शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

तासगावचे शेतकरी द्राक्षाच्या विक्रीसाठी रत्नागिरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:31 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तासगाव तालुक्यातील येळावी येथील संदीप पवार आणि इकबाल पठाण हे दोन शेतकरी आपल्या बागेतील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तासगाव तालुक्यातील येळावी येथील संदीप पवार आणि इकबाल पठाण हे दोन शेतकरी आपल्या बागेतील द्राक्षांच्या विक्रीसाठी रत्नागिरीत आले आहेत. दोन किलोच्या बाॅक्समधून ही द्राक्षे विकली जात आहेत. एका खेपेला सुमारे एक हजार किलो द्राक्षे घेऊन हे शेतकरी गेले पंधरा दिवस अधूनमधून येत आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांना कमी दरात द्राक्षे मिळू लागली आहेत.

रत्नागिरीत सध्या द्राक्षे ८० ते १०० रुपये किलो दराने बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून द्राक्षे विकली जात आहेत; मात्र गेल्या १५ दिवसांपासून तासगाव तालुक्यातील येळावी येथील शेतकरी पवार आणि पठाण हे दोन शेतकरी दोन तीन दिवसांनंतर रत्नागिरी येथे आपल्या बागेतील द्राक्षे घेऊन येत आहेत. पवार यांची येळावी येथे सुमारे दोन हजार हेक्टरवर द्राक्षाची बाग आहे. कोरोना काळात उत्पादनाचा उठाव न झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांकडून कमी भावात मागणी होऊ लागली. त्यामुळे हे नुकसान सोसण्यापेक्षा कोकणात जावून द्राक्षांची विक्री केल्यास थोडाफार नफा मिळेल, या विचाराने रत्नागिरीत आल्याचे पवार यांनी सांगितले.

शहरातील रस्त्यालगत वाहन थांबवून हे दोन शेतकरी दिवसभर द्राक्षाची विक्री करीत आहेत, अन्य ठिकाणी ८० ते १०० रुपयांनी द्राक्षे विकली जात आहेत; मात्र त्या दरात या शेतकऱ्यांकडून दीड ते दोन किलो द्राक्षे मिळत असल्याने या शेतकऱ्यांच्या द्राक्षाला चांगलाच उठाव मिळत आहे. रत्नागिरीप्रमाणेच कराड, आंबा आदी ठिकाणीही द्राक्षे पाठविली जात आहेत. दोन किलोच्या बाॅक्समधून द्राक्षांची विक्री केली जात आहे.

चौकट

रत्नागिरीतील नागरिकांना इतर ठिकाणांपेक्षा या शेतकऱ्यांकडून कमी दराने द्राक्षे मिळत असल्याने द्राक्षाच्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे; मात्र यामुळे शहरातील बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांच्या विक्रीवर परिणाम होऊ लागताच त्यापैकी काहींनी या शेतकऱ्यांना रत्नागिरीत द्राक्षे विकायला यायचे नाही, अशी दमदाटी केल्याचेही या शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या जागतिक स्तरावर सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या असतानाच रत्नागिरीकरांना भरमसाठ दराने भाजी, फळे विकणाऱ्या बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांकडून अशी दमदाटी केल्याबद्दल काही नागरिकांनीच गुरुवारी संताप व्यक्त केला.