शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मुलांसाठी भरते फिरती शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : स्थलांतरित मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी रत्नागिरीत चक्क ‘फिरती शाळा’ सुरू करण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : स्थलांतरित मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी रत्नागिरीत चक्क ‘फिरती शाळा’ सुरू करण्यात आली आहे. भाट्ये पुलानजीक एका नारळाच्या बागेत ही हंगामी शाळा भरत असून, १५ मुले येथे शिकत आहेत. या मुलांना फिरत्या शाळेत जिल्हा परिषदेच्या विशेष साधन व्यक्ती असलेल्या खालिदा जमादार, मिस्त्री हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रूकसाना फडनाईक व त्यांची टीम आळीपाळीने अध्यापन करीत आहे.

शासनाच्या १ ते १० मार्चपर्यंत सुरू असलेल्या शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याच्या मोहिमेंतर्गत जमादार यांनी १५ शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करून घेतले होते. कर्नाटक येथून रोजगारासाठी स्थलांतरित झालेली कुटुंबे भाट्ये पुलाजवळ वास्तव्य करीत आहेत. तेथील काही मुलांना उर्दू शाळेत दाखल करण्यात आले आहे. पहिली ते चौथीच्या वर्गातील ही मुले असून, पालकांशी व मुलांशी संवाद साधून त्यांना अध्यापन करण्यात येत आहे. गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते यांनीही येथे भेट देऊन मुलांशी हितगुज साधले.

वस्तीवरील स्थलांतरित मुलांना मिस्त्री प्राथमिक शाळेत दाखल करण्याबाबत मुख्याध्यापिका रूकसाना फडनाईक यांची भेट घेऊन त्यांच्याशी जमादार यांनी चर्चा केली व त्यानंतर पुन्हा पालकांशी चर्चा केली. संबंधित मुलांना त्यांच्या वस्तीत जाऊन शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिस्त्री प्राथमिक विभागाचे शिक्षक यांनीही अध्यापनासाठी तयारी दर्शविली. आठवड्यातून दोन दिवस शिक्षक तेथे जाऊन अध्यापन करीत आहेत. जमादारही स्वत: जाऊन अध्यापन करीत आहेत.

वस्तीच्या शेजारी केळीची वखार असून वखारीच्या मालकांनी मुलांना तिथे शिकविण्याची परवानगी दिल्याने मुलांना अध्यापनासाठी बसण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. संध्याकाळी नारळाच्या बागेत अध्यापन केले जात असून, एक ‘फिरती शाळा’ सुरू झाली आहे.

.....................

आरटीईनुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या वेळी स्थलांतरित कुटुंबांतील १५ शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करून घेण्यात आले. भाट्ये येथे कर्नाटकातून रोजगारासाठी आलेल्या कुटुंबे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून १ली ते ४थीच्या वर्गातील मुलांना हंगामी स्वरूपात शाळेत दाखल करून फिरत्या शाळेच्या माध्यमातून अध्यापन करण्यात येत आहे. यासाठी डायट परिवार व शिक्षण विभागाचे सहकार्य लाभत आहे.

- खालिदा जमादार, रत्नागिरी