शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

शेतकऱ्यांना मिळणार कमी दरात न्याहरी

By admin | Updated: June 17, 2016 00:47 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती : गरिबांसाठी राबवणार ‘लातूर पॅटर्न’

प्रकाश वराडकर --रत्नागिरी --रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यल्प दरात न्याहरी देण्याचा समितीचा मानस आहे. लातूर बाजार समितीच्या एक रुपयात भोजन पॅटर्ननुसार ही योजना असून, जूनअखेर होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल. ही माहिती बाजार समितीचे सभापती गजानन पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज शेतकरी खरेदी-विक्री व्यवहारांसाठी येतात. त्यांना समितीमार्फत एक रुपयात जेवण देण्याची योजना राबवण्यात आली आहे. त्यासाठी व्यापारी, अडते तसेच अन्य संबंधितांची मदत घेण्यात आली आहे. रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीनेही रुपयात नव्हे; तर पाच रुपयात तेथे येणाऱ्या शेतकऱ्यांना भोजन उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना आमदार उदय सामंत यांनी आपल्याला केली आहे, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.रत्नागिरी बाजार समितीच्या आवारात अत्यल्प दरात भोजन देणे शक्य आहे. मात्र, समितीच्या आवारात भाजी व शेतमालाचे व्यवहार हे सकाळी ७ ते ९ या दोन तासात होतात. दुपारच्या वेळी हे व्यवहार नसतात, त्यामुळे तेथे शेतकरीही नसतात. परिणामी भोजन देण्याची योजना येथे राबविता येणे कठीण आहे. मात्र, सकाळच्या वेळी शेतकऱ्यांना अत्यल्प दरात न्याहरी अर्थात चहा, नाश्ता उपलब्ध करून देणे शक्य आहे. तशी योजना राबवण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. त्याचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या संचालकांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. व्यापाऱ्यांबरोबरच जिल्हा बॅँकेचीही मदत घेतली जाऊ शकते, असेही ते म्हणाले. निवास व्यवस्थाकृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना सायंकाळी उशिर झाला तर त्यांच्या निवासाचीही व्यवस्था रत्नागिरीच्या समितीने २०१० मध्येच केली आहे. महिला व पुरुष असे दोन हॉल तयार करण्यात आले असून, प्रत्येक हॉलमध्ये दहा गाद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाशे शेतकऱ्यांना होणार लाभ!बाजार समितीच्या आवारात दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत शेतमालाची लिलाव प्रक्रिया होते. त्यावेळी पाचशे ते सहाशे शेतकरी उपस्थित असतात.या शेतकऱ्यांना अत्यल्प दरात न्याहरी उपलब्ध करून देणे शक्य आहे. लातूर बाजार समितीने राबवलेल्या ‘एक रुपयात भोजन’पॅटर्नप्रमाणेचही योजना राबवण्याचा विचार आहे.