शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

कृषिसेवकाला उपसरपंचाची धमकी

By admin | Updated: July 28, 2015 23:51 IST

नाखरे येथील प्रकार : कारवाई करण्याची मागणी

पाली : रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावचे कृषिसेवक श्याम ज्ञानदेव माळशिकारे यांना नाखरे येथील उपसरपंचांनी धमकावल्याच्या प्रकाराने खळबळ माजली आहे.आंबा नुकसानाच्या यादीत शिल्लक राहिलेली नावे समावेश करण्याकरिता ग्रामपंचायत नाखरे येथे बोलावून उर्वरित नावे यादीमध्ये समावेश करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी माळशिकारे यांनी हे काम माझे एकट्याचे नसून ग्रामसेवक, तलाठी, कृषिसेवक व सहाय्यकांनी संयुक्तपणे काम करायचे आहे. त्यानंतर तलाठ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कामांमुळे तूर्तास येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतरही माळशिकारे यांना जोपर्यंत तलाठी येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नाही, असे उपसरपंचाने धमकावले. याविरुद्ध महाराष्ट्र राज्य कृ षी सहाय्यक संघटना, रत्नागिरी शाखेतर्फे संबंधितांवर योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याबाबत योग्य कारवाई करण्यात आली नाही तर आंबा नुकसानाच्या संगणकीकृत याद्या करण्याचे काम स्थगित करण्यात येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.सर्व कृषी सहाय्यक, सेवक हे आंबा नुकसानाच्या संगणकीकृ त याद्या तयार करीत होते. त्यावेळी उपसरपंच, नाखरे यांनी या सजाचे कृषिसेवकश्याम माळशिकारे यांना फोन करुन यादीत शिल्लक राहिलेली नावे समावेश करण्याकरिता ग्रामपंचायतीत बोलावण्यात आले. माळशिकारे हे २३ जुलै रोजी नाखरे येथे गेले. त्यावेळी उपसरपंचांनी नाखरे गावातील आंबा नुकसानाची उर्वरित नावे यादीमध्ये समावेश करण्याचा आग्रह धरला.उपसरपंचांनी कृषिसेवकांना संबंधित तलाठ्यांना बोलावून घेण्यास सांगितले. त्यावेळी कृषिसेवकांना तलाठ्यांनी येणे शक्य नाही, असे दूरध्वनीवरुन सांगितले. त्यानंतर उपसरपंच नाखरे ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरुन तहसीलदार, रत्नागिरी यांना फोन करण्यास सांगितले. त्यानंतरही कृषिसेवकांनी हे काम सर्वस्वी कृषी विभागाचेच आहे, असे सांगितले. प्रत्यक्षात पंचनाम्याचे काम संयुक्त असून, नैसर्गिक आपत्ती संबंधितचे शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना याप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचनामे करण्यासंबंधी आदेश देणे आवश्यक आहे. त्यानुसारच तिन्ही यंत्रणा मिळून संयुक्त पंचनामे होणे आवश्यक आहेत, असे सांगितले. केवळ कृषी विभागाची जबाबदारी नाही, असे आमचे मत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरही माळशिकारे यांना जोपर्यंत तलाठी येत नाही तोपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नही, असे धमकावले. त्यांच्या गाडीची चावी, लॅपटॉपसह दप्तराची बॅग काढून घेतली. त्यानंतर माळशिकारे यांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यावर जिल्हा अधीक्षक कृषी यांनी तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी यांच्रामार्फ त माळशिकारे यांना एस. टी. बसने रत्नागिरी कार्यालयास निघून येण्यास सांगितले. त्यावेळी उपसरपंचांनी सर्व साहित्य माळशिकारे यांना परत केले, असे निवेदनात म्हटले आहे.मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठीच त्यांना त्वरित नुकसानभरपाई प्राप्त होण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची पंचनामा यादी संगणकीकृत करुन देत आहोत. मात्र, अशा प्रकारे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना धमकी व इतर मानसिक त्रास होत असेल तर काम करताना अत्यंत कठीण होत आहे. कृषी सेवक माळशिकारे यांना दिलेल्या धमकीबद्दल संबंधितांवर योग्य ती कार्यवाही व्हावी. अन्यथा आंबा नुकसानाच्या संगणकीकृ त याद्या करण्याचे काम स्थगित करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना, रत्नागिरी अध्यक्ष रघुनाथ डबरी यांनी सांगितले. या साऱ्या प्रकाराबाबत कृषी संघटनेने निवेदन दिल्यानंतर आता पुढे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)नुकसानाग्रस्त शेतकऱ्यांची यादी कोकणात यंदा आंबा नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. या नुकसानभरपाईसाठी आवश्यक नावे यादीत समाविष्ट करण्याचे काम सुरू. तलाठी येत नाहीत तोपर्यंत जाऊ न देण्याची धमकी दिल्याप्रकरणी कृषी सहाय्यक संघटनेतर्फे निवेदन. आंबा नुकसानाच्या शिल्लक नावांची नोंद करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असतानाच हा प्रकार गंभीर. आपत्कालिन परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचनामे करण्याचे आदेश.