शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

हरकतींच्या गर्दीत अडकली अन्नसुरक्षा

By admin | Updated: August 6, 2014 00:00 IST

गोंधळ सुरुच : अटीत बसूनही लाभार्थ्यांच्या यादीतून नाव वगळले

रत्नागिरी : अन्नसुरक्षा योजना लाभार्थी यादीसाठी केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांमधून हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडे १४,२५१ हरकती प्राप्त झाल्या असून, त्यावर झालेल्या सुनावणीत यापैकी १२१९ लाभार्थ्यांचा यादीत समावेश झाला आहे. ११,१०९ हरकती नाकारण्यात आल्या आहेत. उर्वरित १९२३ हरकतींवर अद्याप निर्णय व्हायचा आहे. या योजनेत दोन गटांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारक, तर दुसरा प्राधान्य गट यात एपीएल म्हणजेच केशरी कार्डधारकांचा समावेश होता. जिल्ह्यात सध्या बीपीएल शिधापत्रिकाधारक ७२६४० आणि अंत्योदयधारक४२७९३ असे एकूण १,१५,४३३ या योजनेचे लाभार्थी आहेत. पण केशरीकार्डधारक २,५४,८५९ आहेत. मात्र, या गटासाठी ग्रामीण भागाकरिता ४४ हजार, तर शहरीकरिता ५९ हजार रूपये उत्पन्नाची अट घालण्यात आलेली आहे. त्यातही ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के आणि शहरी भागातील ४५.३४ टक्के इतक्या लोकांना लाभ द्यायचा होता. यामुळे काही ठिकाणी उत्पन्नाच्या अटीत बसणाऱ्यांनासुद्धा या योजनेपासून वंचित राहावे लागले होते. तर अधिक उत्पन्न असूनही काहींचा समावेश लाभार्थींमध्ये करण्यात आला होता. दि. १ फेब्रुवारी २०१४ पासून या योजनेला प्रारंभ झाला असला तरी यावर तोडगा म्हणून जानेवारी २०१४ पासून हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार जूनअखेर एकूण १४,२५१ हरकती पुरवठा विभागाकडे दाखल करण्यात आल्या. यापैकी १३,५१६ वर सुनावणी घेण्यात आली. ८३०५ वर निर्णय घेण्यात आला. ९२२ अद्याप प्रलंबित आहेत. अंतिम निर्णय घेतलेल्या हरकतींपैकी १२१९ जणांचा लाभार्थींमध्ये समावेश झाला आहे. त्यांना आता अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. ११,१०९ हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरित ११८८ वर निर्णय घेणे बाकी आहे. (प्रतिनिधी)-जिल्ह्यातून १४ हजार २५१ हरकती दाखल.-लाभार्थींच्या यादीत १२१९ नावांची नव्याने भर.-जिल्ह्यात बीपीएल शिधापत्रिकाधारक ७२६४० आणि अंत्योदयधारक ४२७९३ असे एकूण १,१५,४३३ योजनेचे लाभार्थी.-११८८ हरकतींवर निर्णय बाकी.-केशरीकार्डधारक गटासाठी ग्रामीण भागाकरिता ४४ हजार, तर शहरी भागाकरिता ५९ हजार रूपये उत्पन्नाची अट.