शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

खलाशी न परतल्याने मासेमारी अद्याप ठप्पच

By admin | Updated: August 24, 2016 23:44 IST

नौका बंदरातच उभ्या: नौकामालकांसमोर भवितव्याचा मोठा प्रश्न--मच्छिमारांचे भवितव्य अंधारमय भाग-१

रहिम दलाल-- रत्नागिरी =--खलाशी नसल्याने अनेक मासेमारी नौका बंदरामध्ये नांगरावर उभ्या आहेत. लाखो रुपयांची रक्कम आगाऊ घेऊनही खलाशी न परतल्याने नौकामालकांसमोर भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.पर्ससीन नेट मासेमारीवर बंदी घालून शासनाने मच्छिमारांच्या तोंडचा घास पळवला होता. त्यामुळे आज मच्छिमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सर्वांत मोठी अडचण होती आर्थिक पाठबळाची! बँकेकडे हात पसरून ही समस्या दूर केल्यानंतर आता खलाशांची समस्या निर्माण झाली आहे. जानेवारीनंतर पर्ससीन नेटने मासेमारी करणे बंदी घालण्यात आल्याने किनारपट्टीवरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. त्याचा परिणाम इतरही संबंधित व्यवसायांवर झाला होता. लाखो रुपयांची कर्ज घेतलेल्या नौका मालकांसह टेम्पो मालक, पानपट्टीवाले, मच्छी विक्रेते, मासे कापणाऱ्या महिला तसेच बाजारपेठेतील इतर व्यावसायिकांवर याचा परिणाम झाला असून, सुमारे ७५०० कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. बंदीमुळे गेले सहा महिने खोल समुद्रातील मासेमारी ठप्प झाली होती. त्यावेळी नौकामालकांनी खलाशांना सुमारे तीन महिने तरी मासेमारीविना पगार दिला, शिवाय त्यांच्या खाण्या-पिण्याचाही खर्च उचलला होता. त्यावेळी अनेक खलाशांनी पलायनही केले होते. त्यांना दिलेली अ‍ॅडव्हान्स रक्कमही नौका मालकांना त्यांच्याकडून वसूल करता आली नसल्याने ते आर्थिक अडचणी आले होते. काही खलाशांनी मासेमारी सुरु झाल्यानंतर येणार असल्याचा शब्द मालकांना दिला होता. मात्र, मासेमारी १ आॅगस्टपासून सुरु झाली असली तरी अनेक खलाशी अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त नौका आज नांगरावर आहेत. लाखो रुपये आगाऊ देऊनही खलाशी न आल्याने नौकामालक अडचणीत सापडले आहेत. सहा महिने मासेमारी बंद असल्याने त्यांच्याकडे नवीन खलाशांना देण्यासाठीही पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे.पर्ससीन नेटने मासेमारी करण्यावर बंदी आदेश दिल्याने मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने ते आर्थिक अडचणी सापडले आहेत. तीन महिने पर्ससीन नेट मासेमारी बंद राहिल्याने मच्छीमार संकटात सापडले असून, त्याचे परिणाम खोलवर झाले आहेत. आज त्यांच्याकडे अन्य खलाशांना देण्यासाठी पैसे नाहीत.