शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या दुर्घटनेने कळवळलेल्या पित्यानेही प्राण सोडले;

By admin | Updated: August 5, 2016 02:05 IST

गुहागरवर शोककळा

गुहागर : शेवटची घटका मोजत असलेल्या वडिलांना पाहायला आलेली विवाहिता, तिचा पती व अन्य नातेवाईक तवेरा गाडीमधून पुन्हा मुंबईकडे जात असताना महाड पूल अपघातामध्ये त्यांची गाडी वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. गुरुवारी सापडलेल्या मृतदेहामध्ये या गाडीमधील संपदा वाजे (३७) व जयवंती मिरगल (७०) यांचा समावेश होता. लाडक्या मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने तिच्या वडिलांना तो धक्का सहन झाला नाही आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ही सर्व मंडळी मंगळवारी सायंकाळी ८ वाजता सडेजांभारी येथून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. रात्री १० च्या सुमारास या सर्वांनी पोलादपूर येथील हॉटेलमध्ये एकत्रित जेवणही केले. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांना सकाळी फोन केला असता ते मुंबईत पोहोचलेच नसल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय यंत्रणेला दिली. त्यामुळे त्यांच्या ताब्यात असलेली (एमएच ०४ जीटी ७८३७) ही तवेरा गाडी व त्यामधील सर्व व्यक्ती महाड येथील पूल अपघातामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. ही भीती खरी ठरली असून, शोधपथकाला गुरुवारी सकाळी ११च्या सुमाराला संपदा संतोष वाजे व जयवंती सखाराम मिरगल या दोघांचे मृतदेह सापडले, तर अन्य व्यक्तिंचा शोध लागला नाही. त्यांच्या गाडीमध्ये गुहागरची माहेरवाशीण संपदा संतोष वाजे (३७, मूळ गाव शेनवडे, संगमेश्वर सध्या राहणार घाटकोपर) या आपल्या गावाकडील आजारी वडील रघुनाथ मिरगल (सडेजांभारी-गवळीवाडी, ता. गुहागर) यांना पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत पती संतोष सीताराम वाजे (४०) व मुंबईत राहणारे गावातील अन्य नातेवाईक जयवंत सखाराम मिरगल (४०), बाबा सखाराम मिरगल (३६), जयवंती सखाराम मिरगल (७०), दत्ताराम भागोजी मिरगल (६१) आदिनाथ कांबळे (४५), दिनेश सखाराम कांबळे (४०) आदी सर्व मंडळी व गाडीचा चालक वीर आदी ९ ते १० माणसे होती. (प्रतिनिधी)वाजे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरही सर्व मंडळी खास मुंबईहून गुहागर-सडेजांभारी येथे ज्या वयोवृध्द रघुनाथ मिरगल यांना पाहावयास आली होती. त्यांचे या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी रात्री निधन झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. त्यामुळे ज्यांना पाहण्याच्या हेतूने ही मंडळी आली होती. ते देखील या जगात राहिली नसल्याने गुहागर - संगमेश्वरमधील संपूर्ण मिरगल व वाजे कुटुंबियांवर दु:खाचा मोठा डोंगर पडला आहे.