शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या बेफिकिरीमुळेच महापुराचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : गेले आठवडाभर पाऊस बरसतोय. तीन दिवसांपासून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासनाला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : गेले आठवडाभर पाऊस बरसतोय. तीन दिवसांपासून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासनाला या सगळ्याची माहिती नव्हतीच असे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यातच कोळकेवाडी येथून कोयनेच्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्या पाण्यामुळेच महापुराच्या प्रवाहाचा वेग वाढला आणि अतोनात नुकसान झाले. या परिस्थितीला निव्वळ प्रशासकीय अधिकाऱ्यांची बेफिकिरी कारणीभूत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांसह नागरिकांमधून केला जात आहे.

चिपळूण शहरासह खेर्डीमध्ये पूर इतका वाढला की, सुरुवातीला घरांमध्ये पाणी शिरले. इतकेच नव्हे तर घरांच्या पोटमाळ्यापर्यंत पाणी पोहोचू लागले. यामुळे या घरांमधील नागरिक जीवाच्या आकांताने मदतीसाठी टाहो फोडू लागले. तर दुसरीकडे इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले. यामुळे नागरिकांनी टेरेस गाठला. या भयाण महापुरामुळे पुरात अडकलेले हजारो नागरिक मदतीसाठी याचना करू लागले. परंतु, सुरुवातीच्या टप्प्यात तितकीशी यंत्रणा नव्हती. काही तास पूरस्थिती स्थिर होती. पुन्हा पाण्याची पातळी वाढली आणि काही भागात सुमारे १५ फुटापर्यंत पुराचे पाणी शिरले. तोपर्यंत मदतीचा कोणताही आधार नव्हता.

जेव्हा पुराचे पाणी ओसरू लागले तेव्हा आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्हाप्रमुख सचिन कदम, शहरप्रमुख उमेश सकपाळ, नगरसेवक शशिकांत मोदी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडल अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पुरात अडकलेल्यांना मदत देण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ एनआरडीएफसह पुणे येथील आर्मी पथक, कोस्टगार्ड पथक व बोटींना पाचारण केले. त्यांच्या सोबत सुभाष पाकळे फाउंडेशन सावर्डे, हेल्पिंग हॅन्ड, रत्नदुर्ग माऊटेनिअर्स, राजू काकडे हेल्प फाउंडेशन, जिद्दी माऊटेनिअर्स आदींनी बचाव कार्यास सुरुवात केली. तोपर्यंत महापुराचे पाणी बसेचसे कमी झाले होते.

दरवर्षी पावसाळ्यात महापुराच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासन व महसूल विभाग आपत्ती व्यवस्थापन कक्ष व पथक स्थापन करते. त्याशिवाय बाजारपेठेत जागोजागी मोटार बोटी, तसेच बाजारपूल व गोवळकोट येथेही बोट सज्ज ठेवली जाते. मात्र, यावेळी कोणाचा कोणाला थांगपत्ता नव्हता. प्रशासनही आताच्या महापुरापुढे हतबल झाल्याचे चित्र होते. त्यामुळे बाजारपेठेत अडकलेल्या कामगार व नागरिकांना तसेच अतिशय असुरक्षित असलेल्या मजरेकाशी, पेठमाप, गोवळकोट येथील नागरिकांना बाहेर काढणे शक्य झाले नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.