शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांवर आरोपांच्या फैरी

By admin | Updated: May 14, 2014 00:21 IST

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेने दीड वर्षांपूर्वी केलेल्या शहर विकास आराखड्यानुसारच पालिकेला विविध विकासकामांसाठी शासनाकडून पैसे मिळणार आहेत.

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेने दीड वर्षांपूर्वी केलेल्या शहर विकास आराखड्यानुसारच पालिकेला विविध विकासकामांसाठी शासनाकडून पैसे मिळणार आहेत. मात्र, प्रत्येक पैसा मीच देतोय, अशा थाटात श्रेय लाटण्याची राज्यमंत्री उदय सामंत यांची भूमिका चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यमंत्री सामंत, आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन व नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी रंजना गगे हे संगनमताने कारभार करीत आहेत, असा घणाघाती आरोप माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक मिलिंद कीर व महायुतीच्या अन्य नगरसेवकांनी केला. या विषयावरून पालिका सभेत खडाजंगी झाली. रत्नागिरी पालिकेची सर्वसाधारण सभा आज (मंगळवार) नगराध्यक्ष अशोक मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अपेक्षेप्रमाणे रत्नागिरीतील २१ कोटींच्या डांबरीकरण भूमिपूजनाचा विषय सभेत गाजला. कारभाराबाबत वारंवार चुका करणार्‍या व राज्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार्‍या मुख्याधिकारी गगे यांच्यावर कारवाईची मागणी याआधीच झाली आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी कीर यांनी केली. रत्नागिरीत साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज व मारुती मंदिर ते नाचणे गावदेवी मंदिर या ११ कोटी खर्चाच्या दोन रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या अल्प मुदतीच्या निविदा काढल्या गेल्या. याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला ११ मे रोजी कोणीच आले नाही. त्यामुळे पालिकेच्या कर्मचार्‍यांना सायंकाळी ५ वाजण्याच्या कार्यक्रमाला आदेश काढून बोलावून नेले. नियमानुसार निविदा नसल्याने या प्रक्रियेला जिल्हाधिकार्‍यांनी स्थगिती देऊन कालच्या सुनावणीत नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. सभागृहात महायुतीच्या नेत्यांना या विषयावरून रोखण्याचा राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्तात्रय साळवी, स्मितल पावसकर यांनी प्रयत्न केला. मात्र, नुसते रस्ते केले म्हणजे विकास नव्हे, असे भैया मलुष्टे यांनी खडसावले. पालकमंत्र्यांना रस्ते करून वडिलांची कंपनी चालवायची आहे, असा शेरा प्रदीप साळवी यांनी मारल्यानंतर महायुतीच्या सर्वच सदस्यांनी बाके वाजवून दाद दिली. (प्रतिनिधी)