शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

वाढत्या पावसाचा ओघ बघता शेतकऱ्यांनी शेतीची काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

दापोली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोमवारपासून पावसाचा आलेख वाढला आहे. मात्र, गुरुवारी पहाटे जोरदार पडणारा ...

दापोली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोमवारपासून पावसाचा आलेख वाढला आहे. मात्र, गुरुवारी पहाटे जोरदार पडणारा पाऊस दुपारच्या सत्रात शांत झाला हाेता; मात्र मुंबई हवामान केंद्राकडून पावसाचा जोरदार तर अति जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची काळजी घेण्याचे आवाहन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार आहे. पूर्व किनाऱ्याकडे येणाऱ्या या प्रणालीमुळे कोकण विभागात पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. कोकण विभागातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी काेसळल्या हाेत्या. तर २६ सप्टेंबर रोजी कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाच्या पावसाची तर मुंबई, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांची मात्रा, कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणीची कामे पुढे ढकलावीत. नवीन फळबाग लागवड केलेल्या कलमांच्या बुंध्याजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

तसेच भात, भाजीपाला पिके, भुईमूग, हळद, नारळ, सुपारी, चिकू, केळी, पपई बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. पक्व हळवे भात खाचरातून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होण्याचा आवाज ऐकण्यात आल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडाच्या आडोशाला उभे राहू नये तसेच पशुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे, झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू किंवा मोकळे सोडू नये, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.