शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

स्थलांतरित मुलांसाठी भरते फिरती शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : स्थलांतरित मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी रत्नागिरीत चक्क ‘फिरती शाळा’ सुरू करण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : स्थलांतरित मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी रत्नागिरीत चक्क ‘फिरती शाळा’ सुरू करण्यात आली आहे. भाट्ये पुलानजीक एका नारळाच्या बागेत ही हंगामी शाळा भरत असून, १५ मुले येथे शिकत आहेत. या मुलांना फिरत्या शाळेत जिल्हा परिषदेच्या विशेष साधन व्यक्ती असलेल्या खालिदा जमादार, मिस्त्री हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रूकसाना फडनाईक व त्यांची टीम आळीपाळीने अध्यापन करीत आहे.

शासनाच्या १ ते १० मार्चपर्यंत सुरू असलेल्या शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याच्या मोहिमेंतर्गत जमादार यांनी १५ शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करून घेतले होते. कर्नाटक येथून रोजगारासाठी स्थलांतरित झालेली कुटुंबे भाट्ये पुलाजवळ वास्तव्य करीत आहेत. तेथील काही मुलांना उर्दू शाळेत दाखल करण्यात आले आहे. पहिली ते चौथीच्या वर्गातील ही मुले असून, पालकांशी व मुलांशी संवाद साधून त्यांना अध्यापन करण्यात येत आहे. गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते यांनीही येथे भेट देऊन मुलांशी हितगुज साधले.

वस्तीवरील स्थलांतरित मुलांना मिस्त्री प्राथमिक शाळेत दाखल करण्याबाबत मुख्याध्यापिका रूकसाना फडनाईक यांची भेट घेऊन त्यांच्याशी जमादार यांनी चर्चा केली व त्यानंतर पुन्हा पालकांशी चर्चा केली. संबंधित मुलांना त्यांच्या वस्तीत जाऊन शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिस्त्री प्राथमिक विभागाचे शिक्षक यांनीही अध्यापनासाठी तयारी दर्शविली. आठवड्यातून दोन दिवस शिक्षक तेथे जाऊन अध्यापन करीत आहेत. जमादारही स्वत: जाऊन अध्यापन करीत आहेत.

वस्तीच्या शेजारी केळीची वखार असून वखारीच्या मालकांनी मुलांना तिथे शिकविण्याची परवानगी दिल्याने मुलांना अध्यापनासाठी बसण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. संध्याकाळी नारळाच्या बागेत अध्यापन केले जात असून, एक ‘फिरती शाळा’ सुरू झाली आहे.

.....................

आरटीईनुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या वेळी स्थलांतरित कुटुंबांतील १५ शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करून घेण्यात आले. भाट्ये येथे कर्नाटकातून रोजगारासाठी आलेल्या कुटुंबे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून १ली ते ४थीच्या वर्गातील मुलांना हंगामी स्वरूपात शाळेत दाखल करून फिरत्या शाळेच्या माध्यमातून अध्यापन करण्यात येत आहे. यासाठी डायट परिवार व शिक्षण विभागाचे सहकार्य लाभत आहे.

- खालिदा जमादार, रत्नागिरी