शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

तासगावचे शेतकरी द्राक्षाच्या विक्रीसाठी रत्नागिरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:31 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तासगाव तालुक्यातील येळावी येथील संदीप पवार आणि इकबाल पठाण हे दोन शेतकरी आपल्या बागेतील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तासगाव तालुक्यातील येळावी येथील संदीप पवार आणि इकबाल पठाण हे दोन शेतकरी आपल्या बागेतील द्राक्षांच्या विक्रीसाठी रत्नागिरीत आले आहेत. दोन किलोच्या बाॅक्समधून ही द्राक्षे विकली जात आहेत. एका खेपेला सुमारे एक हजार किलो द्राक्षे घेऊन हे शेतकरी गेले पंधरा दिवस अधूनमधून येत आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांना कमी दरात द्राक्षे मिळू लागली आहेत.

रत्नागिरीत सध्या द्राक्षे ८० ते १०० रुपये किलो दराने बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून द्राक्षे विकली जात आहेत; मात्र गेल्या १५ दिवसांपासून तासगाव तालुक्यातील येळावी येथील शेतकरी पवार आणि पठाण हे दोन शेतकरी दोन तीन दिवसांनंतर रत्नागिरी येथे आपल्या बागेतील द्राक्षे घेऊन येत आहेत. पवार यांची येळावी येथे सुमारे दोन हजार हेक्टरवर द्राक्षाची बाग आहे. कोरोना काळात उत्पादनाचा उठाव न झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांकडून कमी भावात मागणी होऊ लागली. त्यामुळे हे नुकसान सोसण्यापेक्षा कोकणात जावून द्राक्षांची विक्री केल्यास थोडाफार नफा मिळेल, या विचाराने रत्नागिरीत आल्याचे पवार यांनी सांगितले.

शहरातील रस्त्यालगत वाहन थांबवून हे दोन शेतकरी दिवसभर द्राक्षाची विक्री करीत आहेत, अन्य ठिकाणी ८० ते १०० रुपयांनी द्राक्षे विकली जात आहेत; मात्र त्या दरात या शेतकऱ्यांकडून दीड ते दोन किलो द्राक्षे मिळत असल्याने या शेतकऱ्यांच्या द्राक्षाला चांगलाच उठाव मिळत आहे. रत्नागिरीप्रमाणेच कराड, आंबा आदी ठिकाणीही द्राक्षे पाठविली जात आहेत. दोन किलोच्या बाॅक्समधून द्राक्षांची विक्री केली जात आहे.

चौकट

रत्नागिरीतील नागरिकांना इतर ठिकाणांपेक्षा या शेतकऱ्यांकडून कमी दराने द्राक्षे मिळत असल्याने द्राक्षाच्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे; मात्र यामुळे शहरातील बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांच्या विक्रीवर परिणाम होऊ लागताच त्यापैकी काहींनी या शेतकऱ्यांना रत्नागिरीत द्राक्षे विकायला यायचे नाही, अशी दमदाटी केल्याचेही या शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या जागतिक स्तरावर सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या असतानाच रत्नागिरीकरांना भरमसाठ दराने भाजी, फळे विकणाऱ्या बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांकडून अशी दमदाटी केल्याबद्दल काही नागरिकांनीच गुरुवारी संताप व्यक्त केला.