसर्गाच्या अस्तित्वाचा कुठेही विचार न करता आततायीपणा करू लागलो. आज बांधकामे एवढी वाढली आहेत की अगदी रस्त्यांवरही अतिक्रमणे सुरू आहेत.

सध्या रत्नागिरीची हीच स्थिती आहे. शहराच्या व्याप्तीपेक्षा इमारती अधिक अशी स्थिती आहे. जराशी कुठे जागा दिसली की बिल्डर त्या जागेचा करोडो रुपयांचा व्यवहार उरकून अनेक नियमांना फाट्यावर बसवून वर्ष-दीड वर्षांत त्या जागेत इमारत उभी करतो. सध्या नियमांची पायमल्ली करत शहर आणि परिसराच्या अनेक भागांत रस्त्यांलगत बांधकामे बिनदिक्कतपणे उभी राहत आहेत. बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून रस्ते अडवून वाहनांना अडचण करण्यात येते. मात्र, त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. अशा इमारतींना परवानगी कशी मिळते, हा संशोधनाचा विषय ठरावा. शहरांमध्ये येणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने लाखो हे फ्लॅट विकले जातात.

काळानुरूप बदलताना, विकास करताना आपण निसर्गचक्राच्या विरोधात जावून सर्व गोष्टी करायला लागलो. त्यामुळेच आता निसर्गाचे रूप विध्वंसक पाऊस, पूर, चक्रीवादळ याच्या रूपाने दिसू लागले आहे. त्यातून आपण कघी शहाणपण घेणार?