शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यातील कामाने साखरप्यात सुरू झाला पूरमुक्तीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:36 IST

रत्नागिरी: रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कोंडगाव (साखरपा). अंदाजे ५००० लोकवस्तीच्या या गावाजवळून 'काजळी नदी‘ ...

रत्नागिरी: रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कोंडगाव (साखरपा). अंदाजे ५००० लोकवस्तीच्या या गावाजवळून 'काजळी नदी‘ रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाच्या जीवनदायिनीचा प्रवाह जातो. या नदीच्या काठावरच हे गाव वसले आहे. गावाची बाजारपेठदेखील नदीपात्राला समांतर आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वीपर्यंत पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारे हे गाव आता डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या प्रश्नाला तोंड देत होते. जोडीला पावसाळ्यातील महापूर व त्यामुळे होणारे नुकसान अशा दुहेरी कात्रीत अडकलेले होते; मात्र त्यावरही सरदेशपांडे परिवाराने ग्रामस्थांच्या मदतीने उपाय शोधला. यंदा पहिल्या टप्प्यात काजळी नदीतील गाळ उपसा झाल्याने यावर्षी हे गाव पूरमुक्त राहिले.

साधारण ५ ते ६ वर्षांपूर्वी मूळचे कोंडगाव (साखरपा) येथीलच मात्र नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने चिंचवड, पुणे येथे वास्तव्यास असणारे प्रसाद सरदेशपांडे व मुग्धा प्रसाद सरदेशपांडे यांनी या दुहेरी संकटावरती उपाय शोधण्याचा ध्यास घेऊन, ग्रामस्थांच्या मदतीने कामाला सुरुवात केली. सलग तीन ते चार वर्षे याबाबत विविध स्तरावरती, विविध लोकांना भेटून, जलसंवर्धनाच्या कामात तज्ज्ञ असणाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन घेतले. या समस्येचे मूळ हे नदीपात्रात वर्षानुवर्षे साठलेला गाळ व त्यामुळे उथळ झालेले नदीपात्र हेच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर खऱ्या अर्थाने अभियानाला सुरुवात झाली. आवश्यक त्या शासकीय परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कोंडगाव येथील श्री दत्त देवस्थान या संस्थेची भक्कम साथ प्रसाद सरदेशपांडे यांना मिळाली. विविध शासकीय परवानग्या मिळवण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत, कोंडगावचे सरपंच, सर्व सदस्य व कर्मचारी वर्गाने विशेष सहकार्य केले.

२०१९ सालाच्या सुरुवातीला गाळ उपसा कामासाठी रत्नागिरीतील पाटबंधारे विभाग तसेच अन्य आवश्यक त्या खात्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाने वेग घेतला. दरम्यान, या कामासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक संबंधित यंत्रणेने तयार केले. काही प्रमाणात अर्थ सहाय्य करण्याचे आश्वासन तत्कालीन प्रशासकीय अधिकारी यांनी दिले; मात्र काही कारणांमुळे २०१९ मध्ये या कामास सुरुवात झाली नाही; मात्र पावसाळ्यानंतर पुन्हा जोमाने प्रयत्न सुरू झाले; परंतु याचवेळी कोरोनाचा अडसर निर्माण झाला. शासकीय स्तरावरून मिळणारे सहाय्य महामारीमुळे मिळण्याची आशा जवळ जवळ संपुष्टात आली. याचवेळी संस्थेला श्रीधर कबनुरकर यांच्या रूपाने मार्ग दाखवणारा वाटाड्या मिळाला. त्यांनी सामाजिक व व्यावसायिक हितसंबंधांचा वापर करून जलसंधारणाच्या कामात महाराष्ट्रात अनमोल योगदान देणाऱ्या नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनशी संपर्क केला. अनेक वर्षांपासूनची संस्थेची धडपड लक्षात घेऊन नाम फाउंडेशनने लगेचच कामासाठी विनामोबदला यंत्र सामग्री देण्याचे मान्य केले. मात्र ही यंत्र सामग्री चालवण्यासाठी लागणारे इंधन, कर्मचारी भोजन-निवास आदी खर्च ग्रामस्थांनी करावा, अशी अट ठेवली.

ग्रामस्थांच्या सहकार्यावर आत्मविश्वास ठेवून श्री दत्त देवस्थानने, श्री दत्तसेवा पतसंस्था व ग्रुप ग्रामपंचायत, कोंडगाव यांच्या सहकार्याने लोकसहभागाच्या माध्यमातून प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. ८ फेब्रुवारी २०२१ रोजी शुभारंभ नाम फाउंडेशनचे समन्वयक मल्हार पाटेकर, इंद्रजित देशमुख तसेच नाम फाउंडेशनशी संबंधित अन्य व्यक्ती आणि या विषयाशी संबंधित शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झाला. साडेतीन महिन्याच्या काळात सुमारे १२-१४ तास अविरत यंत्र सामग्रीच्या सहाय्याने काम करून १ किमी लांब, ६० मी रुंद व ४-५ मीटर खोल अशा पद्धतीने नदीतील गाळ उपसून किनाऱ्यावर व्यवस्थित बसवला गेला.

काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतेक भागाला पुराचा तडाखा बसला होता; मात्र या अतिवृष्टीतही कोंडगाव परिसर पूरमुक्त राहिला. किरकोळ पडझड वगळता कोंडगाववासीयांचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही, हीच केलेल्या दर्जेदार कामाची पोचपावती आहे.

.....................................

३० लाख रुपये केवळ लोकसहभागातून....

केवळ पहिल्या टप्प्याच्या कामासाठी झालेला सुमारे ३० लाख रुपये इतका खर्च केवळ लोकसहभागातून मिळालेल्या देणगीतून उभारला गेला. आतापर्यंत कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. कोंडगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही मदत मिळविण्यासाठी श्री दत्त देवस्थान शासकीय दरबारी प्रयत्न करीत आहे.