शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हाॅटेल व्यावसायिकांना पुन्हा आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST

रत्नागिरी : गतवर्षी सुमारे दहा महिने बंद असलेल्या हाॅटेल, रेस्टाॅरंट चालकांचे व्यवसाय गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुरळीत होत असतानाच आता ...

रत्नागिरी : गतवर्षी सुमारे दहा महिने बंद असलेल्या हाॅटेल, रेस्टाॅरंट चालकांचे व्यवसाय गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुरळीत होत असतानाच आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा हे व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांसमोर मोठेच आर्थिक संकट उभे राहिले आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच देशभरातच कडक लाॅकडाऊन सुरू झाले. २३ मार्चपासून सुरू झालेले लाॅकडाऊन अगदी जून महिन्यापर्यंत कडक केले गेल्याने कुठलाच उद्योग किंवा व्यवसाय सुरू नव्हता. केवळ भाजीपाला. किराणा, औषधे, आदी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग, व्यवसाय बंद होते. मात्र, जून महिन्यात लाॅकडाऊन थोडेसे शिथिल झाल्यानंतर काही अटी आणि शर्तींवर मोठमोठे उद्योग सुरू झाले. मात्र, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट बंदच होते. हाॅटेल्स बंद राहिली तरी त्यात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवणाची साेय करून त्यांना वेतनही द्यावे लागत होते. त्यानंतर अनलाॅक प्रक्रियेत सर्वच उद्योग हळूहळू सुरू झाले. मात्र, हाॅटेल्स, रेस्टारंट यांना केवळ घरपोच पार्सल सेवेची परवानगी देण्यात आली.

ऑक्टोबरमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर ५० टक्के ग्राहकांची मर्यादा ठेवत, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर हाॅटेल्स आणि रेस्टारंट यांना परवानगी मिळाली. त्यानंतर आता पुन्हा जेमतेम चार पाच महिन्यांनंतर हा व्यवसाय नियमित सुरू होत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. १ मेपर्यंत सर्वच व्यवसाय, उद्योग बंद आहेत. त्यामुळे आता पुन्हा हाॅटेल व्यवसायाला याचा फटका बसला आहे.

सध्या पंधरा दिवस लाॅकडाऊन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या काळात हाॅटेलचालकांना फक्त पार्सल आणि घरपोच सेवा देता येणार आहे. सध्या नागरिक घरात राहणार असल्याने पार्सल नेण्यासाठी येणार कोण, हा प्रश्न आहेच. तसेच घरपोच सेवेलाही म्हणावा तसा प्रतिसाद नाही. त्यामुळे मिळेल त्या उत्पन्नावर सध्या बसून असलेल्या कर्मचाऱ्यांचा सर्व खर्च, तसेच त्यांचे वेतन, हाॅटेलचा खर्च, बँकांच्या कर्जांचे हप्ते आणि अन्य खर्च कसा करायचा, ही चिंता या व्यावसायिकांना सतावत आहे. गेले वर्षभर हाॅटेल चालक ग्राहकांची पाठ फिरली तरी इतर सर्व खर्च अशा दुहेरी आर्थिक संकटात अडकले आहेत.

कोट

जिल्हा प्रशासनाने हाॅटेलचालकांना केवळ पार्सल आणि घरपोच सेवा यासाठीच परवानगी दिली आहे. मात्र, सध्या ग्राहक घरातच आहेत. परंतु घरपोच सेवेलाही फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

सुनीलकुमार देसाई, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा हाॅटेल व्यावसायिक संघटना