शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

राॅयल्टी बुडविणाऱ्या चिरेखाण मालकांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

पाचल : शासनाचे सर्व नियम, निकष धाब्यावर बसवून शासनाची लाखो रुपयांची राॅयल्टी बुडविणाऱ्या लांजा आणि पावस येथील चिरेखाण मालकांवर ...

पाचल : शासनाचे सर्व नियम, निकष धाब्यावर बसवून शासनाची लाखो रुपयांची राॅयल्टी बुडविणाऱ्या लांजा आणि पावस येथील चिरेखाण मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केली आहे. जिल्हाधिकारी व लांजा तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले आहे.

शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या या चिरेखाण मालकांना काही शासनाचे अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप सौंदळकर यांनी केला आहे. तहसीलदार कार्यालयातर्फे चिरेखाण मालकांना चिरे काढण्याची परवानगी दिली जाते. काही ठराविक ब्रासकरिता ही परवानगी दिलेली असते. मात्र, दिलेली परवानगी व नियम, निकष धाब्यावर बसवून त्याच्या चौपट-पाचपट चिरा राॅयल्टी भरल्याशिवाय काढला जातो. चिरेखाणीसाठी ठरवून दिलेल्या लांबी-रुंदीनुसार काम केले जात नाही. यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे साैंदळकर यांनी म्हटले आहे. बंद पडलेल्या चिरेखाणीचे खड्डे न बुजविताच उघडे ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे जीवित व वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच खाणीवर काम करताना स्थानिकांना डावलले जात असून परप्रांतीयांना रोजगार दिला जात आहे. स्थानिकांना प्राधान्य न देता त्यांचा हक्क डावलला जात आहे. स्थानिकांना रोजगार न दिल्यास परप्रांतीयांना येथे काम करू दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही सौंदळकर यांनी दिला आहे.