शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

पालकमंत्र्यांवर आरोपांच्या फैरी

By admin | Updated: May 14, 2014 00:21 IST

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेने दीड वर्षांपूर्वी केलेल्या शहर विकास आराखड्यानुसारच पालिकेला विविध विकासकामांसाठी शासनाकडून पैसे मिळणार आहेत.

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेने दीड वर्षांपूर्वी केलेल्या शहर विकास आराखड्यानुसारच पालिकेला विविध विकासकामांसाठी शासनाकडून पैसे मिळणार आहेत. मात्र, प्रत्येक पैसा मीच देतोय, अशा थाटात श्रेय लाटण्याची राज्यमंत्री उदय सामंत यांची भूमिका चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यमंत्री सामंत, आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन व नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी रंजना गगे हे संगनमताने कारभार करीत आहेत, असा घणाघाती आरोप माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक मिलिंद कीर व महायुतीच्या अन्य नगरसेवकांनी केला. या विषयावरून पालिका सभेत खडाजंगी झाली. रत्नागिरी पालिकेची सर्वसाधारण सभा आज (मंगळवार) नगराध्यक्ष अशोक मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अपेक्षेप्रमाणे रत्नागिरीतील २१ कोटींच्या डांबरीकरण भूमिपूजनाचा विषय सभेत गाजला. कारभाराबाबत वारंवार चुका करणार्‍या व राज्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार्‍या मुख्याधिकारी गगे यांच्यावर कारवाईची मागणी याआधीच झाली आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी कीर यांनी केली. रत्नागिरीत साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज व मारुती मंदिर ते नाचणे गावदेवी मंदिर या ११ कोटी खर्चाच्या दोन रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या अल्प मुदतीच्या निविदा काढल्या गेल्या. याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला ११ मे रोजी कोणीच आले नाही. त्यामुळे पालिकेच्या कर्मचार्‍यांना सायंकाळी ५ वाजण्याच्या कार्यक्रमाला आदेश काढून बोलावून नेले. नियमानुसार निविदा नसल्याने या प्रक्रियेला जिल्हाधिकार्‍यांनी स्थगिती देऊन कालच्या सुनावणीत नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. सभागृहात महायुतीच्या नेत्यांना या विषयावरून रोखण्याचा राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्तात्रय साळवी, स्मितल पावसकर यांनी प्रयत्न केला. मात्र, नुसते रस्ते केले म्हणजे विकास नव्हे, असे भैया मलुष्टे यांनी खडसावले. पालकमंत्र्यांना रस्ते करून वडिलांची कंपनी चालवायची आहे, असा शेरा प्रदीप साळवी यांनी मारल्यानंतर महायुतीच्या सर्वच सदस्यांनी बाके वाजवून दाद दिली. (प्रतिनिधी)