शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी जैविक खतांचा वापर करून उत्पन्न वाढवावे : मनोज गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

अडरे : शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात व असंतुलित केला जातो़ त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात किंवा शिफारशीनुसार ...

अडरे : शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात व असंतुलित केला जातो़ त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात किंवा शिफारशीनुसार खत मात्रा पिकांना उपलब्ध होत नाही़ परिणामी पीक उत्पादन खर्चात वाढ होते़ हिरवळीची खते, भाताचा कोंडा व गिरीपुष्पपाला, शेणखत, जैविक खतांचा वापर करून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी केले. चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन जागृती मोहिमेअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, माती परीक्षणानुसार खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता पातळी टिकवून पिकास आवश्यक अन्नद्रव्याचा पुरवठा योग्य त्या प्रमाणात केला जातो. रासायनिक खताचा संतुलित वापर केल्यास शेतकरी निश्चितच करत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. नत्रयुक्त खताची मात्रा एकाच वेळेस न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी.

तसेच घरचे बियाणे वापरताना उगवण क्षमता चाचणी, ३ टक्के मिठाच्या द्रावणाच्या पाण्याची बीजप्रक्रिया, जैविक खताची बीज प्रक्रिया कशी करावी याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.

सोसायटीचे चेअरमन, भाई शिंदे सुपिकता निर्देशांकाप्रमाणे खत वापरावेत. संयुक्त खते मागणीप्रमाणे उपलब्ध करून देऊ. तसेच शेतकरी पडीक जमिनीवर फळबाग वाढवून आर्थिक स्थर उंचवावा.

सरपंच अनिल शिंदे यांनी भविष्यात शेतकऱ्यांनी बियाणे बाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्याकडील स्थानिक वाणांचे संवर्धन केले पाहिजे, असे संगितले. यावेळी भाई शिंदे, चेअरमन अनिल शिंदे, सरपंच दत्ताराम बंगाल, अजय शिंदे, गणेश शिंदे, सुनील शिंदे व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कृषी सहायक दादा खारतोडे यांनी केले हाेते़

----------------------

चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे जागृती माेहिमेअंतर्गत कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले़