शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

फिटनेस फंडा : उत्साह वाढवा, उन्माद नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

आरोग्यदायिनी प्रयोगशीलता, यातून तो हमखास खात्रीचे मार्ग दाखवतो. त्यावर नियंत्रण करणं, त्याप्रमाणं व्यक्तिगत, सामूहिक आणि देशिक वर्तणूक अत्यंत महत्त्वाची ...

आरोग्यदायिनी प्रयोगशीलता, यातून तो हमखास खात्रीचे मार्ग दाखवतो. त्यावर नियंत्रण करणं, त्याप्रमाणं व्यक्तिगत, सामूहिक आणि देशिक वर्तणूक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. तो सर्वांना ‘सावधगिरी’ साठीचा इशारा आहे. या संभाव्य धोक्यातून सर्वसामान्यजन जास्त भरडला जात आहे. त्यानं कशी काळजी घ्यावी, एकीकडं राजकीय घडामोडीच्या वातावरणात गर्दी नियंत्रणाचं तंत्र सुटतं. दुसरं धार्मिक श्रद्धांच्या अंतरंगात गावाकडं धाव घेणं, तिसरं खेळांच्या मैदानात प्रेक्षकांचा उन्माद वाढून गर्दी करणं, या सर्व गोष्टी प्रशासनाच्या आणि आयोजकांच्याही हाताबाहेर, नियंत्रणाबाहेर जातात. अर्थात, या सर्व गोष्टी जनजीवनातील सर्वश्रेष्ठ श्रद्धा, विश्वास, सामूहिकता, अस्तित्व, संस्कार, आदरभाव, अर्थप्राप्ती, अर्थगुंतवणूक आणि जीवनातलं चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यकच असतं, हे निर्विवाद सत्य आहे. त्यात मानवीय सामुदायिक आरोग्याचा ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या सामुदायिक निर्मितीक्षम मानसशास्त्राचा सिद्धांतही आहे. तो जपायलाच हवा. मात्र, त्याच वेळेस आपल्या अस्तित्वाला सुरक्षिततेचा मुलामा देणाऱ्या आणि आपल्या आरोग्य संरक्षक यंत्रणाची जी आपला जीव धोक्यात घालून आपलं जीवन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यात त्यांना सारासार विवेकशक्ती वापरून, बऱ्याचदा ती गर्दीच्या मानसशास्त्रात हरवूनच जाते, ती जपायला हवी. त्यामुळं आपलं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या समुदायाचं अस्तित्व, आरोग्यमय रीतीनं जपलं जाईल.

या गर्दीच्या मानसशास्त्रात सर्वसामान्यपणे सामान्य माणूसच अगोदर भरडला जातो. कारण तोच आपल्या गरजेनुसार, क्षणभराच्या संवेदनशील भावनेनं गर्दीच्या त्या क्षणिक क्षणात सहभागी होण्यास उन्मादक अवस्थेत सहभागी होतो. त्यालाही बरीच मानसशास्त्रीय सामुदायिक कारणं आहेत. बऱ्याचदा लॉकडाऊनमुळं त्याला जीवनावश्यक वस्तू मिळू शकत नाहीत. त्यामुळंही तो गर्दी करतो. अर्थात, संसर्ग कोविड-१९ ची साखळी तोडण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसंगी हा तोडगाही अपरिहार्य भाग ठरतो. म्हणून सर्वांनी सर्वप्रथम १) गर्दी करू नये. शासकीय नियम पाळावेतच तेच आरोग्याचा हमखास हमी देणारे आहे. सुरक्षित अंतर ठेवावंच ठेवावं. २) लसीकरण मोकळ्या मनानं करून घ्यावं. ३) मुखनासिका पट्टी (मास्क) वापरावी. ४) हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत. ५) तपासण्या करून घ्याव्यात. शंकेला वाव ठेवू नये. ६) कुठंही थुंकू नये. ७) पाणी उकळूनच प्यावे. ८) अनावश्यक प्रवास करू नये. ९) या सर्वांचा सर्वसामान्य जनांवर आणि शासनावरही आर्थिक ताण येतो. अर्थव्यवस्था मजबूत राहावी, यासाठी आपण काटकसरीचं तंत्र जे या काळात शिकतो आहोत. तो पाळावा. काही महिन्यांची ‘दक्षता’ आपल्या सर्वांना ‘स्वस्थता’ प्रदान करणार आहे. कारण आपण आरोग्यसमृद्ध राहू, तर सगळं छान होणारच आहे. कारण जगात चांगलं घडणं, ते अनुभवणं हाच तर आरोग्याचा फिटनेस फंडा आहे.

-डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी