शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

चिपळुणातील पुराचे पाणी अखेर ओसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असतानाच सोमवारी येथे मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे वाशिष्ठी व ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असतानाच सोमवारी येथे मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे वाशिष्ठी व शिव नदीने रात्री उशिरा धोक्याची पातळी ओलांडली व बाजारपेठेतील काही भागात पुराचे पाणीही शिरले होते. मात्र पहाटे पावसाचा जोर कमी होताच पुराचे पाणी ओसरले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुणे येथील एनडीआरएफचे पथक येथे दाखल झाले होते.

येथे २२ व २३ जुलैला महापूर आला होता. त्यावेळी हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना वाचविण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. परंतु पुणेमार्गे येताना सातारा कोयना येथे या टीमला अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल १४ तास उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाली. तत्पूर्वी स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरू झाले होते. एनडीआरएफची टीम उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनावर टीकाही झाली होती. मात्र, आता पुन्हा पावसाचा जोर वाढतच असल्याने पुण्यातून एनडीआरएफचे पथक मागविण्यात आले होते. या परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांच्या उरात धडकी भरली होती.

पुढील तीन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी दुपारपासून दमदार पाऊस पडला. त्यामुळे रात्री ११ वाजताच वाशिष्ठी व शिव नदीने धोक्याची पातळी गाठली. त्यामुळे नगरपरिषदेने तत्काळ शहरात गाडी फिरवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे हेही आपल्या सर्व पथकांसह सज्ज होते. परंतु, पहाटे ५ वाजल्यापासून पावसाचा जोर कमी झाला आणि सकाळी ७ वाजल्यापासून पाण्याची पातळी कमी होऊ लागली. त्यानंतर सकाळी ८ वाजल्यापासून पाऊस पूर्णतः थांबल्याने पुराचे पाणी ओसरले आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.