शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

पाच दिवसात २ हजार ७९७ शेतकऱ्यांचे अर्ज

By admin | Updated: May 27, 2016 23:23 IST

रत्नागिरी तहसील : खरीप पीक कर्जाचे परिपूर्ण प्रस्ताव

रत्नागिरी : खरीप पीक कर्ज वाटप अभियानाने रत्नागिरी तालुक्यात चांगलीच गती घेतली असून, आजपर्यंत अवघ्या पाच दिवसांत २७९७ शेतकऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव विविध बँकांकडे सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी दिली. सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या तालुकास्तरीय समितीची आढावा बैठक झाली.जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी नियोजन केल्यानुसार तालुकास्तरीय समितीचे काम सुरू झाले आहे. त्याकरिता १८ मे रोजी तालुकास्तरीय समितीतील सर्व सदस्यांची सभा घेण्यात आली. यावेळी तहसीलदार सुकटे यांनी या अभियानांतर्गत संवेदनशीलपणे कार्यवाही करण्याचे निर्देश सर्वांना दिले. १९ रोजी या अभियानासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. यात कृषी सहायक, कृषीसेवक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विविध सेवा सहकारी सोसायटीचे सचिव अशा १०८ जणांची क्षेत्रिय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर २० व २३ रोजी आढावा बैठका घेण्यात आल्या.गुरूवारी पुन्हा या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी तालुकास्तरीय समितीची आढावा बैठक बोलावली. यावेळी विविध राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील २७९७ शेतकऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव बँकांकडे सादर करण्यात आले. केवळ पाच दिवसांत तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेला भरघोस प्रतिसाद दिला. अर्ज सादर करण्यासाठी असलेली २३ मेपर्यंतची मुदत जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मेपर्यंत वाढवून दिली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न बँकांकडून व्हावा, असे आवाहन तहसीदार सुकटे यांनी याप्रसंगी केले. सध्या क्षेत्रिय अधिकारी शेतकऱ्यांमध्ये खरीप पीक कर्ज योजनेसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृती करीत आहेत. तलाठ्यांना या योजनेसाठी मोफत सातबारा देण्याच्या सूचना तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी दिल्या आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत आता ३० मे पर्यंत वाढविण्यात आली असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)कामात सुसूत्रता : जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांचे नियोजननूतन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व विभागातील कामांकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. शासकीय कार्यालयाचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, या हेतूने त्यांनी प्रत्येक विभागात सुसूत्रता आणण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार त्यांनी कामांचे नियोजनही केले आहे.