शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामामुळे शीळ रस्ता बंद होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका सलग दुसऱ्या वर्षी स्थानिक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका सलग दुसऱ्या वर्षी स्थानिक जनतेला बसणार आहे. पावसाळा तोंडावर आला तरी अर्जुना नदीपात्रात पिलर उभारणीचे काम सुरूच असून, या कामासाठी नदीपात्रात टाकण्यात आलेल्या भरावामुळे राजापूर-शीळ, गोठणे, दोनिवडे, चिखलगाव रस्ता पाण्याखाली जाण्याची भीती आहे, तसेच उंच टेकडीवर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलामुळे शीळ मार्गावरील दरड कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

ठेकेदार कंपनीकडून या महामार्गावर अर्जुना नदीवर उभारल्या जाणाऱ्या सर्वाधिक उंचीच्या पुलासाठी गेल्या दोन वर्षांपासून अर्जुना नदीपात्रात पिलर उभारणीचे काम सुरू आहे. हे काम करताना अर्जुना नदीचा प्रवाहच अडविण्यात आला, तर कोंढेतड बाजूने नदीपात्रातच मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून पिचिंग करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून नदीपात्रात पिलर उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी नदीपात्रात मातीचा भराव टाकून नदीपात्र अडविण्यात आले. पावसाळा तोंडावर आला तरी हे काम सुरूच आहे.

गतवर्षी केवळ खांब उभारले जात असताना व नदीपात्र पूर्ण मोकळे असताना थोड्या पावसातही पुलाच्या ठिकाणी नदीपात्र तुडुंब होऊन पुराचे पाणी नजीकच्या शीळ-चिखलगाव मार्गावर येऊन हा रस्ता बंद झाला होता. गतवर्षी तब्बल दहा ते बारा वेळा हा रस्ता पाण्याखाली गेला होता. ऐन गणेशोत्सव काळात हा मार्ग पुरामुळे बंद झाल्याने हाल झाले हाेते. यावर्षी पावसाळ्यानंतर शीळ बाजूकडील पिलर उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी अख्खे नदीपात्र अडविण्यात आले.

नदीपात्रात टाकण्यात आलेले दगड, तसेच कोंढेतडच्या बाजूने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात माती टाकून ती पिचिंग केल्याने नदीपात्राची रुंदी कमी होणार असून, एका बाजूने भराव टाकला जात असल्याने नदीचा प्रवाह बदलून शीळ गावाकडील राजापूर-चिखलगाव या बारमाही रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका बाजूने पात्र अरुंद झाल्यास भविष्यात हा रस्ता वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

----------------------

खाेदाईमुळे टेकडी खाली येण्याचा धाेका

यावर्षी शीळ-चिखलगाव रस्त्याला लागून उंच टेकडीवर पिलर उभारण्यात आल्याने व नव्याने करण्यात आलेल्या महामार्ग कामाच्या खोदाईमुळे पावसाळ्यात ही टेकडीच खाली येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे, तसेच गतवर्षी पावसाळ्यानंतर काम हाती घेताना शीळ-चिखलगाव मार्गाला संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन या ठेकेदार कंपनीने दिले होते. मात्र, स्थानिकांच्या मागणीचा कोणताही मुलाहिजा न बाळगता महामार्गाचे काम रेटून नेण्याचे धोरण ठेकेदार कंपनी अवलंबित आहे.