शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

राॅयल्टी बुडविणाऱ्या चिरेखाण मालकांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

पाचल : शासनाचे सर्व नियम, निकष धाब्यावर बसवून शासनाची लाखो रुपयांची राॅयल्टी बुडविणाऱ्या लांजा आणि पावस येथील चिरेखाण मालकांवर ...

पाचल : शासनाचे सर्व नियम, निकष धाब्यावर बसवून शासनाची लाखो रुपयांची राॅयल्टी बुडविणाऱ्या लांजा आणि पावस येथील चिरेखाण मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केली आहे. जिल्हाधिकारी व लांजा तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले आहे.

शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या या चिरेखाण मालकांना काही शासनाचे अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप सौंदळकर यांनी केला आहे. तहसीलदार कार्यालयातर्फे चिरेखाण मालकांना चिरे काढण्याची परवानगी दिली जाते. काही ठराविक ब्रासकरिता ही परवानगी दिलेली असते. मात्र, दिलेली परवानगी व नियम, निकष धाब्यावर बसवून त्याच्या चौपट-पाचपट चिरा राॅयल्टी भरल्याशिवाय काढला जातो. चिरेखाणीसाठी ठरवून दिलेल्या लांबी-रुंदीनुसार काम केले जात नाही. यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे साैंदळकर यांनी म्हटले आहे. बंद पडलेल्या चिरेखाणीचे खड्डे न बुजविताच उघडे ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे जीवित व वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच खाणीवर काम करताना स्थानिकांना डावलले जात असून परप्रांतीयांना रोजगार दिला जात आहे. स्थानिकांना प्राधान्य न देता त्यांचा हक्क डावलला जात आहे. स्थानिकांना रोजगार न दिल्यास परप्रांतीयांना येथे काम करू दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही सौंदळकर यांनी दिला आहे.