शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

‘सेतू’मधील पाच कर्मचाऱ्यांचे राजीनामे

By admin | Updated: July 8, 2017 17:57 IST

देवरूखमधील प्रकार : तहसीलदारांकडे मागणी

आॅनलाईन लोकमत देवरूख (जि. रत्नागिरी), दि. ८ : अपुरे कर्मचारी व संगणकांची संख्यादेखील मर्यादित असल्याने कामात आधीच अडचणी, त्यातच राजकीय पदाधिकारी व लोक्रप्रतिनिधींचा देवरूखमधील ‘सेतू’ कार्यालयात वाढलेला हस्तक्षेप याला कंटाळून या कार्यालयातील ४ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. या कर्मचाऱ्यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला व मानहानीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे निवेदन तहसीलदारांकडे सादर केले आहे. यामुळे ‘सेतू’चा कारभार गेले दोन दिवस तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीच चालवत आहेत.

शैक्षणिक कामासाठी उत्पन्न, नॉनक्रिमीलेअर, अधिवास, राष्ट्रीयत्व व जातीचा दाखल्यांची आवश्यकता असते. पालक विहीत नमुन्यामध्ये आपला प्रस्ताव सेतू कार्यालयात दाखल करतात. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नागरिकांना संबंधित दाखला दिला जातो. दाखल्याविना नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही वर्षापूर्वी सेतू कार्यालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, कार्यालयातील रिक्त पदे तसेच संगणकांचा अभाव यामुळे वाढलेले कामकाज करताना संबंधित कर्मचाऱ्यांना दमछाक होत होती.

कार्यालयात प्रामाणिक काम करत असतानाही राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दबावाला व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून राजीनामे देण्याची वेळ आमच्यावर आल्याची कैफियत या निवेदनात येथील कर्मचारी निधी चव्हाण, प्राची भुवड, स्वप्नील मोरे, सोनाली करंडे यांनी मांडली आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढाच या निवेदनाच्या माध्यमातून देवरुख तहसीलदारांकडे सादर केला आहे.

मे महिन्यापासून सेतू कार्यालयातून विविध प्रकारचे दाखले देण्याचे प्रमाण वाढले आहे. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मात्र, तैनात कर्मचारी सुटीच्या दिवशीही कार्यालयात हजर राहून कामाचा निपटारा करतात. या कार्यालयाचे काम सुरळीत व्हावे यासाठी हे कर्मचारी सदैव प्रयत्नशील असतात. सध्या कार्यालयात दाखल्यांची संख्या जास्त व काम करण्यासाठी केवळ दोनच संगणक संच उपलब्ध आहेत. त्यातच इंटरनेट सुविधाही बंद असल्याने कामामध्ये अडचणी येतात.प्रशासन राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या बाजूने राहणार असेल तर यापुढे ‘सेतू’ कार्यालयात काम करणे शक्य नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा कार्यालयातील हस्तक्षेप प्रचंड प्रमाणात वाढला असून, त्यांच्याकडून दबावतंत्राचाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिस्थितीत कार्यालयात काम करणे शक्य नसल्याचे या चार कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

यावर आता तहसीलदार कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. ‘सेतू’तील कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने मंगळवारी व बुधवारी सेतू कार्यालयाचा कारभार तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चालवला. त्यामुळे सेतूचा प्रश्न आता देवरूखात चिघळणार आहे.