शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

टॉवर्सच्या जमिनी कृषकच

By admin | Updated: February 4, 2015 23:55 IST

खेड तालुका : मोबाईल कंपन्यांची दंडाबाबत दादागिरी

श्रीकांत चाळके - खेड --तालुक्यातील विविध ठिकाणी असलेले मोबाईल कंपन्यांचे टॉवर्स अद्याप अधिकृत नाहीत. या कंपन्यांच्या टॉवर्सखालील जमीनही अकृषक नसल्याचे समोर आले आहे. खेड शहरातील १०, तर संपूर्ण तालुक्यातील उर्वरित ग्रामीण भागातील ६३ टॉवर्स कंपन्यांनी दादागिरी केली आहे. मात्र, दंडात्मक कारवाई करूनही या कंपन्यांची दादगिरी कायम राखली आहे. खेडमधील १० ठिकाणी हे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. शहरात काहींच्या घरांवर, तर काहींच्या खासगी जमिनीत हे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. जागामालकांना भरमसाठ भाडे देऊन या कंपन्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. कोणतीही परवानगी न घेता सर्व कंपन्यांनी गावोगावी टॉवर्स उभारले आहेत. त्यांच्याकडून सुरूवातीच्या काळात दंड भरला जात नव्हता. मात्र, कारवाईस प्रारंभ झाला. महसूल विभागाकडून वसुलीचे लक्ष्य समोर ठेवूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार टॉवर्स कंपन्यांकडून ही वसुली करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.काही कंपन्यांनी दंडाची रक्कम भरली नसल्याने महसूलने कारवाईचा बडगा उगारला होता. अखेर शहरात टॉवर्स असणाऱ्या काही कंपन्यांनी दंड नियमितपणे भरणा करण्यास सुरुवात केली आहे. खासगी जागा अकृषक करूनच टावर्स उभारावेत, असा नियम आहे. तालुक्यात कोणत्याही ठिकाणी अकृषक न करता टॉवर्स उभारण्यात आले आहेत. जमीन अकृषक करणे हे काम गुंतागुंतीचे आहे. खेडमध्ये या कंपन्यांच्या टॉवर्सना कोणतीही जागा आपल्या नावावर अकृषक करता येत नाही. त्यामुळे या कंपन्या लाख मोलाच्या या जागा अकृषक न करता भरमसाठ भाडे देऊन आपला व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे.बीएसएनएल, आयडिया, एअरटेल, टाटा इंडिकॉम, रिलायन्स, वोडाफोन यांसारख्या कंपन्या मोबाईलचे टॉवर्स उभारून गडगंज व्यवसाय करीत आहेत. हे लक्षात येताच महसूल प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. सुरूवातीच्या काळात दंड भरणे टाळले होते. मात्र, महसुली दणका बसू लागल्यानंतर तहसील कार्यालयाने या कंपन्यांना थेट दंडात्मक कारवाई करणे भाग पाडले आहे. संबंधित टॉवर्सच्या जागा मालकांच्या नावाने थेट नोटीस पाठवल्यानंतर जागा मालकांनी टॉवर्स कंपन्यांना दंड भरण्यासंदर्भात फर्मानच काढले आहे. दंड भरत नसाल, तर टॉवर्सची जागा रिकामी करण्याची ताकीद दिली. मालकांनी टॉवर्सची जागा खाली करण्याची मोहीम सुरू केल्यानंतर या कंपन्यांनी आपला प्रत्येक वर्षाचा दंड भरण्याचे काम सुरू केले. या कंपन्या अनधिकृत का आहेत तसेच अकृषक जमिनी कृषक का करून घेत नाहीत? याविषयी नायब तहसिलदारांनी कंपन्यांना शेतकऱ्यांकडील जमिनी खरेदी करता येत नसल्याचे सांगितले आहे. जमिनी अकृषक करण्यास आणि अनधिकृत परवाना घेण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतल्याने कंपन्यांच्या बाजूने कौल दिल्यास हा महसूलदेखील बुडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.