शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

मंडणगडच्या शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: June 1, 2017 23:12 IST

मंडणगडच्या शेतकऱ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कमंडणगड : कर्ज फेडण्यासाठी बँकेने तगादा लावल्याने वेरळ तर्फ नातूनगर (ता.मंडणगड) येथील बुध्ददास लक्ष्मण साळवी (वय ५८) या शेतकऱ्याने बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमाराला राहत्या घराच्या छपराला गळफास घेऊन आत्महत्या केली. कोकणातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे. आत्महत्येनंतर रिपब्लिकन पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष आदेश मर्चंडे यांनी बँक व्यवस्थापनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.बुद्धदास यांचा मुलगा भीमराज साळवी यांनी मंडणगड पोलिसांत फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुद्धदास साळवी यांनी बँक आॅफ इंडियाच्या मंडणगड येथील शाखेकडून एक लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जाचे हप्ते त्यांना वेळच्या वेळी भरता येत नव्हते. कर्ज फेड करण्यासाठी बँकेकडून वसुलीचा तगादा लावला जात होता. बुधवारी त्यांना बँकेची नोटीसही देण्यात आली होती. तसेच हप्ते भरण्यासाठी वारंवार फोनही येत होते. यामुळे ते निराश होते. बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमाराला त्यांनी राहत्या घराच्या छपराला गळफास घेऊन आत्महत्या केली. साळवी यांच्या मृतदेहाचे विच्छेदन दापोली उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. साळवी यांच्या पश्चात पत्नी भारती आणि परेश, भीमराज, पुष्पराज ही तीन मुले आहेत. यातील परेश महाड एमआयडीसीमध्ये एका कंपनीत काम करतो.दोन वर्षांपूर्वी बाग आगीत खाकसाळवी यांनी आपल्या घरापासून दूर असलेल्या नदीजवळील जागेत आंब्याची लागवड मोठ्या आशेने केली होती. मात्र, ती आशाही त्यांची अधुरीच ठरली. २०१४ मध्ये वणव्यामुळे आंबा कलमे जळून खाक झाली. आधीच आर्थिक संकटात सापडलेले बुद्धदास साळवी आणखीनच संकटात सापडले. चिंता वाढत होतीवडिलांना मदत म्हणून माझ्या नोकरीच्या पगारातून कर्जाचा हप्ता भरू, असा दिलासा वडिलांना दिला होता. मात्र, वडिलांची चिंता कमी होत नव्हती. याच कठीण परिस्थितीमुळे आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे परेश साळवी याने सांगितले. तीन वर्षांपूर्वी घेतले कर्जआंबा पिकासाठी तीन वर्षांपूर्वी बँक आॅफ इंडियाकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, त्यापैकी एकही हप्ता त्यांनी भरलेला नव्हता. त्यांच्यावर १ लाख २६ हजारांचे कर्ज होते, अशी माहिती बँक व्यवस्थापनाने दिली.