शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

‘सेतू’मधील पाच कर्मचाऱ्यांचे राजीनामे

By admin | Updated: July 8, 2017 17:57 IST

देवरूखमधील प्रकार : तहसीलदारांकडे मागणी

आॅनलाईन लोकमत देवरूख (जि. रत्नागिरी), दि. ८ : अपुरे कर्मचारी व संगणकांची संख्यादेखील मर्यादित असल्याने कामात आधीच अडचणी, त्यातच राजकीय पदाधिकारी व लोक्रप्रतिनिधींचा देवरूखमधील ‘सेतू’ कार्यालयात वाढलेला हस्तक्षेप याला कंटाळून या कार्यालयातील ४ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. या कर्मचाऱ्यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला व मानहानीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे निवेदन तहसीलदारांकडे सादर केले आहे. यामुळे ‘सेतू’चा कारभार गेले दोन दिवस तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीच चालवत आहेत.

शैक्षणिक कामासाठी उत्पन्न, नॉनक्रिमीलेअर, अधिवास, राष्ट्रीयत्व व जातीचा दाखल्यांची आवश्यकता असते. पालक विहीत नमुन्यामध्ये आपला प्रस्ताव सेतू कार्यालयात दाखल करतात. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नागरिकांना संबंधित दाखला दिला जातो. दाखल्याविना नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही वर्षापूर्वी सेतू कार्यालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, कार्यालयातील रिक्त पदे तसेच संगणकांचा अभाव यामुळे वाढलेले कामकाज करताना संबंधित कर्मचाऱ्यांना दमछाक होत होती.

कार्यालयात प्रामाणिक काम करत असतानाही राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दबावाला व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून राजीनामे देण्याची वेळ आमच्यावर आल्याची कैफियत या निवेदनात येथील कर्मचारी निधी चव्हाण, प्राची भुवड, स्वप्नील मोरे, सोनाली करंडे यांनी मांडली आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढाच या निवेदनाच्या माध्यमातून देवरुख तहसीलदारांकडे सादर केला आहे.

मे महिन्यापासून सेतू कार्यालयातून विविध प्रकारचे दाखले देण्याचे प्रमाण वाढले आहे. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मात्र, तैनात कर्मचारी सुटीच्या दिवशीही कार्यालयात हजर राहून कामाचा निपटारा करतात. या कार्यालयाचे काम सुरळीत व्हावे यासाठी हे कर्मचारी सदैव प्रयत्नशील असतात. सध्या कार्यालयात दाखल्यांची संख्या जास्त व काम करण्यासाठी केवळ दोनच संगणक संच उपलब्ध आहेत. त्यातच इंटरनेट सुविधाही बंद असल्याने कामामध्ये अडचणी येतात.प्रशासन राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या बाजूने राहणार असेल तर यापुढे ‘सेतू’ कार्यालयात काम करणे शक्य नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा कार्यालयातील हस्तक्षेप प्रचंड प्रमाणात वाढला असून, त्यांच्याकडून दबावतंत्राचाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिस्थितीत कार्यालयात काम करणे शक्य नसल्याचे या चार कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

यावर आता तहसीलदार कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. ‘सेतू’तील कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने मंगळवारी व बुधवारी सेतू कार्यालयाचा कारभार तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चालवला. त्यामुळे सेतूचा प्रश्न आता देवरूखात चिघळणार आहे.