शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या बेफिकिरीमुळेच महापुराचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : गेले आठवडाभर पाऊस बरसतोय. तीन दिवसांपासून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासनाला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : गेले आठवडाभर पाऊस बरसतोय. तीन दिवसांपासून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासनाला या सगळ्याची माहिती नव्हतीच असे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यातच कोळकेवाडी येथून कोयनेच्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्या पाण्यामुळेच महापुराच्या प्रवाहाचा वेग वाढला आणि अतोनात नुकसान झाले. या परिस्थितीला निव्वळ प्रशासकीय अधिकाऱ्यांची बेफिकिरी कारणीभूत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांसह नागरिकांमधून केला जात आहे.

चिपळूण शहरासह खेर्डीमध्ये पूर इतका वाढला की, सुरुवातीला घरांमध्ये पाणी शिरले. इतकेच नव्हे तर घरांच्या पोटमाळ्यापर्यंत पाणी पोहोचू लागले. यामुळे या घरांमधील नागरिक जीवाच्या आकांताने मदतीसाठी टाहो फोडू लागले. तर दुसरीकडे इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले. यामुळे नागरिकांनी टेरेस गाठला. या भयाण महापुरामुळे पुरात अडकलेले हजारो नागरिक मदतीसाठी याचना करू लागले. परंतु, सुरुवातीच्या टप्प्यात तितकीशी यंत्रणा नव्हती. काही तास पूरस्थिती स्थिर होती. पुन्हा पाण्याची पातळी वाढली आणि काही भागात सुमारे १५ फुटापर्यंत पुराचे पाणी शिरले. तोपर्यंत मदतीचा कोणताही आधार नव्हता.

जेव्हा पुराचे पाणी ओसरू लागले तेव्हा आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्हाप्रमुख सचिन कदम, शहरप्रमुख उमेश सकपाळ, नगरसेवक शशिकांत मोदी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडल अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पुरात अडकलेल्यांना मदत देण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ एनआरडीएफसह पुणे येथील आर्मी पथक, कोस्टगार्ड पथक व बोटींना पाचारण केले. त्यांच्या सोबत सुभाष पाकळे फाउंडेशन सावर्डे, हेल्पिंग हॅन्ड, रत्नदुर्ग माऊटेनिअर्स, राजू काकडे हेल्प फाउंडेशन, जिद्दी माऊटेनिअर्स आदींनी बचाव कार्यास सुरुवात केली. तोपर्यंत महापुराचे पाणी बसेचसे कमी झाले होते.

दरवर्षी पावसाळ्यात महापुराच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासन व महसूल विभाग आपत्ती व्यवस्थापन कक्ष व पथक स्थापन करते. त्याशिवाय बाजारपेठेत जागोजागी मोटार बोटी, तसेच बाजारपूल व गोवळकोट येथेही बोट सज्ज ठेवली जाते. मात्र, यावेळी कोणाचा कोणाला थांगपत्ता नव्हता. प्रशासनही आताच्या महापुरापुढे हतबल झाल्याचे चित्र होते. त्यामुळे बाजारपेठेत अडकलेल्या कामगार व नागरिकांना तसेच अतिशय असुरक्षित असलेल्या मजरेकाशी, पेठमाप, गोवळकोट येथील नागरिकांना बाहेर काढणे शक्य झाले नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.