शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

चार दिवसांनंतर बँका सुरू झाल्याने ग्राहकांनी केली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST

फोटो मजकूर सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने बुधवारी सकाळपासूनच ग्राहकांनी या बँकांसमोर गर्दी केली. लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी ...

फोटो मजकूर

सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने बुधवारी सकाळपासूनच ग्राहकांनी या बँकांसमोर गर्दी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या आठवड्यात शनिवार, रविवार असे सलग दोन दिवस जोडून आलेली सुटी आणि त्यानंतर सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी राष्ट्रीय बँकांनी केलेला संप यामुळे सलग चार दिवस बँका बंद होत्या. बुधवारी या बँका सुरू होताच ग्राहकांनी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राष्ट्रीय बँकांसमोर दुपारपर्यंत रांग कायम होती.

सध्या मार्च अखेर असल्याने आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यात सर्व आस्थापना, शासकीय कार्यालये व्यग्र झाली आहेत. काहींच्या बिलाची रक्कम मार्चपूर्वी बँकेत जमा करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. काहींनी गृह, व्यवसाय आदी विविध प्रकारचे कर्ज घेतले असल्याने बँकेकडून लवकरात लवकर कर्ज मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी बँकांकडे वारंवार खेपा माराव्या लागत आहेत. याचबरोबर धनादेश जमा करणे, पैसे काढणे, धनाकर्ष काढणे, पैसे भरणे आदी अन्य दैनंदिन व्यवहारांसाठी ग्राहकांची सतत ये-जा सुरू असते.

राष्ट्रीय बँकांच्या कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी बॅँकांना सुटी असते. त्यामुळे गेल्या आठवड्यात शनिवार, १३ रोजी तसेच रविवार १४ रोजी बँकांना साप्ताहिक सुटी होती. त्यानंतर सोमवार, १५ आणि मंगळवार १६ रोजी बँकांनी केंद्र सरकारच्या खासगीकरणाविरोधात संप पुकारल्याने १३ ते १६ मार्च या चार दिवसांच्या कालावधीत बँका सलग चार दिवस बंद राहिल्या. त्यामुळे ग्राहकांनी चार दिवस बँकांकडे पाठ फिरवली होती. या कालावधीत ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली;

मात्र बुधवारी या राष्ट्रीय बँका सुरू होताच सकाळपासूनच विविध आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दमछाक झाली होती. दुपारपर्यंत बँकांसमोर ग्राहकांची गर्दी दिसत होती.