शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

घरोघरी फिरुनच सांभाळतो कुटुंबाचा डोलारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 23:39 IST

जयेंद्र राऊत : अनेकांनी दिली ‘झोळीवाले राऊत’ अशी उपमा; तरीही दिले मुलांना चांगले शिक्षण

आवाशी : फुगे विकून मी कसेबसे सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेणे जमले नाही. मात्र, तेव्हापासूनच लोकांच्या घरोघरी फिरून विविध वस्तूंच्या विक्रीतून उदरनिर्वाह करणे हे आपल्या नशिबी आले व पुढे तोच आपला प्रमुख व्यवसाय झाला. या व्यवसायाला न्याय देत आज तब्बल ३८ वर्षे हे काम आपण मनापासून करत असून, संपूर्ण कुटुंबाचा डोलारा आपण याच कामातून सांभाळत असल्याचा अभिमान वाटतो, असे वयाच्या ५६ व्या वर्षीही गावोगावी वस्तू विक्री करणारे जयेंद्र राऊत सांगतात.जयेंद्र महादेव राऊत हे खेड तालुक्यातील आवाशी गावातील (मधलीवाडी) गृहस्थ. तीन वर्षांपूर्वी ते मुंबई सोडून पत्नी सविता सोबत गावी आले. गावी आल्यापासून राऊत हे सकाळी ९ वाजले की, काखेला जुन्या पद्धतीची झोळी लावून घराबाहेर पडतात. भेटणाऱ्या प्रत्येकाला ते ‘ओम नम: शिवाय’ असा नमस्कार घालणे कधीही चुकवत नाहीत. जुन्या पद्धतीची झोळी लावून गावोगावी फिरणाऱ्या राऊतांना अनेकांनी ‘झोळीवाले राऊत’ अशी उपमाही दिली आहे. त्यांच्या या फिरत्या व्यवसायाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा जीवनपटच समोर आला.जयेंद्र राऊत हे मूळ जरी आवाशी गावचे असले, तरी त्यांचे बालपण व तरुणपण हे मुंबईतील मालाड येथे गेले. ते दीड वर्षाचे असताना त्यांच्यावरील आईचे छत्र हरपले. त्यानंतर वडिलांनीच त्यांचा सांभाळ केला. ७ वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्यांनी फुगे विकून पूर्ण केले. त्यामुळे त्यांना मुंबईतच पडेल ते काम करण्याची सवय लागली. वयाच्या अठराव्या वर्षी मुंबईत त्यांना एका माणसाने ‘इमिटेशन ज्वेलरी’च्या कारखान्यात कामाला ठेवले. या कारखान्यात काम करण्याआधी त्यांनी मच्छी विकणे, भाजी विकणे अशी कामेदेखील केली. या कारखान्यामध्ये बनविलेले बेन्टेक्सचे दागिने घरोघरी जावून विकण्याचे काम जयेंद्र हे करत असत. याचबरोबर विविध प्रकारचे कपडे, अगरबत्ती यांचीही विक्री ते याच्या जोडीने करत असत.याच व्यवसायावर त्यांनी आपला उदरनिर्वाह चालू केला. वडील गेल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी लग्न केले. आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ते याच व्यवसायावर भागवत असत. याच व्यवसायाच्या आधारे त्यांनी आपल्या मुलाला पदवीधर तर मुलीला १२ वीपर्यंत शिक्षण दिले. आज त्यांची दोन्ही मुले विवाहित असून, नोकरी करत आहेत. मात्र, राऊत यांना लागलेली या व्यवसायातील गोडी ही गावी आल्यानंतरही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर गावातच त्यांनी इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचा कारखाना सुरु केला. ते येथे पत्नीच्या मदतीने वेगवेगळे दागिने बनवतात. हे दागिने आजही ते पायी प्रवास करून घरोघरी जावून विकतात. आजही त्यांनी आपला जुना व्यवसाय थांबविलेला नाही. आजही त्यांचा हा दिनक्रम सुरूच आहे. (वार्ताहर)‘‘मी दीड वर्षाचा असताना माझी आई हे जग सोडून गेली. मला आईला पाहिलेले नीटसे आठवत देखील नाही. तेव्हापासून वडिलांच्या मायेखाली वाढलो. आम्ही एकूण तीन भावंडे, तेव्हाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. वयाच्या ११ व्या वर्षी मी मुंबईत फुगे विकायचो. त्यावेळी मी इयत्ता ५ वीत शिकत होतो. बालडोंगरी प्राथमिक शाळा, मालाड येथे ७ वीपर्यंत शिक्षण घेतले. ७ वीपर्यंत शिकत असताना मी फुगे विकायचो. घरोघरी जावून वस्तू विकून उदरनिर्वाह करण्याचेच आपल्या नशिबी असल्याने आपण ती स्वीकारले.’’