शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

घरोघरी फिरुनच सांभाळतो कुटुंबाचा डोलारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 23:39 IST

जयेंद्र राऊत : अनेकांनी दिली ‘झोळीवाले राऊत’ अशी उपमा; तरीही दिले मुलांना चांगले शिक्षण

आवाशी : फुगे विकून मी कसेबसे सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेणे जमले नाही. मात्र, तेव्हापासूनच लोकांच्या घरोघरी फिरून विविध वस्तूंच्या विक्रीतून उदरनिर्वाह करणे हे आपल्या नशिबी आले व पुढे तोच आपला प्रमुख व्यवसाय झाला. या व्यवसायाला न्याय देत आज तब्बल ३८ वर्षे हे काम आपण मनापासून करत असून, संपूर्ण कुटुंबाचा डोलारा आपण याच कामातून सांभाळत असल्याचा अभिमान वाटतो, असे वयाच्या ५६ व्या वर्षीही गावोगावी वस्तू विक्री करणारे जयेंद्र राऊत सांगतात.जयेंद्र महादेव राऊत हे खेड तालुक्यातील आवाशी गावातील (मधलीवाडी) गृहस्थ. तीन वर्षांपूर्वी ते मुंबई सोडून पत्नी सविता सोबत गावी आले. गावी आल्यापासून राऊत हे सकाळी ९ वाजले की, काखेला जुन्या पद्धतीची झोळी लावून घराबाहेर पडतात. भेटणाऱ्या प्रत्येकाला ते ‘ओम नम: शिवाय’ असा नमस्कार घालणे कधीही चुकवत नाहीत. जुन्या पद्धतीची झोळी लावून गावोगावी फिरणाऱ्या राऊतांना अनेकांनी ‘झोळीवाले राऊत’ अशी उपमाही दिली आहे. त्यांच्या या फिरत्या व्यवसायाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा जीवनपटच समोर आला.जयेंद्र राऊत हे मूळ जरी आवाशी गावचे असले, तरी त्यांचे बालपण व तरुणपण हे मुंबईतील मालाड येथे गेले. ते दीड वर्षाचे असताना त्यांच्यावरील आईचे छत्र हरपले. त्यानंतर वडिलांनीच त्यांचा सांभाळ केला. ७ वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्यांनी फुगे विकून पूर्ण केले. त्यामुळे त्यांना मुंबईतच पडेल ते काम करण्याची सवय लागली. वयाच्या अठराव्या वर्षी मुंबईत त्यांना एका माणसाने ‘इमिटेशन ज्वेलरी’च्या कारखान्यात कामाला ठेवले. या कारखान्यात काम करण्याआधी त्यांनी मच्छी विकणे, भाजी विकणे अशी कामेदेखील केली. या कारखान्यामध्ये बनविलेले बेन्टेक्सचे दागिने घरोघरी जावून विकण्याचे काम जयेंद्र हे करत असत. याचबरोबर विविध प्रकारचे कपडे, अगरबत्ती यांचीही विक्री ते याच्या जोडीने करत असत.याच व्यवसायावर त्यांनी आपला उदरनिर्वाह चालू केला. वडील गेल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी लग्न केले. आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ते याच व्यवसायावर भागवत असत. याच व्यवसायाच्या आधारे त्यांनी आपल्या मुलाला पदवीधर तर मुलीला १२ वीपर्यंत शिक्षण दिले. आज त्यांची दोन्ही मुले विवाहित असून, नोकरी करत आहेत. मात्र, राऊत यांना लागलेली या व्यवसायातील गोडी ही गावी आल्यानंतरही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर गावातच त्यांनी इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचा कारखाना सुरु केला. ते येथे पत्नीच्या मदतीने वेगवेगळे दागिने बनवतात. हे दागिने आजही ते पायी प्रवास करून घरोघरी जावून विकतात. आजही त्यांनी आपला जुना व्यवसाय थांबविलेला नाही. आजही त्यांचा हा दिनक्रम सुरूच आहे. (वार्ताहर)‘‘मी दीड वर्षाचा असताना माझी आई हे जग सोडून गेली. मला आईला पाहिलेले नीटसे आठवत देखील नाही. तेव्हापासून वडिलांच्या मायेखाली वाढलो. आम्ही एकूण तीन भावंडे, तेव्हाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. वयाच्या ११ व्या वर्षी मी मुंबईत फुगे विकायचो. त्यावेळी मी इयत्ता ५ वीत शिकत होतो. बालडोंगरी प्राथमिक शाळा, मालाड येथे ७ वीपर्यंत शिक्षण घेतले. ७ वीपर्यंत शिकत असताना मी फुगे विकायचो. घरोघरी जावून वस्तू विकून उदरनिर्वाह करण्याचेच आपल्या नशिबी असल्याने आपण ती स्वीकारले.’’