शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

लोकशाही दिनात पाच तक्रारी निवारण

By admin | Updated: December 16, 2014 00:11 IST

वैयक्तिक व सामाजिक प्रश्नांसंदर्भात तक्रार अर्ज आले.

कुडाळ : कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात आलेल्या पाच तक्रार अर्जांचे योग्यप्रकारे निवारण केले जाईल, असे आश्वासन तहसीलदार जयराज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिले. परंतु शहरातील वाहतूक समस्या, स्वच्छतागृहे, अतिक्रमणे याबाबत अजूनही कोणत्याच ठोस कारवाईकरिता प्रशासन कोणतीच पावले उचलत नसल्याचे दिसून आले. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित केलेल्या या लोकशाही दिनाला तहसीलदार देशमुख यांच्यासह गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या लोकशाही दिनात एकूण पाच वैयक्तिक व सामाजिक प्रश्नांसंदर्भात तक्रार अर्ज आले. यामध्ये वालावल येथील इंदिरा वालावलकर यांनी न्यायालयाचे आदेश असतानाही ग्रामपंचायत आपल्या नावावर घर करीत नाही, असा तक्रार अर्ज दिला. तर लवू मयेकर यांनी इंदिरा आवास योजनेसाठी संमतीपत्र खोटे दिल्याबाबत, कसाल येथील रवींद्र कसालकर यांनी कसाल मागासवर्गीय वस्तीमध्ये वाटेवर कुंपण घालून येथील नळपाणी योजना मोडून टाकलेल्या तेथीलच १३ जणांवर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दिले. तर बांबर्डे येथील तुकाराम धुरी यांनी सातबारात दुरुस्ती करण्याबाबत अर्ज दिला होता. यावेळी शहरातील वाहतूक कोंडी समस्या, स्वच्छतागृहे आणि अतिक्रमणांबाबत काय उपाययोजना सुरू आहे, असे विचारले असता, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ योग्य ती कारवाई सुरू आहे, अशी माहिती दिली. तसेच कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचे काम शासनाच्या निकषात न राहता निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून या नव्याने बांधलेल्या संरक्षक भिंतींच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी तक्रार अर्जातून दिली. (प्रतिनिधी)जात प्रमाणपत्रात खोटी माहिती : कदमहिर्लोक ग्रामपंचायत सदस्या अश्विनी चव्हाण यांनी निवडणूक कमिशनकडे सादर केलेल्या जात प्रमाणपत्रात खोटी माहिती दिली असून त्यासंदर्भात चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असा तक्रार अर्ज मोहन कदम यांनी दिला.