शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

चिपळुणातील पूरग्रस्त शेतकरी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : वर्षभराच्या रोजीरोटीचा आधार असलेली शेती महापुरात वाहून गेली. गोठा कोसळला व जनावरेही मृत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/चिपळूण : वर्षभराच्या रोजीरोटीचा आधार असलेली शेती महापुरात वाहून गेली. गोठा कोसळला व जनावरेही मृत पावली. अशावेळी शासनाकडून तातडीची मदत सोडाच मोफत धान्य मिळत नसल्याने पूरग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे. ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, त्यांना मोफत अन्य मिळतेय. मात्र, पिढ्यानपिढ्या शेती उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्याला अन्नधान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

महापुरात तालुक्यातील ११ हजारांहून अधिक कुटुंब बाधित झाली. मात्र, तेवढ्याच पटीत येथील शेतकरी बाधित झाला आहे. बहरलेली भातशेती वाहून गेली, तर काही ठिकाणी शेत गाळात नष्ट झाले आहे. शेताचे बांधच दिसेनासे झाले आहेत. शेत शोधायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच काहींचे गोठे वाहून गेले, तर त्यातील जनावरेही मृत झाली. अशावेळी शासनाकडून काहीतरी मदत होईल, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्याची निव्वळ चेष्टा झाली आहे. तातडीची मदत सोडाच मोफत धान्यदेखील मिळालेले नाही. ज्यांनी पिढ्यानपिढ्या कष्ट करून पिके घेतली व इतरांची भूक भागवली त्याच शेतकऱ्यांवर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

सध्या पूरग्रस्त भागात शासनाकडून मोफत धान्य दिले जात आहे. दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ, पाच किलो तूरडाळ, पाच लीटर रॉकेल असे पुरवले जात आहे. साहजिकच त्याचा लाभ पूरग्रस्त ११ हजार बाधित कुटुंबीयांना होणार आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनेचा कोणताही लाभ होत नाही. आज, उद्या शासन शेतकऱ्यांचा विचार करेल, असे वाटत होते. मात्र, कोकणातील शेतकरी असंघटित असल्याने शासनाच्या या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे.

----------------------

महापुरात घरं, दुकानं वाहून गेले असतानाच शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना आजतागायत कोणतीही मदत मिळालेली नाही. तेव्हा शासनाने किमान मोफत धान्य देणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली असल्याने व मृत झाले असल्याने त्यांना जनावरे खरेदीसाठी जिल्हा बँकेतून पूरग्रस्त व्यापाऱ्यांप्रमाणेच पाच टक्के व्याजाने कर्ज देणे गरजेचे आहे.

- अभिमन्यू बुरटे, गोवळकोट, चिपळूण.

---------------------

पूरग्रस्त भागासाठी मोफत धान्य वाटपाबाबत २४ जुलै रोजी शासनाकडून आलेल्या परिपत्रकानुसार वाटप केले जात आहे. त्यामध्ये घरामध्ये पुराचे पाणी गेलेल्या पूरग्रस्तांना हे धान्य वाटप करण्याच्या सूचना आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत धान्य दिलेले नाही.

- मनोज पवार, पुरवठा अधिकारी, चिपळूण.