शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

चिपळुणातील पूरग्रस्त शेतकरी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : वर्षभराच्या रोजीरोटीचा आधार असलेली शेती महापुरात वाहून गेली. गोठा कोसळला व जनावरेही मृत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/चिपळूण : वर्षभराच्या रोजीरोटीचा आधार असलेली शेती महापुरात वाहून गेली. गोठा कोसळला व जनावरेही मृत पावली. अशावेळी शासनाकडून तातडीची मदत सोडाच मोफत धान्य मिळत नसल्याने पूरग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे. ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, त्यांना मोफत अन्य मिळतेय. मात्र, पिढ्यानपिढ्या शेती उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्याला अन्नधान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

महापुरात तालुक्यातील ११ हजारांहून अधिक कुटुंब बाधित झाली. मात्र, तेवढ्याच पटीत येथील शेतकरी बाधित झाला आहे. बहरलेली भातशेती वाहून गेली, तर काही ठिकाणी शेत गाळात नष्ट झाले आहे. शेताचे बांधच दिसेनासे झाले आहेत. शेत शोधायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच काहींचे गोठे वाहून गेले, तर त्यातील जनावरेही मृत झाली. अशावेळी शासनाकडून काहीतरी मदत होईल, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्याची निव्वळ चेष्टा झाली आहे. तातडीची मदत सोडाच मोफत धान्यदेखील मिळालेले नाही. ज्यांनी पिढ्यानपिढ्या कष्ट करून पिके घेतली व इतरांची भूक भागवली त्याच शेतकऱ्यांवर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

सध्या पूरग्रस्त भागात शासनाकडून मोफत धान्य दिले जात आहे. दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ, पाच किलो तूरडाळ, पाच लीटर रॉकेल असे पुरवले जात आहे. साहजिकच त्याचा लाभ पूरग्रस्त ११ हजार बाधित कुटुंबीयांना होणार आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनेचा कोणताही लाभ होत नाही. आज, उद्या शासन शेतकऱ्यांचा विचार करेल, असे वाटत होते. मात्र, कोकणातील शेतकरी असंघटित असल्याने शासनाच्या या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे.

----------------------

महापुरात घरं, दुकानं वाहून गेले असतानाच शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना आजतागायत कोणतीही मदत मिळालेली नाही. तेव्हा शासनाने किमान मोफत धान्य देणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली असल्याने व मृत झाले असल्याने त्यांना जनावरे खरेदीसाठी जिल्हा बँकेतून पूरग्रस्त व्यापाऱ्यांप्रमाणेच पाच टक्के व्याजाने कर्ज देणे गरजेचे आहे.

- अभिमन्यू बुरटे, गोवळकोट, चिपळूण.

---------------------

पूरग्रस्त भागासाठी मोफत धान्य वाटपाबाबत २४ जुलै रोजी शासनाकडून आलेल्या परिपत्रकानुसार वाटप केले जात आहे. त्यामध्ये घरामध्ये पुराचे पाणी गेलेल्या पूरग्रस्तांना हे धान्य वाटप करण्याच्या सूचना आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत धान्य दिलेले नाही.

- मनोज पवार, पुरवठा अधिकारी, चिपळूण.