शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर्सच्या जमिनी कृषकच

By admin | Updated: February 4, 2015 23:55 IST

खेड तालुका : मोबाईल कंपन्यांची दंडाबाबत दादागिरी

श्रीकांत चाळके - खेड --तालुक्यातील विविध ठिकाणी असलेले मोबाईल कंपन्यांचे टॉवर्स अद्याप अधिकृत नाहीत. या कंपन्यांच्या टॉवर्सखालील जमीनही अकृषक नसल्याचे समोर आले आहे. खेड शहरातील १०, तर संपूर्ण तालुक्यातील उर्वरित ग्रामीण भागातील ६३ टॉवर्स कंपन्यांनी दादागिरी केली आहे. मात्र, दंडात्मक कारवाई करूनही या कंपन्यांची दादगिरी कायम राखली आहे. खेडमधील १० ठिकाणी हे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. शहरात काहींच्या घरांवर, तर काहींच्या खासगी जमिनीत हे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. जागामालकांना भरमसाठ भाडे देऊन या कंपन्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. कोणतीही परवानगी न घेता सर्व कंपन्यांनी गावोगावी टॉवर्स उभारले आहेत. त्यांच्याकडून सुरूवातीच्या काळात दंड भरला जात नव्हता. मात्र, कारवाईस प्रारंभ झाला. महसूल विभागाकडून वसुलीचे लक्ष्य समोर ठेवूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार टॉवर्स कंपन्यांकडून ही वसुली करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.काही कंपन्यांनी दंडाची रक्कम भरली नसल्याने महसूलने कारवाईचा बडगा उगारला होता. अखेर शहरात टॉवर्स असणाऱ्या काही कंपन्यांनी दंड नियमितपणे भरणा करण्यास सुरुवात केली आहे. खासगी जागा अकृषक करूनच टावर्स उभारावेत, असा नियम आहे. तालुक्यात कोणत्याही ठिकाणी अकृषक न करता टॉवर्स उभारण्यात आले आहेत. जमीन अकृषक करणे हे काम गुंतागुंतीचे आहे. खेडमध्ये या कंपन्यांच्या टॉवर्सना कोणतीही जागा आपल्या नावावर अकृषक करता येत नाही. त्यामुळे या कंपन्या लाख मोलाच्या या जागा अकृषक न करता भरमसाठ भाडे देऊन आपला व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे.बीएसएनएल, आयडिया, एअरटेल, टाटा इंडिकॉम, रिलायन्स, वोडाफोन यांसारख्या कंपन्या मोबाईलचे टॉवर्स उभारून गडगंज व्यवसाय करीत आहेत. हे लक्षात येताच महसूल प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. सुरूवातीच्या काळात दंड भरणे टाळले होते. मात्र, महसुली दणका बसू लागल्यानंतर तहसील कार्यालयाने या कंपन्यांना थेट दंडात्मक कारवाई करणे भाग पाडले आहे. संबंधित टॉवर्सच्या जागा मालकांच्या नावाने थेट नोटीस पाठवल्यानंतर जागा मालकांनी टॉवर्स कंपन्यांना दंड भरण्यासंदर्भात फर्मानच काढले आहे. दंड भरत नसाल, तर टॉवर्सची जागा रिकामी करण्याची ताकीद दिली. मालकांनी टॉवर्सची जागा खाली करण्याची मोहीम सुरू केल्यानंतर या कंपन्यांनी आपला प्रत्येक वर्षाचा दंड भरण्याचे काम सुरू केले. या कंपन्या अनधिकृत का आहेत तसेच अकृषक जमिनी कृषक का करून घेत नाहीत? याविषयी नायब तहसिलदारांनी कंपन्यांना शेतकऱ्यांकडील जमिनी खरेदी करता येत नसल्याचे सांगितले आहे. जमिनी अकृषक करण्यास आणि अनधिकृत परवाना घेण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतल्याने कंपन्यांच्या बाजूने कौल दिल्यास हा महसूलदेखील बुडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.