शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

फिटनेस फंडा : उत्साह वाढवा, उन्माद नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

आरोग्यदायिनी प्रयोगशीलता, यातून तो हमखास खात्रीचे मार्ग दाखवतो. त्यावर नियंत्रण करणं, त्याप्रमाणं व्यक्तिगत, सामूहिक आणि देशिक वर्तणूक अत्यंत महत्त्वाची ...

आरोग्यदायिनी प्रयोगशीलता, यातून तो हमखास खात्रीचे मार्ग दाखवतो. त्यावर नियंत्रण करणं, त्याप्रमाणं व्यक्तिगत, सामूहिक आणि देशिक वर्तणूक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. तो सर्वांना ‘सावधगिरी’ साठीचा इशारा आहे. या संभाव्य धोक्यातून सर्वसामान्यजन जास्त भरडला जात आहे. त्यानं कशी काळजी घ्यावी, एकीकडं राजकीय घडामोडीच्या वातावरणात गर्दी नियंत्रणाचं तंत्र सुटतं. दुसरं धार्मिक श्रद्धांच्या अंतरंगात गावाकडं धाव घेणं, तिसरं खेळांच्या मैदानात प्रेक्षकांचा उन्माद वाढून गर्दी करणं, या सर्व गोष्टी प्रशासनाच्या आणि आयोजकांच्याही हाताबाहेर, नियंत्रणाबाहेर जातात. अर्थात, या सर्व गोष्टी जनजीवनातील सर्वश्रेष्ठ श्रद्धा, विश्वास, सामूहिकता, अस्तित्व, संस्कार, आदरभाव, अर्थप्राप्ती, अर्थगुंतवणूक आणि जीवनातलं चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यकच असतं, हे निर्विवाद सत्य आहे. त्यात मानवीय सामुदायिक आरोग्याचा ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या सामुदायिक निर्मितीक्षम मानसशास्त्राचा सिद्धांतही आहे. तो जपायलाच हवा. मात्र, त्याच वेळेस आपल्या अस्तित्वाला सुरक्षिततेचा मुलामा देणाऱ्या आणि आपल्या आरोग्य संरक्षक यंत्रणाची जी आपला जीव धोक्यात घालून आपलं जीवन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यात त्यांना सारासार विवेकशक्ती वापरून, बऱ्याचदा ती गर्दीच्या मानसशास्त्रात हरवूनच जाते, ती जपायला हवी. त्यामुळं आपलं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या समुदायाचं अस्तित्व, आरोग्यमय रीतीनं जपलं जाईल.

या गर्दीच्या मानसशास्त्रात सर्वसामान्यपणे सामान्य माणूसच अगोदर भरडला जातो. कारण तोच आपल्या गरजेनुसार, क्षणभराच्या संवेदनशील भावनेनं गर्दीच्या त्या क्षणिक क्षणात सहभागी होण्यास उन्मादक अवस्थेत सहभागी होतो. त्यालाही बरीच मानसशास्त्रीय सामुदायिक कारणं आहेत. बऱ्याचदा लॉकडाऊनमुळं त्याला जीवनावश्यक वस्तू मिळू शकत नाहीत. त्यामुळंही तो गर्दी करतो. अर्थात, संसर्ग कोविड-१९ ची साखळी तोडण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसंगी हा तोडगाही अपरिहार्य भाग ठरतो. म्हणून सर्वांनी सर्वप्रथम १) गर्दी करू नये. शासकीय नियम पाळावेतच तेच आरोग्याचा हमखास हमी देणारे आहे. सुरक्षित अंतर ठेवावंच ठेवावं. २) लसीकरण मोकळ्या मनानं करून घ्यावं. ३) मुखनासिका पट्टी (मास्क) वापरावी. ४) हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत. ५) तपासण्या करून घ्याव्यात. शंकेला वाव ठेवू नये. ६) कुठंही थुंकू नये. ७) पाणी उकळूनच प्यावे. ८) अनावश्यक प्रवास करू नये. ९) या सर्वांचा सर्वसामान्य जनांवर आणि शासनावरही आर्थिक ताण येतो. अर्थव्यवस्था मजबूत राहावी, यासाठी आपण काटकसरीचं तंत्र जे या काळात शिकतो आहोत. तो पाळावा. काही महिन्यांची ‘दक्षता’ आपल्या सर्वांना ‘स्वस्थता’ प्रदान करणार आहे. कारण आपण आरोग्यसमृद्ध राहू, तर सगळं छान होणारच आहे. कारण जगात चांगलं घडणं, ते अनुभवणं हाच तर आरोग्याचा फिटनेस फंडा आहे.

-डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी