शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

रत्नागिरी : तालुक्यात सायंकाळी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये झाडांची पडझड झाली, तर अनेकांच्या घरावरील पत्रे ...

रत्नागिरी : तालुक्यात सायंकाळी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये झाडांची पडझड झाली, तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, तर किनारपट्टीवरील काही गावांमध्ये संरक्षण भिंती कोसळल्याने घरांना समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. तौउते वादळामुळे समुद्र खवळलेला हाेता़ त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिक सतर्क झाले हाेते़

रत्नागिरी तालुक्यात शनिवारी रात्रीपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली हाेती, तर वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात बहुतांश गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यानंतर रविवारी सायंकाळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. त्या सकाळपासूनच राजीवडा नाका, सोमेश्वर, नाचणे सह्याद्रीनगर, मालगुंड - मराठेवाडी, भाट्येबीच या गावांमध्ये सुपारी, माड, आंब्याची झाडे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच नाचणे सह्याद्रीनगर येथे एका रिक्षासह घरावर माड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. गावडे आंबेरे येथील बौद्ध विहारावरील तसेच उद्यमनगर येथील एका इमारतीवरील पत्रे उडाली. अनेक ठिकाणी घरावरील पत्र्यांचे छप्पर वाऱ्याने उडाल्याने घरातील सामान पावसाच्या पाण्याने भिजले.

जयगड येथील साखर मोहल्ला हा भाग किनारी असल्याने समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने घरांसाठी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंती कोसळल्या. त्यामुळे या घरांना धोका निर्माण झाला असून, येथील रहिवासी भीतीच्या छायेत आहेत. मिऱ्या, मांडवी, भाट्ये, राजीवडा येथेही वादळाने खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा प्रचंड माऱ्याने अनेक माड, सुमारीची झाडेही जमीनदोस्त झाली. रत्नागिरी शहर परिसरात तर ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने काही प्रमाणात नुकसान झाले. पडझड झालेल्या ठिकाणी पाेलीस यंत्रणा स्थानिकांच्या मदतीने कोसळलेली झाडे तोडून बाजूला करून रस्ते रहदारीसाठी खुले करण्यात गुंतले होते. शहर परिसरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच होता, तर अनेक भागांमध्ये दुपारनंतर वीज पुरवठा ठप्प झाला होता. रात्री उशिरापर्यंत वादळ सुरूच होते.