शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अखेर ४९ प्रकल्पग्रस्तांना भूखंडवाटप

By admin | Updated: October 21, 2015 21:31 IST

चांदोली अभयारण्य : जमिनी गेलेल्या ग्रामस्थांना दिलासा

रत्नागिरी : चांदोली अभयारण्यासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, अशा संगमेश्वर तालुक्यातील गोठणे येथील ४९ कुटुंबांना जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी भूखंडाचे वाटप करण्यात आले. चांदोली अभयारण्य प्रकल्पात गोठणे येथील ग्रामस्थांच्या जमिनी गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांपैकी काही कुटुंबांचे कोल्हापूर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. ४९ कुटुंबांचे नजिकच्या हातीव येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, संपादित केलेल्या ८.८२ हेक्टर जागेवर ८२ भूखंड तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी प्रस्ताव दाखल केलेल्या ४९ कुटुंबांना चिठ्या काढून भूखंडांचे वाटप करण्यात आले. कुटुंबातील सदस्य संख्येनुसार ३७०, ५५५ आणि ७४० चौरस मीटर क्षेत्राचे भूखंड देण्यात आले आहेत. या प्रकल्पग्रस्तांच्या आधीच्या जमिनीचा आणि घरे, झाडे यांचा मोबदला शासन नियमानुसार देण्यात आला आहे. यावेळी पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, संगमेश्वरच्या तहसीलदार वैशाली माने, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता लोखंडे, हातीवचे सरपंच, पोलीसपाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. गोठणेवासीयांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून हातीव येथील गावठाणामध्ये १ कोटी ९२ लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून या ग्रामस्थांना वीज, पाणी, अंतर्गत रस्ते, समाजमंदिर, स्मशानभुमीशेड आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. सध्या या गावठाणात शाळेच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. त्याचबरोबर ते सध्या राहत असलेल्या हातीव येथे आता त्यांना अधिकृत भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. या ग्रामस्थांनी आता या भूखंडावर घरे बांधण्यास सुरूवात करताच १० हजार रूपयांची आर्थिक मदत शासनाकडून करण्यात येणार आहे. - नितीन राऊत, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभागप्रकल्पग्रस्तांपैकी काही कुटुंबांचे कोल्हापूर येथे पुनर्वसन.संपादित केलेल्या ८.८२ हेक्टर जागेवर ८२ भूखंड तयार.प्रस्ताव दाखल केलेल्या ४९ कुटुंबांना चिठ्या काढून भूखंडांचे वाटप.कुटुंबातील सदस्य संख्येनुसार ३७०, ५५५ आणि ७४० चौरस मीटर क्षेत्राचे भूखंड.नियमानुसार मोबदला.