शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसात २ हजार ७९७ शेतकऱ्यांचे अर्ज

By admin | Updated: May 27, 2016 23:23 IST

रत्नागिरी तहसील : खरीप पीक कर्जाचे परिपूर्ण प्रस्ताव

रत्नागिरी : खरीप पीक कर्ज वाटप अभियानाने रत्नागिरी तालुक्यात चांगलीच गती घेतली असून, आजपर्यंत अवघ्या पाच दिवसांत २७९७ शेतकऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव विविध बँकांकडे सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी दिली. सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या तालुकास्तरीय समितीची आढावा बैठक झाली.जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी नियोजन केल्यानुसार तालुकास्तरीय समितीचे काम सुरू झाले आहे. त्याकरिता १८ मे रोजी तालुकास्तरीय समितीतील सर्व सदस्यांची सभा घेण्यात आली. यावेळी तहसीलदार सुकटे यांनी या अभियानांतर्गत संवेदनशीलपणे कार्यवाही करण्याचे निर्देश सर्वांना दिले. १९ रोजी या अभियानासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. यात कृषी सहायक, कृषीसेवक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विविध सेवा सहकारी सोसायटीचे सचिव अशा १०८ जणांची क्षेत्रिय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर २० व २३ रोजी आढावा बैठका घेण्यात आल्या.गुरूवारी पुन्हा या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी तालुकास्तरीय समितीची आढावा बैठक बोलावली. यावेळी विविध राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील २७९७ शेतकऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव बँकांकडे सादर करण्यात आले. केवळ पाच दिवसांत तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेला भरघोस प्रतिसाद दिला. अर्ज सादर करण्यासाठी असलेली २३ मेपर्यंतची मुदत जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मेपर्यंत वाढवून दिली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न बँकांकडून व्हावा, असे आवाहन तहसीदार सुकटे यांनी याप्रसंगी केले. सध्या क्षेत्रिय अधिकारी शेतकऱ्यांमध्ये खरीप पीक कर्ज योजनेसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृती करीत आहेत. तलाठ्यांना या योजनेसाठी मोफत सातबारा देण्याच्या सूचना तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी दिल्या आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत आता ३० मे पर्यंत वाढविण्यात आली असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)कामात सुसूत्रता : जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांचे नियोजननूतन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व विभागातील कामांकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. शासकीय कार्यालयाचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, या हेतूने त्यांनी प्रत्येक विभागात सुसूत्रता आणण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार त्यांनी कामांचे नियोजनही केले आहे.