शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:30 IST

रत्नागिरी : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागल्याने, त्याचा परिणाम खाेल समुद्रातील मासेमारीवर झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळे समुद्रात उंच ...

रत्नागिरी : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागल्याने, त्याचा परिणाम खाेल समुद्रातील मासेमारीवर झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळे समुद्रात उंच लाटा उसळू लागल्याने, अनेक नौका समुद्रातून अनेक नौका माघारी परतल्या आहेत, तर अनेक नौकांनी समुद्रात जाणे टाळले. त्यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाली आहे.

चाैपदरीकरणाचे काम जोरात

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जोरदारपणे सुरू आहे. गेली अनेक वर्षे हे चौपदरीकरणाचे काम होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू हाेती. मात्र, आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. हातखंबा ते निवळी दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

रस्त्याची कामे मार्गी लावण्याची मागणी

चिपळूण : शहरातील अनेक रस्त्यांची कामे रखडली असून, त्यासाठी किती पाठपुरावा करावा, रामतीर्थ तलाव ते महाराष्ट्र हायस्कूलचा रस्ता गेली दोन वर्षे अर्धवट स्थितीत आहे. पाग भागातील रस्त्यांची तीच अवस्था आहे. आता नागरिकांना खरे काय ते समजू लागले आहे. त्यासाठी रस्त्याची कामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाई लांबणीवर

रत्नागिरी : या वर्षीही जिल्हा परिषद कृषी विभागाकडून गावोगावी लोकसहभागातून बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. लांबलेल्या पावसामुळे डिसेंबर महिन्यात या कामाला सुरुवात झाली. या बंधाऱ्यांमुळे आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने, पाणीटंचाई दूर जाण्यास या बंधाऱ्यांची मदत मिळाली आहे.

प्रवास करणे धोकादायक

रत्नागिरी : शहरातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीला लागून असलेल्या चर्मालय ते धनजीनाकापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक व त्रासदायक ठरत आहे. केवळ खोदाई केलेल्या रस्त्याच्या कडेचे डांबरीकरण करण्यात आले आहे.

चायनीजबद्दल नागरिकांमध्ये नाराजी

चिपळूण : चाशहर परिसरात ठिकठिकाणी चायनीज पदार्थ विक्रीचे व्यवसाय सुरू आहेत. या पदार्थांची बेकायदेशीरपणे विक्री सुरू असून, आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत असतानाही अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शासन अटी, नियमांकडे दुर्लक्ष

रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने विशेष लक्ष घालून काही नियम व अटींचे पालन करण्याचे आदेश जनतेला दिले आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अनेेक जण सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याचे समोर आले आहे.