शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

चरवेली येथे फुडमाॅल उभारणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी झाला पाहिजे. तसेच कामासाठी येथे येणारा प्रत्येक नागरिक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी झाला पाहिजे. तसेच कामासाठी येथे येणारा प्रत्येक नागरिक येथून समाधानी होऊन जाईल, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. मुंबई - गाेवा महामार्गाचे काम पू्र्ण हाेताच चरवेली येथे फुडमाॅल उभारून तरुण - तरुणींसाठी राेजगारनिर्मिती केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यातील चरवेली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, चरवेलीचे सरपंच सुरेश सावंत, उपसरपंच गजानन नागले उपस्थित होते.

सामंत म्हणाले की, या नूतन इमारतीचा उपयोग विकासात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी करा. येथील विकासकामे करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, या इमारतीमध्ये सभागृहासाठी पुढीलवर्षी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या प्रदीप सावंत व शशिकांत सावंत यांचा सत्कार मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ग्रामपंचायत कोळंबे (ता. संगमेश्वर)च्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, पंचायत समिती सदस्य पाटणे, संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने, राजेंद्र महाडिक, प्रमोद पवार, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, गटविकास अधिकारी रेवणकर, ग्रामपंचायत कोळंबेचे सरपंच रघुनाथ पडवळ उपस्थित होते.

यावेळी मंत्री सामंत म्हणाले की, या सुसज्ज इमारतीमध्ये येणारा येथील प्रत्येक ग्रामस्थ त्याचे काम झाले म्हणून समाधानी झाला पाहिजे. ग्रामस्थांची विकासाची कामे करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या ग्रामपंचायतीसमोर संरक्षक भिंत उभारावी, निधी कमी पडल्यास आपण निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या शंकर कांबळे, अशोक कांबळे, शांताराम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.