शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाळू व्यवसायाला मच्छीमारांचा विरोध

By admin | Updated: July 6, 2015 00:25 IST

दापोली तालुका : खाडीपुलाजवळ वाळू उत्खनन नको

आंजर्ले : आंजर्ले (ता. दापोली) खाडीपुलाला लागून असलेल्या जागेत व्यवसायासाठी कोणालाही परवानगी देऊ नये, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.आंजर्ले खाडी पुलामुळे आंजर्ले ते केळशी परिसर तालुक्याला जोडला गेला आहे. हा पूल सागरी महामार्गाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या पुलामुळे खऱ्या अर्थाने आंजर्ले ते केळशी परिसरातील गावांच्या विकासाला सुरूवात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी आंजर्ले खाडीत वाळू उत्खननाला परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी अडखळ उर्दू शाळेजवळ पुलाला लागून असलेल्या जागेत काहींनी वाळू व्यवसाय सुरू केला होता. यावरून वादंग उठला होता. मच्छिमार व काही जागरूक नागरिकांनी यावर आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतर न्यायालयाच्या बंदीमुळे शासनाकडून वाळू उत्खननास परवानगी देण्याचे थांबविण्यात आले. वाळू उत्खननासाठी शासनाकडून अधिकृत परवानगी दिली जाणार आहे. शासनाकडून अधिकृत परवानगी मिळणार असल्याने काही वाळू व्यावसायिक पुलाला लागून असलेल्या जागेत वाळू उत्खनन करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे पुलाला धोका निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत पुलाच्या दोन्ही बाजूंना लागून मच्छीमारांनी आपल्या नौका शाकारून ठेवल्या आहेत. गेली काही वर्षे या मच्छीमारी नौका पावसाळ्यात पुलाजवळ शाकारून ठेवल्या जातात. अडखळ उर्दू शाळेसमोरील जागेत काही वाळू व्यावसायिक पुन्हा वाळू व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. आंजर्ले खाडी पुलाला लागूनच ही जागा आहे. येथे वाळू उत्खनन करण्यास परवानगी दिल्यास खाडी पुलाला धोका निर्माण होणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात नौका शाकारून ठेवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत आंजर्ले खाडीपुलाला लागून असलेल्या जागेत वाळूसाठा करायला किंवा वाळू उत्खनन करायला प्रशासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे. ग्रामस्थ व मच्छीमारांचा विरोध विचारात न घेता प्रशासनाने पुलाजवळच वाळूसाठा किंवा वाळू उत्खनन करायला परवानगी दिली, तर संघर्ष पेटणार आहे. ‘लोकमत’ने तहसीलदार कल्पना गोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, ज्यावेळी वाळू उत्खननाला परवानगी देण्याबाबत अहवाल मागवला जाईल, त्यावेळी आम्ही पाहणी करणार आहोत. कोणत्याही स्थितीत आम्ही पुलाला धोका पोहोचू देणार नाही. कारण हा पूल दापोली तालुक्यातील दळणवळणाचे मुख्य भाग आहे. या पुलामुळे आंजर्लेपासून बाणकोटपर्यंतचा परिसर जोडला गेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)