शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

रासायनिक पाण्याने पुन्हा मासे मृत

By admin | Updated: June 22, 2016 00:16 IST

कोतवली सोनपात्रा नदी : एकाच महिन्यात तीनवेळा घटना घडल्याने ग्रामस्थांमधून संताप

आवाशी : खेड तालुक्यातील कोतवली येथे सोनपात्रा नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याने मासे मृत होण्याच्या घटना सातत्याने सुरु आहेत. या महिन्यातील ही तिसरी घटना असून, पावसाळा सुरु होताच औद्योगिक वसाहतीतील अनेक ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारे चेंबर ओव्हरफ्लो झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतून रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याने कोतवली येथील सोनपात्रा नदी दूषित झाली आहे. त्यामुळे नैसर्गिक पाणवठेही दूषित झाले असून, या परिसरातील जनतेचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या अगोदर मे महिन्यामध्ये नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याची घटना घडली होती. त्यानंतर सी.ई.टी.पी. लाईनच्या मागच्या बाजूला हे रासायनिक पाणी पिऊन बैल मृत झाल्याची घटना दहा दिवसांपूर्वीच घडली होती. त्यावेळी कोतवली ग्रामस्थ व सी.ई.टी.पी. संचालक यांच्यात या विषयावरुन खडाजंगी उडाली होती. संचालक मंडळाचा राजीनामा घेण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. या प्रकरणावर पडदा पडतो न पडतो तोच पुन्हा नदीत मासे मेल्याने हे प्रकरण आता चांगलेच तापल्याचे दिसत आहे.औद्यागिक वसाहतीत अनेक ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारे चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने हे रासायनिक सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर कोतवली ग्रामस्थांसह आवाशी येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख सतीश आंब्रे, संजय आंब्रे, विक्रांत साने, प्रवीण कदम यांनी सी.ई.टी.पी. व एम.पी.सी.बी.च्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करत संताप व्यक्त केला. त्याचबरोबर या सांडपाण्याचे नमुने घेऊन हे पाणी कोणत्या कंपनीतून सोडण्यात आले याची माहिती एम.पी.सी.बी.कडे मागितली आहे.एम.आय.डी.सी.चे उपअभियंता के. डी. पाटेकर यांनी सांगितले की, ही घटना समजताच मी तत्काळ तेथे पोहचलो. वसाहतीत ओवरफ्लो झालेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरची पाहणी करून तूर्त त्याचे काम अद्ययावत होईपर्यंत पाणी सोडू नये अशा सूचना वसाहतीतील सर्व कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. वारंवार चेंबर ओव्हरफ्लो का होतात, असे विचारले असता, पाटेकर यांनी सांगितले की, या चेंबरमध्ये आम्हाला अनेकदा रिकाम्या बाटल्या, कचऱ्याच्या गोण्या व अन्य साहित्य सापडले आहे. आम्ही अनेकदा वसाहतीतील कंपन्यांना सांडपाण्याच्या लाईनला सांडपाण्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही वस्तू येता नयेत, असे लेखी बजावले आहे. तरीदेखील कंपन्यांकडून असे प्रकार घडत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)संपर्क करत नाहीत : अहवाल पाठविणारकोतवली गावामध्ये सतत असे प्रकार घडत असून, आज औद्योगिक वसाहतीतील चेंबर ओव्हरफ्लो झाले. याच्या पाहणीसाठी अधिकारी येतात, तेव्हा ते कुणालाही संपर्क करत नाहीत. आजही कोतवली ग्रामस्थांना समजावणे मला हाताबाहेर गेले होते. मात्र, पुन्हा अशी संधी मिळणार नाही, असे त्यांनी मला बजावले. मी अभ्यास गटावर असून देखील मला याची कल्पना नसणे याचा अर्थ काय? उलट मलाच माझ्या माणसांचा रोष घ्यावा लागतो. अधिकाऱ्यांचे हे नेहमीचेच आहे. अधिकारी पाहणीसाठी आले तरी कुणालाही संपर्क करत नाहीत. - संदीप आंब्रेअभ्यास गट सदस्य एम.पी.सी.बी.कडे संपर्क साधला असता, प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी मोरे हे रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी यांचेसोबत सभेला असून, मी स्वत: कोतवली येथे जाऊन आलो. किरकोळ मासे मर्तुकी घडली असून, त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. याचा अहवाल प्रयोगशाळा व वरिष्ठांकडे पाठविणार आहे. कोतवली सरपंच यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही, असेही एम.पी.सी.बी.चे क्षेत्रीय अधिकारी वी. जी. भताने यांनी सांगितले.