शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

पाच गावे ‘जलयुक्त शिवारा’त समाविष्ट

By admin | Updated: February 10, 2015 00:01 IST

राजापूर तालुका : जिल्ह्यात ४५ गावांची निवड

राजापूर : राज्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने सुरु केलेली जलयुक्त शिवार अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ४५ गावांची निवड करण्यात आली असून, त्यसामध्ये राजापूर तालुक्यातील तीव्र टंचाईची पाच गावे निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक या गावांचा समावेश आहे.दरवर्षी राज्याला उन्हाळी दिवसात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. हजारो गावातील टंचाई व पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट यामुळे शासनही मेटाकुटीला येते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे.पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचणाऱ्या गावांचा विचार करत, त्यांना भेडसावणारी टंचाई दूर करणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यानुसार, जास्तीत जास्त पाणी गावच्या शिवारात अडवणे, भूगर्भाती पाण्याच्या पातळीत वाढ करणे, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाण्यासमवेत पिण्याच्या पाण्याच्या वापर क्षमतेत वाढ करणे, बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पूर्ववत सुरु करणे, विकेंद्रीत पाणीसाठे कमी करणे, पाणी साठवण्याची क्षमता वाढवून नवीन कामे हाती घेणे, निकामी जलस्त्रोताची क्षमता वाढवणे, गाळ काढणे, वृक्षलागवड अशी अनेक कामे केली जाणार आहेत.या अभियानांतर्गत गावांची निवड करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यात ४५ गावे प्रथम निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे.राजापूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पाच निवडण्यात आलेल्या गावांमध्ये मार्च अखेर ज्या गावांना पाण्याची तीव्र टंचाईच्या झळा पोहोचतात व तात्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो अशा ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक या गावांचा समावेश आहे. आता शासनाच्या निकषांतून या गावांची पाहणी करुन ठरल्यानुसार कामे केली जाणार आहेत. त्यामुळे, या परिसरात भविष्यात गावातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल, अशी आशा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)+++ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक गावांचा समावेश.राज्यातील टंचाई सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान घेतले हाती.पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचवणाऱ्या गावांचा विचार करत त्यांना भेडसावणारी टंचाई दूर करण्याचा उद्देश.