शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी फिरुनच सांभाळतो कुटुंबाचा डोलारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 23:39 IST

जयेंद्र राऊत : अनेकांनी दिली ‘झोळीवाले राऊत’ अशी उपमा; तरीही दिले मुलांना चांगले शिक्षण

आवाशी : फुगे विकून मी कसेबसे सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेणे जमले नाही. मात्र, तेव्हापासूनच लोकांच्या घरोघरी फिरून विविध वस्तूंच्या विक्रीतून उदरनिर्वाह करणे हे आपल्या नशिबी आले व पुढे तोच आपला प्रमुख व्यवसाय झाला. या व्यवसायाला न्याय देत आज तब्बल ३८ वर्षे हे काम आपण मनापासून करत असून, संपूर्ण कुटुंबाचा डोलारा आपण याच कामातून सांभाळत असल्याचा अभिमान वाटतो, असे वयाच्या ५६ व्या वर्षीही गावोगावी वस्तू विक्री करणारे जयेंद्र राऊत सांगतात.जयेंद्र महादेव राऊत हे खेड तालुक्यातील आवाशी गावातील (मधलीवाडी) गृहस्थ. तीन वर्षांपूर्वी ते मुंबई सोडून पत्नी सविता सोबत गावी आले. गावी आल्यापासून राऊत हे सकाळी ९ वाजले की, काखेला जुन्या पद्धतीची झोळी लावून घराबाहेर पडतात. भेटणाऱ्या प्रत्येकाला ते ‘ओम नम: शिवाय’ असा नमस्कार घालणे कधीही चुकवत नाहीत. जुन्या पद्धतीची झोळी लावून गावोगावी फिरणाऱ्या राऊतांना अनेकांनी ‘झोळीवाले राऊत’ अशी उपमाही दिली आहे. त्यांच्या या फिरत्या व्यवसायाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा जीवनपटच समोर आला.जयेंद्र राऊत हे मूळ जरी आवाशी गावचे असले, तरी त्यांचे बालपण व तरुणपण हे मुंबईतील मालाड येथे गेले. ते दीड वर्षाचे असताना त्यांच्यावरील आईचे छत्र हरपले. त्यानंतर वडिलांनीच त्यांचा सांभाळ केला. ७ वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्यांनी फुगे विकून पूर्ण केले. त्यामुळे त्यांना मुंबईतच पडेल ते काम करण्याची सवय लागली. वयाच्या अठराव्या वर्षी मुंबईत त्यांना एका माणसाने ‘इमिटेशन ज्वेलरी’च्या कारखान्यात कामाला ठेवले. या कारखान्यात काम करण्याआधी त्यांनी मच्छी विकणे, भाजी विकणे अशी कामेदेखील केली. या कारखान्यामध्ये बनविलेले बेन्टेक्सचे दागिने घरोघरी जावून विकण्याचे काम जयेंद्र हे करत असत. याचबरोबर विविध प्रकारचे कपडे, अगरबत्ती यांचीही विक्री ते याच्या जोडीने करत असत.याच व्यवसायावर त्यांनी आपला उदरनिर्वाह चालू केला. वडील गेल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी लग्न केले. आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ते याच व्यवसायावर भागवत असत. याच व्यवसायाच्या आधारे त्यांनी आपल्या मुलाला पदवीधर तर मुलीला १२ वीपर्यंत शिक्षण दिले. आज त्यांची दोन्ही मुले विवाहित असून, नोकरी करत आहेत. मात्र, राऊत यांना लागलेली या व्यवसायातील गोडी ही गावी आल्यानंतरही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर गावातच त्यांनी इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचा कारखाना सुरु केला. ते येथे पत्नीच्या मदतीने वेगवेगळे दागिने बनवतात. हे दागिने आजही ते पायी प्रवास करून घरोघरी जावून विकतात. आजही त्यांनी आपला जुना व्यवसाय थांबविलेला नाही. आजही त्यांचा हा दिनक्रम सुरूच आहे. (वार्ताहर)‘‘मी दीड वर्षाचा असताना माझी आई हे जग सोडून गेली. मला आईला पाहिलेले नीटसे आठवत देखील नाही. तेव्हापासून वडिलांच्या मायेखाली वाढलो. आम्ही एकूण तीन भावंडे, तेव्हाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. वयाच्या ११ व्या वर्षी मी मुंबईत फुगे विकायचो. त्यावेळी मी इयत्ता ५ वीत शिकत होतो. बालडोंगरी प्राथमिक शाळा, मालाड येथे ७ वीपर्यंत शिक्षण घेतले. ७ वीपर्यंत शिकत असताना मी फुगे विकायचो. घरोघरी जावून वस्तू विकून उदरनिर्वाह करण्याचेच आपल्या नशिबी असल्याने आपण ती स्वीकारले.’’