शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

फायर स्टेशन रखडले

By admin | Updated: January 29, 2015 23:40 IST

रत्नागिरी नगरपरिषद : ६८ लाखांचे काम; दीड वर्ष थांब...

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे शासकीय निधीतून उभारल्या जाणाऱ्या ‘फायर स्टेशन’ इमारतीचे काम अद्याप रेंगाळले आहे. दीड वर्षापूर्वी सुरू झालेले हे ६८ लाख खर्चाचे काम सहा महिन्यात पूर्ण करायचे असताना मुदत टळल्यानंतरही या इमारतीचे काम अजून अपूर्ण आहे. इमारत कधी होणार व फायर स्टेशनची शहराची गरज कधी पूर्ण होणार, असा सवाल आता नागरिकांतून केला जात आहे. रत्नागिरी शहर हे जिल्ह्याच्या राजधानीचे ठिकाण आहे. याठिंकाणी सर्वच शासकीय खात्यांची जिल्ह्याची मुख्य कार्यालये आहेत. शहराची लोकसंख्या ही एक लाखापर्यंत असून, आजूबाजूचा परिसरही विकसित होत आहे. शहराच्या परिसरातील शेकडो लोक रोज रत्नागिरी शहरात ये - जा करतात. शहर व परिसराची लोकसंख्या पाहता दीड लाखांपेक्षा अधिक आहे. विकासकामांचा वेग वाढल्याने दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. आगीची दुर्घटना घडल्यास नगरपरिषदेकडे एकच अग्निशामक आहे. तसेच आवश्यक प्रशिक्षित कर्मचारीही सध्या नाहीत. त्यामुळे कंपन्यांचे अग्निशामक दुर्घटना घडलेल्या ठिकाणी बोलवावे लागतात. त्यांना येण्यास वेळ लागतो. परिणामी आग लागलेल्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मोठ्या आगीच्या दुर्घटनेवेळी जवळ असलेल्या नगरपरिषदेच्या एकाच अग्निशामकाला आग विझविण्याचे काम सुरूवातीला एकाकी करावे लागते. ही स्थिती बदलण्यासाठी व मालमत्तांचे रक्षण होण्यासाठीच रत्नागिरी शहरात नगरपरिषदेचे फायर स्टेशन होण्याबाबतचा विचार पुढे आला. त्यातून पाठपुरावा करताना या प्रकल्पाला मान्यता मिळाली. काम सुरू झाले. मात्र, सहा महिन्यांचे काम दीड वर्ष झाले तरी पूर्ण न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. शहराला लागूनच मिरजोळे औद्योगिक वसाहत आहे. शहराच्या हद्दवाढीचा प्रस्तावही शासनाकडे सादर झाला आहे. हद्दवाढीच्या पार्श्वभूमीवर लागणारे अतिरिक्त पाणी बावनदीतून मिळावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाणी आरक्षणाची मागणी करणारा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी शहर व परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. विस्ताराबरोबरच विकासातही रत्नागिरी शहर आता प्रगतीपथावर असताना आग लागणे वा अन्य दुर्घटनांमध्येही गेल्या तीन ते चार वर्षात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेचे स्वत:चे फायर स्टेशन असणे हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. त्यातूनच दोन वर्षांपूर्वी या फायर स्टेशनला मंजुरी मिळून निधीही मंजूर झाला. त्यानंतर इमारतीचे काम प्रत्यक्षात आॅगस्ट २०१३मध्ये सुरू करण्यात आले. इमारत बांधकाम पूर्णत्वासाठी सहा महिन्यांची मुदत होती. मात्र, हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सध्या सुमारे ८० टक्केच काम झाले आहे. काम पूर्ण न होण्यामागील नेमकी कारणे काय, हे शोधून त्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. (प्रतिनिधी)इमारतीचे बांधकाम पूर्ण कधी होणार?कंपन्यांचे अग्निशामक मदतीलारत्नागिरी नगरपरिषदेकडे सध्या स्वत:चा अग्निशामक आहे. मात्र, ही यंत्रणा पुरेशी नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले. अनेकदा नगरपरिषदेच्या अग्निशामकाबरोबरच फिनोलेक्स व जिंदाल कंपनीचे अग्निशामक मागवण्याची गरज निर्माण होते. वाढते शहरीकरण व त्याचबरोबरीने वाढणाऱ्या दुर्घटना पाहता रत्नागिरी नगरपरिषदेच्या या फायर स्टेशनची इमारत लवकरात लवकर पूर्ण होण्याची गरज असून, त्यातील अडसर दूर करण्याची मागणी होत आहे. दोन अग्निशामक गाड्या १४ कर्मचारी, अधिकारीनगरपरिषदेच्या या फायर स्टेशनमध्ये दोन अग्निशामक गाड्या असतील. तसेच यातील प्रत्येक गाडीवर चार कर्मचारी काम करणार आहेत. एक फायर स्टेशन अधिकारी व अन्य आवश्यक कर्मचारी असे एकूण १४ कर्मचारी या स्टेशनचे काम पाहणार आहेत. मात्र, इमारतीचे कामच रखडल्याने हा प्रकल्प अद्याप रखडलेला आहे.