शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

अडीच कोटींवर उतारा २५ लाखांचा

By admin | Updated: July 8, 2014 00:18 IST

रत्नागिरी पालिका : गाळे भाडे थकबाकीदारांची नवीन शक्कल

रत्नागिरी : नगरपालिकेचे बारा व्यापारी गाळे सील केल्यानंतर या व्यावसायिकांना गाळाभाडे, घरपट्टी व पाणीपट्टी मिळून २ कोटी ६३ लाख रुपये थकबाकी भरावीच लागणार आहे. १० टक्के थकबाकी भरून गाळे ताब्यात देण्याची थकबाकीदारांची मागणी मालमत्ता नियमांच्या कसोटीवर टिकणारी नाही. पैसे भरण्यासाठी काही दिवसांची मुदत वाढवून दिली जाऊ शकते. त्या मुदतीतही थकबाकी भरली नाही, तर सील केलेल्या गाळ्यातील मालमत्तेचा लिलाव करून गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी पालिका निविदा काढू शकते, अशी माहिती नगरपालिका सुत्रांनी दिली. रत्नागिरी पालिकेच्या मालमत्ता विभागाने २ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर सर्कलजवळील शिवाजी स्टेडियममधील १२ व्यापारी गाळे सील केले आहेत. त्यानंतर थकबाकी भरून गाळ्यांच्या पुन्हा ताबा देण्याकरिता पाच दिवसांची मुदत दिली होती ती आज संपुष्टात आली. त्यामुळे ही मुदत वाढवून मिळावी, थकीत भाड्याच्या रकमेपैकी १० टक्के रक्कम भरून घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन रत्नागिरी पालिकेला १२ पैकी १० थकबाकीदारांनी दिले आहे. गाळे सील केल्यानंतर पुन्हा ताबा देण्यासाठी पूर्ण थकबाकी भरणे आवश्यक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. काही हप्त्यात रक्कम भरण्याची मुभा देण्याची वेळ केव्हाच संपली आहे. थकबाकी भरण्यासाठी आणखी तीन-चार दिवसांची मुदतवाढ मिळू शकेल. मात्र, थकीत असलेली २ कोटी ६३ लाख रुपये रक्कम भरावीच लागेल, असेही सुत्रांकडून सांगण्यात आले. दिलेल्या मुदतीत सील करण्यात आलेल्या गाळेधारकांनी थकबाकीची पूर्ण रक्कम भरली नाही तर थकबाकी भरण्याबरोबरच दंडही भरावा लागणार आहे. सील करण्यात आलेल्या बारा व्यापारी गाळ्यातील सध्या असेलेला सर्व माल, वस्तू यांचा लिलाव केला जाईल. त्यातून मिळणारी रक्कम थकबाकी म्हणून जमा केली जाईल. जप्तीनंतर २ कोटी ६३ लाख थकबाकीपोटी केवळ १० टक्के रक्कम भरणे हे नियमातच बसणारे नाही. तरीही एकूण थकबाकीच्या किमान ५० ते ६० टक्के रक्कम तत्काळ भरून व उर्वरित रकमेचे हप्ते कराराने ठरवून दिले जाऊ शकतात. अर्थात त्याबाबतचे अधिकार हे पालिका प्रशासनाला आहेत. मात्र, दंड आकारणीमुळे थकबाकीची रक्कम, त्यावरील व्याज व दंड मिळून साडेतीन कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या प्रश्नी रत्नागिरीकर आक्रमक आहेत. २५ ते ३० वर्षे पालिका गाळ्यांचे भाडे थकविणाऱ्यांना कोणतीही माफी नको, त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत कारवाई व्हायलाच हवी, अशीच सर्वसामान्यांची भूमिका आहे. त्यामुळे पालिका आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)