शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

रत्नागिरी : तालुक्यात सायंकाळी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये झाडांची पडझड झाली, तर अनेकांच्या घरावरील पत्रे ...

रत्नागिरी : तालुक्यात सायंकाळी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये झाडांची पडझड झाली, तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, तर किनारपट्टीवरील काही गावांमध्ये संरक्षण भिंती कोसळल्याने घरांना समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. तौउते वादळामुळे समुद्र खवळलेला हाेता़ त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिक सतर्क झाले हाेते़

रत्नागिरी तालुक्यात शनिवारी रात्रीपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली हाेती, तर वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात बहुतांश गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यानंतर रविवारी सायंकाळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. त्या सकाळपासूनच राजीवडा नाका, सोमेश्वर, नाचणे सह्याद्रीनगर, मालगुंड - मराठेवाडी, भाट्येबीच या गावांमध्ये सुपारी, माड, आंब्याची झाडे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच नाचणे सह्याद्रीनगर येथे एका रिक्षासह घरावर माड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. गावडे आंबेरे येथील बौद्ध विहारावरील तसेच उद्यमनगर येथील एका इमारतीवरील पत्रे उडाली. अनेक ठिकाणी घरावरील पत्र्यांचे छप्पर वाऱ्याने उडाल्याने घरातील सामान पावसाच्या पाण्याने भिजले.

जयगड येथील साखर मोहल्ला हा भाग किनारी असल्याने समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने घरांसाठी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंती कोसळल्या. त्यामुळे या घरांना धोका निर्माण झाला असून, येथील रहिवासी भीतीच्या छायेत आहेत. मिऱ्या, मांडवी, भाट्ये, राजीवडा येथेही वादळाने खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा प्रचंड माऱ्याने अनेक माड, सुमारीची झाडेही जमीनदोस्त झाली. रत्नागिरी शहर परिसरात तर ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने काही प्रमाणात नुकसान झाले. पडझड झालेल्या ठिकाणी पाेलीस यंत्रणा स्थानिकांच्या मदतीने कोसळलेली झाडे तोडून बाजूला करून रस्ते रहदारीसाठी खुले करण्यात गुंतले होते. शहर परिसरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच होता, तर अनेक भागांमध्ये दुपारनंतर वीज पुरवठा ठप्प झाला होता. रात्री उशिरापर्यंत वादळ सुरूच होते.