शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

हरकतींच्या गर्दीत अडकली अन्नसुरक्षा

By admin | Updated: August 6, 2014 00:00 IST

गोंधळ सुरुच : अटीत बसूनही लाभार्थ्यांच्या यादीतून नाव वगळले

रत्नागिरी : अन्नसुरक्षा योजना लाभार्थी यादीसाठी केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांमधून हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडे १४,२५१ हरकती प्राप्त झाल्या असून, त्यावर झालेल्या सुनावणीत यापैकी १२१९ लाभार्थ्यांचा यादीत समावेश झाला आहे. ११,१०९ हरकती नाकारण्यात आल्या आहेत. उर्वरित १९२३ हरकतींवर अद्याप निर्णय व्हायचा आहे. या योजनेत दोन गटांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारक, तर दुसरा प्राधान्य गट यात एपीएल म्हणजेच केशरी कार्डधारकांचा समावेश होता. जिल्ह्यात सध्या बीपीएल शिधापत्रिकाधारक ७२६४० आणि अंत्योदयधारक४२७९३ असे एकूण १,१५,४३३ या योजनेचे लाभार्थी आहेत. पण केशरीकार्डधारक २,५४,८५९ आहेत. मात्र, या गटासाठी ग्रामीण भागाकरिता ४४ हजार, तर शहरीकरिता ५९ हजार रूपये उत्पन्नाची अट घालण्यात आलेली आहे. त्यातही ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के आणि शहरी भागातील ४५.३४ टक्के इतक्या लोकांना लाभ द्यायचा होता. यामुळे काही ठिकाणी उत्पन्नाच्या अटीत बसणाऱ्यांनासुद्धा या योजनेपासून वंचित राहावे लागले होते. तर अधिक उत्पन्न असूनही काहींचा समावेश लाभार्थींमध्ये करण्यात आला होता. दि. १ फेब्रुवारी २०१४ पासून या योजनेला प्रारंभ झाला असला तरी यावर तोडगा म्हणून जानेवारी २०१४ पासून हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार जूनअखेर एकूण १४,२५१ हरकती पुरवठा विभागाकडे दाखल करण्यात आल्या. यापैकी १३,५१६ वर सुनावणी घेण्यात आली. ८३०५ वर निर्णय घेण्यात आला. ९२२ अद्याप प्रलंबित आहेत. अंतिम निर्णय घेतलेल्या हरकतींपैकी १२१९ जणांचा लाभार्थींमध्ये समावेश झाला आहे. त्यांना आता अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. ११,१०९ हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरित ११८८ वर निर्णय घेणे बाकी आहे. (प्रतिनिधी)-जिल्ह्यातून १४ हजार २५१ हरकती दाखल.-लाभार्थींच्या यादीत १२१९ नावांची नव्याने भर.-जिल्ह्यात बीपीएल शिधापत्रिकाधारक ७२६४० आणि अंत्योदयधारक ४२७९३ असे एकूण १,१५,४३३ योजनेचे लाभार्थी.-११८८ हरकतींवर निर्णय बाकी.-केशरीकार्डधारक गटासाठी ग्रामीण भागाकरिता ४४ हजार, तर शहरी भागाकरिता ५९ हजार रूपये उत्पन्नाची अट.