शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हरकतींच्या गर्दीत अडकली अन्नसुरक्षा

By admin | Updated: August 6, 2014 00:00 IST

गोंधळ सुरुच : अटीत बसूनही लाभार्थ्यांच्या यादीतून नाव वगळले

रत्नागिरी : अन्नसुरक्षा योजना लाभार्थी यादीसाठी केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांमधून हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडे १४,२५१ हरकती प्राप्त झाल्या असून, त्यावर झालेल्या सुनावणीत यापैकी १२१९ लाभार्थ्यांचा यादीत समावेश झाला आहे. ११,१०९ हरकती नाकारण्यात आल्या आहेत. उर्वरित १९२३ हरकतींवर अद्याप निर्णय व्हायचा आहे. या योजनेत दोन गटांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारक, तर दुसरा प्राधान्य गट यात एपीएल म्हणजेच केशरी कार्डधारकांचा समावेश होता. जिल्ह्यात सध्या बीपीएल शिधापत्रिकाधारक ७२६४० आणि अंत्योदयधारक४२७९३ असे एकूण १,१५,४३३ या योजनेचे लाभार्थी आहेत. पण केशरीकार्डधारक २,५४,८५९ आहेत. मात्र, या गटासाठी ग्रामीण भागाकरिता ४४ हजार, तर शहरीकरिता ५९ हजार रूपये उत्पन्नाची अट घालण्यात आलेली आहे. त्यातही ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के आणि शहरी भागातील ४५.३४ टक्के इतक्या लोकांना लाभ द्यायचा होता. यामुळे काही ठिकाणी उत्पन्नाच्या अटीत बसणाऱ्यांनासुद्धा या योजनेपासून वंचित राहावे लागले होते. तर अधिक उत्पन्न असूनही काहींचा समावेश लाभार्थींमध्ये करण्यात आला होता. दि. १ फेब्रुवारी २०१४ पासून या योजनेला प्रारंभ झाला असला तरी यावर तोडगा म्हणून जानेवारी २०१४ पासून हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार जूनअखेर एकूण १४,२५१ हरकती पुरवठा विभागाकडे दाखल करण्यात आल्या. यापैकी १३,५१६ वर सुनावणी घेण्यात आली. ८३०५ वर निर्णय घेण्यात आला. ९२२ अद्याप प्रलंबित आहेत. अंतिम निर्णय घेतलेल्या हरकतींपैकी १२१९ जणांचा लाभार्थींमध्ये समावेश झाला आहे. त्यांना आता अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. ११,१०९ हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरित ११८८ वर निर्णय घेणे बाकी आहे. (प्रतिनिधी)-जिल्ह्यातून १४ हजार २५१ हरकती दाखल.-लाभार्थींच्या यादीत १२१९ नावांची नव्याने भर.-जिल्ह्यात बीपीएल शिधापत्रिकाधारक ७२६४० आणि अंत्योदयधारक ४२७९३ असे एकूण १,१५,४३३ योजनेचे लाभार्थी.-११८८ हरकतींवर निर्णय बाकी.-केशरीकार्डधारक गटासाठी ग्रामीण भागाकरिता ४४ हजार, तर शहरी भागाकरिता ५९ हजार रूपये उत्पन्नाची अट.