शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

एस्टी वर्कशॉपमधील आगीत भंगार जळून खाक २५ हजारांचे नुकसान : आगीच्या संदर्भात संशयाचे धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 21:20 IST

रत्नागिरी : शहरालगतच्या टीआरपी परिसरातील राज्य मार्ग परिवहन महामंळाच्या विभागीय कार्यशाळा परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीत भंगारातील कुशन, सीट कव्हर जळून खाक झाल्या. दीड वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी साडेपाचनंतर आटोक्यात आली. परिसरात धुराचे साम्राज्य परसरले होते.विभागीय कार्यशाळेत एस. टी.च्या गाड्यांची दुरूस्ती केली जाते. वापरात न येणारे साहित्य ...

ठळक मुद्देलिलावादिवशीच आग-भंगाराच्या लिलाव प्रक्रियेदिवशी अचानकपणे आग लागल्यामुळे आश्चर्य विभागिय कार्यशाळेत दहा ते पंधरा लाखाचे भंगार साठवून ठेवण्यात आले होते. लिलावाच्याच दिवशी लागलेल्या आगीमुळे संशयाचा धूर पसरला आहे.

रत्नागिरी : शहरालगतच्या टीआरपी परिसरातील राज्य मार्ग परिवहन महामंळाच्या विभागीय कार्यशाळा परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीत भंगारातील कुशन, सीट कव्हर जळून खाक झाल्या. दीड वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी साडेपाचनंतर आटोक्यात आली. परिसरात धुराचे साम्राज्य परसरले होते.

विभागीय कार्यशाळेत एस. टी.च्या गाड्यांची दुरूस्ती केली जाते. वापरात न येणारे साहित्य याच परिसरात ठेवून नंतर ते भंगारात विकले जाते. दरवर्षी या भंगाराचा लिलाव करण्यात येतो. या भंगाराचा शुक्रवारी लिलाव होणार होता. सुमारे दहा ते पंधरा लाखाचे भंगार साहित्य लिलावासाठी काढण्यात आले होते. हा लिलाव आॅनलाईन सुरू होता. आॅनलाईन लिलाव प्रक्रिया सुरू असतानाच दुपारी दीडच्या सुमारास कार्यशाळेच्या बाहेरील गवताला आग लागली.

वाळलेले गवत पेटत पेटत ती आग भंगारापर्यंत पोहोचली. एस. टी.च्या जुन्या सीटचे कव्हर, कुशन पेटले. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. याशिवाय एस. टी.च्या पार्टस्मधील अ‍ॅल्युमिनियमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र, अल्युमिनियम वितळवून त्याचा वापर केला जात असल्यामुळे अल्युमिनियमचा लिलाव केला जाणार आहे. आगीचे वृत्त समजताच नगरपालिकेचे बंब मागवण्यात आले. पालिकेच्या चार बंबाव्दारे आग आटोक्यात आणण्याचे काम सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होते. बंब आॅपरेट करणाºया नगरपालिका कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने कार्यशाळेतील कर्मचारी आग विझवण्याच्या कामात सक्रिय झाले होते. कुशन व सीट कव्हर पेटल्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते.अनघा बारटक्के : अ‍ॅल्युमिनियमचे पत्रे वितळल्याची माहितीराज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कुशन कव्हर, सीटस्मुळे ही आग अधिकच भडकली होती.दुपारी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तब्बल साडेचार तासाने ही आग आटोक्यात आली.चार बंबाकडून आगीवर नियंत्रणएसटीचे खराब सीट्स, कुशन कव्हर, पत्रे, तसेच प्लास्टिकचे बॅरेल, अ‍ॅल्युमिनिअम असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. अग्निशमन दलाचे चार बंब आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र या आगीत २५ हजाराचे नुकसान झाल्याची माहिती विभायनियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. अ‍ॅल्युमिनियमचे पत्रे वितळलेले असले तरी ते वापरात येणार असल्याचे सांगितले.