शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पाण्याचा निचरा हाेण्याकरिता पर्यायी मार्ग काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

देवरुख : देवरुख शहरातील खालची आळी येथील सारण बंद केल्याने गेले आठ दिवस मार्गावर पाणी साठले होते. यामुळे ही ...

देवरुख : देवरुख शहरातील खालची आळी येथील सारण बंद केल्याने गेले आठ दिवस मार्गावर पाणी साठले होते. यामुळे ही समस्या बिकट बनली होती. या प्रकाराची दखल घेऊन आमदार शेखर निकम यांनी शनिवारी या मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना त्वरित तहसीलदारांसोबत चर्चा करून पाण्याचा निचरा होण्याकरिता पर्यायी मार्ग काढावा, असे आदेश दिले.

पावसाचे पाणी वाहून नेणारी सारण पूर्ण बंद झाल्याने मच्छी मार्केटकडे जाणारा मार्ग अडीच ते तीन फूट पाण्याखाली गेला आहे. यामुळे येथील २५ कुटुंबांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे दूषित पाणी आजूबाजूच्या विहिरींमध्ये जात आहे. ही न्यायालयीन बाब असल्याने नगर पंचायत हतबल झाली आहे. यामुळे येथील साचलेल्या पाण्याचा प्रश्न जटील झाला आहे. गेले आठ दिवस या मार्गावर वाहन चालवणे व पायी जाणेही अडचणीचे झाले आहे. तहसीलदारांना येथील नागरिकांनी निवेदनही दिले होते. त्यावर तहसीलदारांनी ही न्यायप्रविष्ट बाब असल्याने निवेदनावर कार्यवाही करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

आमदार शेखर निकम यांनी तहसीलदार सुहास थोरात यांच्याशी संपर्क साधून साठलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवा, अशा सूचना केल्या. तसेच नगर पंचायतीचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याशी चर्चा करुन पाणी जाण्यासाठी तहसीलदारांबरोबर चर्चा करा तसेच पर्यायी मार्ग काढण्याचे आदेश यावेळी दिले. यावेळी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, बाळू ढवळे, नीलेश भुवड, मोहन वनकर, राजू आमडेकर, पंकज पुसाळकर, हनिफ हरचिरकर आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

------------------

येत्या दोन दिवसात साठलेल्या पाण्याचा प्रश्न न सुटल्यास रत्नागिरीला येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची संबंधित २५ कुटुंबे भेट घेणार आहेत. यामुळे साठलेल्या पाण्याचा प्रश्न थेट राज्य शासनाच्या न्यायालयात पोहोचणार आहे.

-------------------------------

देवरूख शहरातील खालची आळी येथील पाण्याच्या समस्येबाबत आमदार शेखर निकम यांनी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याशी चर्चा केली.