शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

शेतकऱ्यांना मिळणार कमी दरात न्याहरी

By admin | Updated: June 17, 2016 00:47 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती : गरिबांसाठी राबवणार ‘लातूर पॅटर्न’

प्रकाश वराडकर --रत्नागिरी --रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यल्प दरात न्याहरी देण्याचा समितीचा मानस आहे. लातूर बाजार समितीच्या एक रुपयात भोजन पॅटर्ननुसार ही योजना असून, जूनअखेर होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल. ही माहिती बाजार समितीचे सभापती गजानन पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज शेतकरी खरेदी-विक्री व्यवहारांसाठी येतात. त्यांना समितीमार्फत एक रुपयात जेवण देण्याची योजना राबवण्यात आली आहे. त्यासाठी व्यापारी, अडते तसेच अन्य संबंधितांची मदत घेण्यात आली आहे. रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीनेही रुपयात नव्हे; तर पाच रुपयात तेथे येणाऱ्या शेतकऱ्यांना भोजन उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना आमदार उदय सामंत यांनी आपल्याला केली आहे, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.रत्नागिरी बाजार समितीच्या आवारात अत्यल्प दरात भोजन देणे शक्य आहे. मात्र, समितीच्या आवारात भाजी व शेतमालाचे व्यवहार हे सकाळी ७ ते ९ या दोन तासात होतात. दुपारच्या वेळी हे व्यवहार नसतात, त्यामुळे तेथे शेतकरीही नसतात. परिणामी भोजन देण्याची योजना येथे राबविता येणे कठीण आहे. मात्र, सकाळच्या वेळी शेतकऱ्यांना अत्यल्प दरात न्याहरी अर्थात चहा, नाश्ता उपलब्ध करून देणे शक्य आहे. तशी योजना राबवण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. त्याचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या संचालकांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. व्यापाऱ्यांबरोबरच जिल्हा बॅँकेचीही मदत घेतली जाऊ शकते, असेही ते म्हणाले. निवास व्यवस्थाकृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना सायंकाळी उशिर झाला तर त्यांच्या निवासाचीही व्यवस्था रत्नागिरीच्या समितीने २०१० मध्येच केली आहे. महिला व पुरुष असे दोन हॉल तयार करण्यात आले असून, प्रत्येक हॉलमध्ये दहा गाद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाशे शेतकऱ्यांना होणार लाभ!बाजार समितीच्या आवारात दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत शेतमालाची लिलाव प्रक्रिया होते. त्यावेळी पाचशे ते सहाशे शेतकरी उपस्थित असतात.या शेतकऱ्यांना अत्यल्प दरात न्याहरी उपलब्ध करून देणे शक्य आहे. लातूर बाजार समितीने राबवलेल्या ‘एक रुपयात भोजन’पॅटर्नप्रमाणेचही योजना राबवण्याचा विचार आहे.