शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

शेतकऱ्यांनी जैविक खतांचा वापर करून उत्पन्न वाढवावे : मनोज गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

अडरे : शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात व असंतुलित केला जातो़ त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात किंवा शिफारशीनुसार ...

अडरे : शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात व असंतुलित केला जातो़ त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात किंवा शिफारशीनुसार खत मात्रा पिकांना उपलब्ध होत नाही़ परिणामी पीक उत्पादन खर्चात वाढ होते़ हिरवळीची खते, भाताचा कोंडा व गिरीपुष्पपाला, शेणखत, जैविक खतांचा वापर करून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी केले. चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन जागृती मोहिमेअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, माती परीक्षणानुसार खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता पातळी टिकवून पिकास आवश्यक अन्नद्रव्याचा पुरवठा योग्य त्या प्रमाणात केला जातो. रासायनिक खताचा संतुलित वापर केल्यास शेतकरी निश्चितच करत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. नत्रयुक्त खताची मात्रा एकाच वेळेस न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी.

तसेच घरचे बियाणे वापरताना उगवण क्षमता चाचणी, ३ टक्के मिठाच्या द्रावणाच्या पाण्याची बीजप्रक्रिया, जैविक खताची बीज प्रक्रिया कशी करावी याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.

सोसायटीचे चेअरमन, भाई शिंदे सुपिकता निर्देशांकाप्रमाणे खत वापरावेत. संयुक्त खते मागणीप्रमाणे उपलब्ध करून देऊ. तसेच शेतकरी पडीक जमिनीवर फळबाग वाढवून आर्थिक स्थर उंचवावा.

सरपंच अनिल शिंदे यांनी भविष्यात शेतकऱ्यांनी बियाणे बाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्याकडील स्थानिक वाणांचे संवर्धन केले पाहिजे, असे संगितले. यावेळी भाई शिंदे, चेअरमन अनिल शिंदे, सरपंच दत्ताराम बंगाल, अजय शिंदे, गणेश शिंदे, सुनील शिंदे व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कृषी सहायक दादा खारतोडे यांनी केले हाेते़

----------------------

चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे जागृती माेहिमेअंतर्गत कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले़