शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील पूरग्रस्त शेतकरी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : वर्षभराच्या रोजीरोटीचा आधार असलेली शेती महापुरात वाहून गेली. गोठा कोसळला व जनावरेही मृत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/चिपळूण : वर्षभराच्या रोजीरोटीचा आधार असलेली शेती महापुरात वाहून गेली. गोठा कोसळला व जनावरेही मृत पावली. अशावेळी शासनाकडून तातडीची मदत सोडाच मोफत धान्य मिळत नसल्याने पूरग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे. ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, त्यांना मोफत अन्य मिळतेय. मात्र, पिढ्यानपिढ्या शेती उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्याला अन्नधान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

महापुरात तालुक्यातील ११ हजारांहून अधिक कुटुंब बाधित झाली. मात्र, तेवढ्याच पटीत येथील शेतकरी बाधित झाला आहे. बहरलेली भातशेती वाहून गेली, तर काही ठिकाणी शेत गाळात नष्ट झाले आहे. शेताचे बांधच दिसेनासे झाले आहेत. शेत शोधायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच काहींचे गोठे वाहून गेले, तर त्यातील जनावरेही मृत झाली. अशावेळी शासनाकडून काहीतरी मदत होईल, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्याची निव्वळ चेष्टा झाली आहे. तातडीची मदत सोडाच मोफत धान्यदेखील मिळालेले नाही. ज्यांनी पिढ्यानपिढ्या कष्ट करून पिके घेतली व इतरांची भूक भागवली त्याच शेतकऱ्यांवर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

सध्या पूरग्रस्त भागात शासनाकडून मोफत धान्य दिले जात आहे. दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ, पाच किलो तूरडाळ, पाच लीटर रॉकेल असे पुरवले जात आहे. साहजिकच त्याचा लाभ पूरग्रस्त ११ हजार बाधित कुटुंबीयांना होणार आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनेचा कोणताही लाभ होत नाही. आज, उद्या शासन शेतकऱ्यांचा विचार करेल, असे वाटत होते. मात्र, कोकणातील शेतकरी असंघटित असल्याने शासनाच्या या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे.

----------------------

महापुरात घरं, दुकानं वाहून गेले असतानाच शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना आजतागायत कोणतीही मदत मिळालेली नाही. तेव्हा शासनाने किमान मोफत धान्य देणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली असल्याने व मृत झाले असल्याने त्यांना जनावरे खरेदीसाठी जिल्हा बँकेतून पूरग्रस्त व्यापाऱ्यांप्रमाणेच पाच टक्के व्याजाने कर्ज देणे गरजेचे आहे.

- अभिमन्यू बुरटे, गोवळकोट, चिपळूण.

---------------------

पूरग्रस्त भागासाठी मोफत धान्य वाटपाबाबत २४ जुलै रोजी शासनाकडून आलेल्या परिपत्रकानुसार वाटप केले जात आहे. त्यामध्ये घरामध्ये पुराचे पाणी गेलेल्या पूरग्रस्तांना हे धान्य वाटप करण्याच्या सूचना आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत धान्य दिलेले नाही.

- मनोज पवार, पुरवठा अधिकारी, चिपळूण.