शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

हरपुडेवासियांच्या नशिबी पायपीट

By admin | Updated: October 9, 2015 21:18 IST

संगमेश्वर तालुका : स्वतंत्र बसफेरी सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे गावात स्वतंत्र बसफेरी नसल्याने येथील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थांना यांना पायपीट करावी लागत आहे. हरपुडे गावासाठी स्वतंत्र बसफेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने देवरूख आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.देवरूखपासून ५ किलोमीटर अंतरावर हरपुडे गाव वसलेले आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी देवरूखात यावे लागते. सुमारे १०० विद्यार्थी देवरूख महाविद्यालय, आंबव अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या सर्वाधिक ६५ आहे. ५ कि. मी. पैकी ३ कि. मी. अंतर हे निर्मनुष्य आहे.येथील ग्रामस्थही पोटाची खळगी भरण्यासाठी कामानिमित्त देवरूख येथेच येतात. बसफेरी नसल्याने नाईलाजास्तव पायपीट करण्याची वेळ विद्यार्थी, तसेच ग्रामस्थांवर येत आहे. देवरूख आगारातून सकाळी ७ वाजता सुटणारी देवरूख- कुंडी बसफेरी येताना हरपुडे मार्गे येते. ही गाडी हरपुडे येथे सकाळी ९.१० वाजण्याच्या सुमारास येते. ही गाडी कुंडी, बेलारी, तामनाळे, निगुरवाडी येथील प्रवासी, विद्यार्थ्यांनी खचाखच भरून येते.गाडी फुल्ल असल्याने ती हरपुडे येथे थांबतच नाही. या मार्गावर अन्य बसफेरी नाही. दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या परतीच्या पावसामध्ये हरपुडे शाळेच्या पुढील कॉजवे हा वाहून गेला आहे. यामुळे या मार्गावरील सुरू असलेली ही कुंडी बसफेरीही बंद आहे. नाईलाजाने विद्यार्थी, ग्रामस्थ यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.विद्यार्थीवर्गाची परवड थांबण्यासाठी सरपंच विकास आकटे यांनी पुढाकार घेतला आहे. या गावासाठी स्वतंत्र बसफेरी सुरू करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ वाजता, सायंकाळी ५ वाजता, शनिवारी सकाळी ६.४५ वाजता व दुपारी १२ वाजता अशा बसफेऱ्या देवरूख आगारातून सोडण्यात याव्यात अशी मागणी तमाम ग्रामस्थांची आहे. या मागणीचे निवेदन नुकतेच आगार व्यवस्थापक दिलीपकुमार साळवी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे. यावर साळवी यांनी हरपुडे वासियांनी केलेली मागणी रास्त आहे. बसफेरी सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठवण्यात आला असल्याचे साळवी यांनी सांगितले. (वार्ताहर)