शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

प्रशासनाच्या बेफिकिरीमुळेच महापुराचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : गेले आठवडाभर पाऊस बरसतोय. तीन दिवसांपासून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासनाला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : गेले आठवडाभर पाऊस बरसतोय. तीन दिवसांपासून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासनाला या सगळ्याची माहिती नव्हतीच असे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यातच कोळकेवाडी येथून कोयनेच्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्या पाण्यामुळेच महापुराच्या प्रवाहाचा वेग वाढला आणि अतोनात नुकसान झाले. या परिस्थितीला निव्वळ प्रशासकीय अधिकाऱ्यांची बेफिकिरी कारणीभूत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांसह नागरिकांमधून केला जात आहे.

चिपळूण शहरासह खेर्डीमध्ये पूर इतका वाढला की, सुरुवातीला घरांमध्ये पाणी शिरले. इतकेच नव्हे तर घरांच्या पोटमाळ्यापर्यंत पाणी पोहोचू लागले. यामुळे या घरांमधील नागरिक जीवाच्या आकांताने मदतीसाठी टाहो फोडू लागले. तर दुसरीकडे इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले. यामुळे नागरिकांनी टेरेस गाठला. या भयाण महापुरामुळे पुरात अडकलेले हजारो नागरिक मदतीसाठी याचना करू लागले. परंतु, सुरुवातीच्या टप्प्यात तितकीशी यंत्रणा नव्हती. काही तास पूरस्थिती स्थिर होती. पुन्हा पाण्याची पातळी वाढली आणि काही भागात सुमारे १५ फुटापर्यंत पुराचे पाणी शिरले. तोपर्यंत मदतीचा कोणताही आधार नव्हता.

जेव्हा पुराचे पाणी ओसरू लागले तेव्हा आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्हाप्रमुख सचिन कदम, शहरप्रमुख उमेश सकपाळ, नगरसेवक शशिकांत मोदी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडल अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पुरात अडकलेल्यांना मदत देण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ एनआरडीएफसह पुणे येथील आर्मी पथक, कोस्टगार्ड पथक व बोटींना पाचारण केले. त्यांच्या सोबत सुभाष पाकळे फाउंडेशन सावर्डे, हेल्पिंग हॅन्ड, रत्नदुर्ग माऊटेनिअर्स, राजू काकडे हेल्प फाउंडेशन, जिद्दी माऊटेनिअर्स आदींनी बचाव कार्यास सुरुवात केली. तोपर्यंत महापुराचे पाणी बसेचसे कमी झाले होते.

दरवर्षी पावसाळ्यात महापुराच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासन व महसूल विभाग आपत्ती व्यवस्थापन कक्ष व पथक स्थापन करते. त्याशिवाय बाजारपेठेत जागोजागी मोटार बोटी, तसेच बाजारपूल व गोवळकोट येथेही बोट सज्ज ठेवली जाते. मात्र, यावेळी कोणाचा कोणाला थांगपत्ता नव्हता. प्रशासनही आताच्या महापुरापुढे हतबल झाल्याचे चित्र होते. त्यामुळे बाजारपेठेत अडकलेल्या कामगार व नागरिकांना तसेच अतिशय असुरक्षित असलेल्या मजरेकाशी, पेठमाप, गोवळकोट येथील नागरिकांना बाहेर काढणे शक्य झाले नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.