शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

बालपणीच्या पावसाचे आल्हाददायी रूप अजूनही स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

मात्र, गेल्या २०-२५ वर्षांत काळानुरूप परिस्थिती पालटली. आधुनिकतेच्या नावाखाली शहरांची महानगरे झाली आणि गावांनाही शहरे होण्याची स्वप्ने पडू लागली. ...

मात्र, गेल्या २०-२५ वर्षांत काळानुरूप परिस्थिती पालटली. आधुनिकतेच्या नावाखाली शहरांची महानगरे झाली आणि गावांनाही शहरे होण्याची स्वप्ने पडू लागली. विकासाच्या नावाखाली अनेक बांधकामे झाली, त्यात इतकी वाढ झाली की आता ग्रामीण भागात ओसाड झालेल्या जमिनी विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी शोध सुरू झाला. त्यातही चढाओढ सुरू झाली आणि आता ग्रामीण भागातील जमिनींवरही अनेक मजल्यांच्या भव्य इमारती उभ्या राहू लागल्या. आता टुमदार घर केवळ स्वप्नातच आता सर्वत्रच अपार्टमेंट जणू काही एकमेकींना लगडून उभ्या राहू लागल्या आहेत.

या बांधकामांमध्ये गटारे, रस्ते सर्वच बुजविली जात आहेत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजनाच नाही, तर या इमारतींमधील नागरिकांचे सांडपाणी कुठून जाणार? हा मुद्दा आहेच. कचऱ्याचे योग्य नियोजन नाही. शहरातील गटारांची वेळेवर स्वच्छता नाही. त्याचे दुष्पपरिणाम पावसाळ्यात दिसतात. मुसळधार पाऊस सुरू झाला की मग कचरा साचलेल्या गटारांमधून पाणी तुंबले जाते आणि शहरात महापूर यावा, तसे अनेक भागांत पाणीच पाणी दिसू लागते. आता तर अगदी समुद्रातही इमारती उभ्या राहत आहेत, अशा बांधकामांनाही मागणी वाढत आहे. आपण मनमानेली करताना निसर्गाच्या अस्तित्वाचा कुठेही विचार न करता आततायीपणा करू लागलो. आज बांधकामे एवढी वाढली आहेत की अगदी रस्त्यांवरही अतिक्रमणे सुरू आहेत.

सध्या रत्नागिरीची हीच स्थिती आहे. शहराच्या व्याप्तीपेक्षा इमारती अधिक अशी स्थिती आहे. जराशी कुठे जागा दिसली की बिल्डर त्या जागेचा करोडो रुपयांचा व्यवहार उरकून अनेक नियमांना फाट्यावर बसवून वर्ष-दीड वर्षांत त्या जागेत इमारत उभी करतो. सध्या नियमांची पायमल्ली करत शहर आणि परिसराच्या अनेक भागांत रस्त्यांलगत बांधकामे बिनदिक्कतपणे उभी राहत आहेत. बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून रस्ते अडवून वाहनांना अडचण करण्यात येते. मात्र, त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. अशा इमारतींना परवानगी कशी मिळते, हा संशोधनाचा विषय ठरावा. शहरांमध्ये येणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने लाखो हे फ्लॅट विकले जातात.

काळानुरूप बदलताना, विकास करताना आपण निसर्गचक्राच्या विरोधात जावून सर्व गोष्टी करायला लागलो. त्यामुळेच आता निसर्गाचे रूप विध्वंसक पाऊस, पूर, चक्रीवादळ याच्या रूपाने दिसू लागले आहे. त्यातून आपण कघी शहाणपण घेणार?