शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

गरिबांना मोताद, कमावत्या लोकांना अन्नसुरक्षा...

By admin | Updated: July 16, 2014 23:04 IST

शासनाने योजना आणली. मात्र

पांडुरंग माने-पाचलउपाशीपोटी जगणाऱ्या लोकांना भूकेमुळे झोप लागत नाही. अशा परिस्थितीशी झगडणाऱ्या लोकांसाठी शासनाने अन्नसुरक्षा योजना आणली. मात्र, शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीच या योजनेचे बारा वाजवले आहेत. स्वच्छ आणि पुरेसे धान्य हे उद्दिष्ट घेऊन सुरु झालेल्या या योजनेत पाचल परिसरातील मिष्ठान्न जेवणारी जनताच सामील करुन घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे परिस्थितीशी दोन हात करुन जगणाऱ्या व्यक्तींचा यादीत समावेश नसल्याने गरिबीचे चित्र ‘मागील पानावरुन पुढे चालू’ असेच आहे.अन्नसुरक्षा योजनेचे पंख गावागावात वेगाने पसरले आहेत. मात्र, पाचल (ता. राजापूर) परिसरात लाभार्थींची यादी तयार करताना अधिकाऱ्यांनी सावळा गोंधळ घातला आहे. पुरेसे धान्य येऊनही केंद्र शासनाच्या या योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. योजनेच्या नियमाला बगल देत पुरवठा अधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांच्या मर्जीतील लोक यादीत कसे बसतील, याकडेच जास्त लक्ष पुरवल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे तालुका प्रशासनातील अधिकारीही यामध्ये सहभागी असल्याचे दिसून येत आहे. ज्यांना या योजनेचा खरोखर लाभ मिळणे गरजेचे आहे, अशी अनेक कुटुंब यादीतून बाहेर फेकली गेली आहेत. दुसरीकडे ज्यांच्या घरी मिष्टान्न मिळते, अशा लोकांची नावे या अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे श्रीमतांना तीन रुपये किलो दराने धान्य व गरिबांना मात्र बाजारभावांशी संलग्न मिळणारे धान्य घ्यावे लागते. असा उलटा न्याय बघायला मिळत आहे.गरीब कुटुंबाची कहाणीपाचल येथील गंगाधर रावजी जाधव हे हलाखीचे जीवन जगत आहेत. मागासवर्गीय कुटुंबातील कमावती व्यक्ती आजारी आहे. दोन मुले पदरी असल्याने करिष्मा जाधव या मोलमजुरी करुन कुटुंबाचा गाडा ओढताना दिसतात. मुलांचा शैक्षणिक खर्च, पतीचे आजारपण आणि संसारासाठी सुरु असलेली ओढाताण असे व्यस्त गणित सोडवत करिश्मा आता दिवस ढकलत आहेत. मात्र, अन्नसुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा एक दाणाही त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही. कारण हे कुटुंब ना तहसीलदारांच्या मर्जीतले, ना रेशन दुकानदाराच्या. त्यामुळे मिळेल त्या भावात धान्य खरेदी करणे त्यांच्या नशिबी आले आहे. अन्नसुरक्षेच्या लाभासाठी या महिलेने तहसील कार्यालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, २७ मार्च २०१४ रोजी दाखल झालेला अर्ज तहसील कार्यालयातील फाईलमध्ये अडगळीत पडून आहे. या अर्जावर सुनावणी सोडाच पण त्याचे पुढे काय झाले, याबाबत कोणीच काही सांगायला तयार नाही. आजही करिश्मा या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. कारण त्यांच्यासाठी शासनाने असलेला घास अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अन्य कुणी पळवला आहे.