शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

अखेर ४९ प्रकल्पग्रस्तांना भूखंडवाटप

By admin | Updated: October 21, 2015 21:31 IST

चांदोली अभयारण्य : जमिनी गेलेल्या ग्रामस्थांना दिलासा

रत्नागिरी : चांदोली अभयारण्यासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, अशा संगमेश्वर तालुक्यातील गोठणे येथील ४९ कुटुंबांना जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी भूखंडाचे वाटप करण्यात आले. चांदोली अभयारण्य प्रकल्पात गोठणे येथील ग्रामस्थांच्या जमिनी गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांपैकी काही कुटुंबांचे कोल्हापूर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. ४९ कुटुंबांचे नजिकच्या हातीव येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, संपादित केलेल्या ८.८२ हेक्टर जागेवर ८२ भूखंड तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी प्रस्ताव दाखल केलेल्या ४९ कुटुंबांना चिठ्या काढून भूखंडांचे वाटप करण्यात आले. कुटुंबातील सदस्य संख्येनुसार ३७०, ५५५ आणि ७४० चौरस मीटर क्षेत्राचे भूखंड देण्यात आले आहेत. या प्रकल्पग्रस्तांच्या आधीच्या जमिनीचा आणि घरे, झाडे यांचा मोबदला शासन नियमानुसार देण्यात आला आहे. यावेळी पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, संगमेश्वरच्या तहसीलदार वैशाली माने, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता लोखंडे, हातीवचे सरपंच, पोलीसपाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. गोठणेवासीयांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून हातीव येथील गावठाणामध्ये १ कोटी ९२ लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून या ग्रामस्थांना वीज, पाणी, अंतर्गत रस्ते, समाजमंदिर, स्मशानभुमीशेड आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. सध्या या गावठाणात शाळेच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. त्याचबरोबर ते सध्या राहत असलेल्या हातीव येथे आता त्यांना अधिकृत भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. या ग्रामस्थांनी आता या भूखंडावर घरे बांधण्यास सुरूवात करताच १० हजार रूपयांची आर्थिक मदत शासनाकडून करण्यात येणार आहे. - नितीन राऊत, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभागप्रकल्पग्रस्तांपैकी काही कुटुंबांचे कोल्हापूर येथे पुनर्वसन.संपादित केलेल्या ८.८२ हेक्टर जागेवर ८२ भूखंड तयार.प्रस्ताव दाखल केलेल्या ४९ कुटुंबांना चिठ्या काढून भूखंडांचे वाटप.कुटुंबातील सदस्य संख्येनुसार ३७०, ५५५ आणि ७४० चौरस मीटर क्षेत्राचे भूखंड.नियमानुसार मोबदला.