शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

दूषित पाण्यामुळे मासेमारी संकटात

By admin | Updated: July 20, 2014 22:45 IST

ग्रामस्थ आक्रमक : तीव्र आंदोलनाचा इशारा

चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याबाबत अखिल दाभोळखाडी भोई समाज कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. वाशिष्ठी नदीत केमिकल सोडल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत संबंधितांनी योग्य दखल न घेतल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अध्यक्ष आर. आर. जाधव यांनी दिला.अखिल दाभोळखाडी भोई समाज, मुंबई शहर व ग्रामीण कार्यकारिणीची सभा गोवळकोट येथील भोईराज सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. लोटे एमआयडीसीतील केमिकल कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे वाशिष्ठी नदीपात्रातील मासे संपुष्टात आले आहेत. त्यामुळे पारंपरिक मासेमारी बंद झाली आहे. भोई समाजाचा मुख्य व्यवसाय अडचणीत आला आहे. होड्या, जाळ्यांसाठी घेतलेली कर्ज थकीत झाली आहेत. खाडीतील मासे बाजारात येत नसल्याने समुद्रातील मासळीचे दर वाढले आहेत. लोटे एमआयडीसीच्या सीईटीपीतून दूषित पाणी सोडणे बंद न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पारधी ,उदय जुवळे यांनी केले. यावेळी गोवळकोट सातगावचे अध्यक्ष मधुकर कासेकर, बबन कासेकर, मारुती मिंडे, चंद्रकांत कासेकर, राजेश सैतवडेकर, सचिन जुवळे, संतोष मिंडे, प्रमोद कासेकर, दीपक कासेकर आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत अखिल दाभोळखाडी मंडळाचे कायकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.(वार्ताहर)-गोवळकोट येथे अखिल दाभोळ खाडी भोई समाज कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय.- खाडी प्रदूषणमुक्त करण्याबाबत संबंधितांना निवेदन देण्याबाबत चर्चा. -नदीपात्रातील मासे मतुकीचे प्रमाण वाढतेय. या प्रकारामुळे परिसरातील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. - प्रदूषणामुळे दाभोळ खाडी परिसरात मासेमारी पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप करीत प्रदूषणकारी कंपन्यांनी योग्य मार्ग न स्वीकारल्यास अखिल दाभोळखाडी भोई समाज, मुंबई शहर व ग्रामीण कार्यकारिणीने संताप व्यक्त केला आहे.-गोवळकोट येथील बैठक प्रदूषणाच्या मुद्द्यावर गाजली. अशा सभांमध्ये नेहमी कंपन्यांना इशारा देण्यात यावा. ही संतापजनक गोष्ट असल्याचे व यापुढे प्रदूषणकारी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त मच्छिमारांनी केली आहे. निदान आता तरी काय करणार, याचे उत्तर हे बांधव संबंधितांकडे मागत आहेत.