शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावे ‘जलयुक्त शिवारा’त समाविष्ट

By admin | Updated: February 10, 2015 00:01 IST

राजापूर तालुका : जिल्ह्यात ४५ गावांची निवड

राजापूर : राज्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने सुरु केलेली जलयुक्त शिवार अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ४५ गावांची निवड करण्यात आली असून, त्यसामध्ये राजापूर तालुक्यातील तीव्र टंचाईची पाच गावे निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक या गावांचा समावेश आहे.दरवर्षी राज्याला उन्हाळी दिवसात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. हजारो गावातील टंचाई व पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट यामुळे शासनही मेटाकुटीला येते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे.पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचणाऱ्या गावांचा विचार करत, त्यांना भेडसावणारी टंचाई दूर करणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यानुसार, जास्तीत जास्त पाणी गावच्या शिवारात अडवणे, भूगर्भाती पाण्याच्या पातळीत वाढ करणे, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाण्यासमवेत पिण्याच्या पाण्याच्या वापर क्षमतेत वाढ करणे, बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पूर्ववत सुरु करणे, विकेंद्रीत पाणीसाठे कमी करणे, पाणी साठवण्याची क्षमता वाढवून नवीन कामे हाती घेणे, निकामी जलस्त्रोताची क्षमता वाढवणे, गाळ काढणे, वृक्षलागवड अशी अनेक कामे केली जाणार आहेत.या अभियानांतर्गत गावांची निवड करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यात ४५ गावे प्रथम निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे.राजापूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पाच निवडण्यात आलेल्या गावांमध्ये मार्च अखेर ज्या गावांना पाण्याची तीव्र टंचाईच्या झळा पोहोचतात व तात्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो अशा ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक या गावांचा समावेश आहे. आता शासनाच्या निकषांतून या गावांची पाहणी करुन ठरल्यानुसार कामे केली जाणार आहेत. त्यामुळे, या परिसरात भविष्यात गावातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल, अशी आशा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)+++ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक गावांचा समावेश.राज्यातील टंचाई सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान घेतले हाती.पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचवणाऱ्या गावांचा विचार करत त्यांना भेडसावणारी टंचाई दूर करण्याचा उद्देश.