शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

बालपणीच्या पावसाचे आल्हाददायी रूप अजूनही स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

मात्र, गेल्या २०-२५ वर्षांत काळानुरूप परिस्थिती पालटली. आधुनिकतेच्या नावाखाली शहरांची महानगरे झाली आणि गावांनाही शहरे होण्याची स्वप्ने पडू लागली. ...

मात्र, गेल्या २०-२५ वर्षांत काळानुरूप परिस्थिती पालटली. आधुनिकतेच्या नावाखाली शहरांची महानगरे झाली आणि गावांनाही शहरे होण्याची स्वप्ने पडू लागली. विकासाच्या नावाखाली अनेक बांधकामे झाली, त्यात इतकी वाढ झाली की आता ग्रामीण भागात ओसाड झालेल्या जमिनी विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी शोध सुरू झाला. त्यातही चढाओढ सुरू झाली आणि आता ग्रामीण भागातील जमिनींवरही अनेक मजल्यांच्या भव्य इमारती उभ्या राहू लागल्या. आता टुमदार घर केवळ स्वप्नातच आता सर्वत्रच अपार्टमेंट जणू काही एकमेकींना लगडून उभ्या राहू लागल्या आहेत.

या बांधकामांमध्ये गटारे, रस्ते सर्वच बुजविली जात आहेत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजनाच नाही, तर या इमारतींमधील नागरिकांचे सांडपाणी कुठून जाणार? हा मुद्दा आहेच. कचऱ्याचे योग्य नियोजन नाही. शहरातील गटारांची वेळेवर स्वच्छता नाही. त्याचे दुष्पपरिणाम पावसाळ्यात दिसतात. मुसळधार पाऊस सुरू झाला की मग कचरा साचलेल्या गटारांमधून पाणी तुंबले जाते आणि शहरात महापूर यावा, तसे अनेक भागांत पाणीच पाणी दिसू लागते. आता तर अगदी समुद्रातही इमारती उभ्या राहत आहेत, अशा बांधकामांनाही मागणी वाढत आहे. आपण मनमानेली करताना निसर्गाच्या अस्तित्वाचा कुठेही विचार न करता आततायीपणा करू लागलो. आज बांधकामे एवढी वाढली आहेत की अगदी रस्त्यांवरही अतिक्रमणे सुरू आहेत.

सध्या रत्नागिरीची हीच स्थिती आहे. शहराच्या व्याप्तीपेक्षा इमारती अधिक अशी स्थिती आहे. जराशी कुठे जागा दिसली की बिल्डर त्या जागेचा करोडो रुपयांचा व्यवहार उरकून अनेक नियमांना फाट्यावर बसवून वर्ष-दीड वर्षांत त्या जागेत इमारत उभी करतो. सध्या नियमांची पायमल्ली करत शहर आणि परिसराच्या अनेक भागांत रस्त्यांलगत बांधकामे बिनदिक्कतपणे उभी राहत आहेत. बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून रस्ते अडवून वाहनांना अडचण करण्यात येते. मात्र, त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. अशा इमारतींना परवानगी कशी मिळते, हा संशोधनाचा विषय ठरावा. शहरांमध्ये येणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने लाखो हे फ्लॅट विकले जातात.

काळानुरूप बदलताना, विकास करताना आपण निसर्गचक्राच्या विरोधात जावून सर्व गोष्टी करायला लागलो. त्यामुळेच आता निसर्गाचे रूप विध्वंसक पाऊस, पूर, चक्रीवादळ याच्या रूपाने दिसू लागले आहे. त्यातून आपण कघी शहाणपण घेणार?