शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

पूरग्रस्त शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

अडरे : जुलैमध्ये आलेल्या महापुरात शहरासह लगतच्या तालुक्यातील शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पुरामुळे यावर्षी भातपिकासह अन्य पिके मातीतच गेली ...

अडरे : जुलैमध्ये आलेल्या महापुरात शहरासह लगतच्या तालुक्यातील शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पुरामुळे यावर्षी भातपिकासह अन्य पिके मातीतच गेली आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी प्रामुख्याने कृषी मंत्रालयाकडून मदतीच्या आशेवर आहेत. मात्र, अद्यापही ही शासकीय मदत न मिळाल्याने शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

महापुराचे पाणी शहर व लगतच्या शेतात शिरल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. मोठ्या प्रमाणात माती शेतजमिनीत पसरली. त्यामुळे हातातोंडाशी आलेली भातशेती व सोबत तीळ, वरी आदी पिके वाया गेली. महापुरापूर्वीच बहुतांश शेतकऱ्यांच्या भात व अन्य पिकांची लावणी पूर्ण झाली होती. गणेशोत्सवादरम्यान भाताचे हळवे पीक तयार होते. तसेच वरीचे तांदूळ व नाचणीला जोर येतो. ही पिके तयार होण्याच्या प्रक्रियेत असतानाच जुलैमध्ये आलेल्या महापुराच्या मातीत सर्व पिके गाडली गेली.

महापूर ओसरल्यानंतर शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकरी व शेतजमिनीचे पंचनामे केले. मात्र, नुकसानाबाबत शासनाकडून ठोस कार्यवाही अद्यापही झालेली नाही. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रेशनवर धान्य व काही सामाजिक संस्थांकडून अन्नधान्याची मदत यावरच सद्यस्थितीत अवलंबून राहावे लागले आहे. शेतजमीन व पिकांच्या नुकसानाबाबत शासनाकडून पर्यायाने कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना अद्याप मदतीची प्रतीक्षा असून, ही नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी करण्यात येत आहे.