शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

पाच गावे ‘जलयुक्त शिवारा’त समाविष्ट

By admin | Updated: February 10, 2015 00:01 IST

राजापूर तालुका : जिल्ह्यात ४५ गावांची निवड

राजापूर : राज्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने सुरु केलेली जलयुक्त शिवार अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ४५ गावांची निवड करण्यात आली असून, त्यसामध्ये राजापूर तालुक्यातील तीव्र टंचाईची पाच गावे निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक या गावांचा समावेश आहे.दरवर्षी राज्याला उन्हाळी दिवसात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. हजारो गावातील टंचाई व पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट यामुळे शासनही मेटाकुटीला येते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे.पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचणाऱ्या गावांचा विचार करत, त्यांना भेडसावणारी टंचाई दूर करणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यानुसार, जास्तीत जास्त पाणी गावच्या शिवारात अडवणे, भूगर्भाती पाण्याच्या पातळीत वाढ करणे, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाण्यासमवेत पिण्याच्या पाण्याच्या वापर क्षमतेत वाढ करणे, बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पूर्ववत सुरु करणे, विकेंद्रीत पाणीसाठे कमी करणे, पाणी साठवण्याची क्षमता वाढवून नवीन कामे हाती घेणे, निकामी जलस्त्रोताची क्षमता वाढवणे, गाळ काढणे, वृक्षलागवड अशी अनेक कामे केली जाणार आहेत.या अभियानांतर्गत गावांची निवड करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यात ४५ गावे प्रथम निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे.राजापूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पाच निवडण्यात आलेल्या गावांमध्ये मार्च अखेर ज्या गावांना पाण्याची तीव्र टंचाईच्या झळा पोहोचतात व तात्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो अशा ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक या गावांचा समावेश आहे. आता शासनाच्या निकषांतून या गावांची पाहणी करुन ठरल्यानुसार कामे केली जाणार आहेत. त्यामुळे, या परिसरात भविष्यात गावातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल, अशी आशा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)+++ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक गावांचा समावेश.राज्यातील टंचाई सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान घेतले हाती.पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचवणाऱ्या गावांचा विचार करत त्यांना भेडसावणारी टंचाई दूर करण्याचा उद्देश.