शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

चरवेली येथे फुडमाॅल उभारणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी झाला पाहिजे. तसेच कामासाठी येथे येणारा प्रत्येक नागरिक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी झाला पाहिजे. तसेच कामासाठी येथे येणारा प्रत्येक नागरिक येथून समाधानी होऊन जाईल, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. मुंबई - गाेवा महामार्गाचे काम पू्र्ण हाेताच चरवेली येथे फुडमाॅल उभारून तरुण - तरुणींसाठी राेजगारनिर्मिती केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यातील चरवेली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, चरवेलीचे सरपंच सुरेश सावंत, उपसरपंच गजानन नागले उपस्थित होते.

सामंत म्हणाले की, या नूतन इमारतीचा उपयोग विकासात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी करा. येथील विकासकामे करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, या इमारतीमध्ये सभागृहासाठी पुढीलवर्षी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या प्रदीप सावंत व शशिकांत सावंत यांचा सत्कार मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ग्रामपंचायत कोळंबे (ता. संगमेश्वर)च्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, पंचायत समिती सदस्य पाटणे, संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने, राजेंद्र महाडिक, प्रमोद पवार, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, गटविकास अधिकारी रेवणकर, ग्रामपंचायत कोळंबेचे सरपंच रघुनाथ पडवळ उपस्थित होते.

यावेळी मंत्री सामंत म्हणाले की, या सुसज्ज इमारतीमध्ये येणारा येथील प्रत्येक ग्रामस्थ त्याचे काम झाले म्हणून समाधानी झाला पाहिजे. ग्रामस्थांची विकासाची कामे करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या ग्रामपंचायतीसमोर संरक्षक भिंत उभारावी, निधी कमी पडल्यास आपण निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या शंकर कांबळे, अशोक कांबळे, शांताराम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.