शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

वाढत्या पावसाचा ओघ बघता शेतकऱ्यांनी शेतीची काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST

दापोली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोमवारपासून पावसाचा आलेख वाढला आहे. मात्र, गुरुवारी पहाटे जोरदार पडणारा ...

दापोली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोमवारपासून पावसाचा आलेख वाढला आहे. मात्र, गुरुवारी पहाटे जोरदार पडणारा पाऊस दुपारच्या सत्रात शांत झाला हाेता; मात्र मुंबई हवामान केंद्राकडून पावसाचा जोरदार तर अति जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची काळजी घेण्याचे आवाहन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार आहे. पूर्व किनाऱ्याकडे येणाऱ्या या प्रणालीमुळे कोकण विभागात पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. कोकण विभागातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी काेसळल्या हाेत्या. तर २६ सप्टेंबर रोजी कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाच्या पावसाची तर मुंबई, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांची मात्रा, कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणीची कामे पुढे ढकलावीत. नवीन फळबाग लागवड केलेल्या कलमांच्या बुंध्याजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

तसेच भात, भाजीपाला पिके, भुईमूग, हळद, नारळ, सुपारी, चिकू, केळी, पपई बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. पक्व हळवे भात खाचरातून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होण्याचा आवाज ऐकण्यात आल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडाच्या आडोशाला उभे राहू नये तसेच पशुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे, झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू किंवा मोकळे सोडू नये, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.